शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

कोल्हापूर : पंचगंगा वाचविण्यासाठी कुरुंदवाडपासून पायी लोकजागर उपक्रमास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 13:02 IST

भूमाता संघटनेमार्फत प्रदूषणमुक्त पंचगंगा जागर पदयात्रा मोहिमेला शुक्रवारी कुरुंदवाड येथून नदीच्या संगमापासून सुरुवात झाली.

ठळक मुद्देपंचगंगा वाचविण्यासाठी कुरुंदवाडपासून पायी लोकजागर उपक्रमास प्रारंभडॉ. बुधाजीराव मुळीक, आमदार उल्हास पाटील, धैर्यशील माने सहभागी भूमाता संघटनेच्या रौप्यमहोत्सव, नदीच्या संगमापासून उगमापर्यंत पदयात्रा

कोल्हापूर/शिरोळ : भूमाता संघटनेमार्फत प्रदूषणमुक्त पंचगंगा जागर पदयात्रा मोहिमेला शुक्रवारी कुरुंदवाड येथून नदीच्या संगमापासून सुरुवात झाली.संगम ते उगम पंचगंगा प्रदुषण जागर पायी यात्रेचा प्रारंभ आज सकाळी शिरोळ तालुक्यातील कुरुदवाड येथील संताजी घोरपडे समाधी स्थळावरुन झाला.

या जागर मोहिमेत संघटनेचे संस्थापक व ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, शिरोळचे आमदार उल्हास पाटील, शालिनी मुळीक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने, शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा नीता माने, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने, कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयराम पाटील, गणपतराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या इंद्रायणी माने यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले आहेत. दुपारच्या सत्रात साताऱ्याचे खासदार उदयनराजे सहभागी होणार आहेत.भूमाता संघटनेने रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ही मोहिम संघटनेने उघडली आहे. इचलकरंजी, वळिवडे या मार्गे नदीकाठावरून पायी चालत जाऊन नदी वाचविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रयाग चिखली येथे नदीच्या उगमापर्यंत ७ जानेवारीपर्र्यत हा उपक्रम सुरु राहणार आहे.पंचगंगा नदीला मरणासन्न अवस्थेतून गतवैभवाकडे नेण्यासाठी प्रदूषणाची नदीकाठची ठिकाणे संगमापासून उगमापर्यंत सर्वांनी पाहावीत आणि आपण स्वत: या प्रदूषणात सहभागी होणार नाही, याची जाणीव व्हावी, या हेतूने हा उपक्रम हाती घेतला आहे.नदी पुन्हा जिवंत करण्यासाठी प्रदूषण रोखणे हाच एकमेव उपाय आहे, त्यासाठी भूमाता संघटनेने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यापैकी जागरयात्रा हा त्यापैकीच एक आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून नदी स्वच्छ कशी करता येईल, या बाबतीत प्रबोधन केले जाणार आहे, अशी माहिती यावेळी संघटनेचे संस्थापक व ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी दिली.मानवी साखळी २२ किलोमीटरची या लोकजागर यात्रेत शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड, नांदणी, धरणगुत्ती आदी परिसरातील शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षकही सहभागी झाले आहेत. कुरुंदवाड येथील सेनापती संताजी घोरपडे यांच्या समाधीस्थळावरुन या यात्रेस प्रारंभ झाला. तेथून नृसिंहवाडीच्या नदीघाटापासून २२ किलोमीटर लांब मानवी साखळीद्वारे या पंचगंगा नदी प्रदूषण जागर करण्यात आला.पदयात्रेच्या अग्रभागी जलकुंभया मोहिमेसाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेच्या अग्रभागी पंचगंगा नदीतील पाण्याचा जलकुंभ एका सजवलेल्या वाहनावर ठेवण्यात आला आहे. पंचगंगा प्रदूषण मुक्त करा, पाणी वाचवा अशा आशयाच्या घोषणा देत तसेच जागृती करणारे फलक हाती घेत विद्यार्थी, शिक्षक, नागरिक यांच्यासह अनेक मान्यवर या पदयात्रेत सहभागी झाले आहेत.

टॅग्स :riverनदीkolhapurकोल्हापूर