शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

कोल्हापूर : पंचगंगा वाचविण्यासाठी कुरुंदवाडपासून पायी लोकजागर उपक्रमास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 13:02 IST

भूमाता संघटनेमार्फत प्रदूषणमुक्त पंचगंगा जागर पदयात्रा मोहिमेला शुक्रवारी कुरुंदवाड येथून नदीच्या संगमापासून सुरुवात झाली.

ठळक मुद्देपंचगंगा वाचविण्यासाठी कुरुंदवाडपासून पायी लोकजागर उपक्रमास प्रारंभडॉ. बुधाजीराव मुळीक, आमदार उल्हास पाटील, धैर्यशील माने सहभागी भूमाता संघटनेच्या रौप्यमहोत्सव, नदीच्या संगमापासून उगमापर्यंत पदयात्रा

कोल्हापूर/शिरोळ : भूमाता संघटनेमार्फत प्रदूषणमुक्त पंचगंगा जागर पदयात्रा मोहिमेला शुक्रवारी कुरुंदवाड येथून नदीच्या संगमापासून सुरुवात झाली.संगम ते उगम पंचगंगा प्रदुषण जागर पायी यात्रेचा प्रारंभ आज सकाळी शिरोळ तालुक्यातील कुरुदवाड येथील संताजी घोरपडे समाधी स्थळावरुन झाला.

या जागर मोहिमेत संघटनेचे संस्थापक व ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, शिरोळचे आमदार उल्हास पाटील, शालिनी मुळीक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने, शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा नीता माने, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने, कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयराम पाटील, गणपतराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या इंद्रायणी माने यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले आहेत. दुपारच्या सत्रात साताऱ्याचे खासदार उदयनराजे सहभागी होणार आहेत.भूमाता संघटनेने रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ही मोहिम संघटनेने उघडली आहे. इचलकरंजी, वळिवडे या मार्गे नदीकाठावरून पायी चालत जाऊन नदी वाचविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रयाग चिखली येथे नदीच्या उगमापर्यंत ७ जानेवारीपर्र्यत हा उपक्रम सुरु राहणार आहे.पंचगंगा नदीला मरणासन्न अवस्थेतून गतवैभवाकडे नेण्यासाठी प्रदूषणाची नदीकाठची ठिकाणे संगमापासून उगमापर्यंत सर्वांनी पाहावीत आणि आपण स्वत: या प्रदूषणात सहभागी होणार नाही, याची जाणीव व्हावी, या हेतूने हा उपक्रम हाती घेतला आहे.नदी पुन्हा जिवंत करण्यासाठी प्रदूषण रोखणे हाच एकमेव उपाय आहे, त्यासाठी भूमाता संघटनेने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यापैकी जागरयात्रा हा त्यापैकीच एक आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून नदी स्वच्छ कशी करता येईल, या बाबतीत प्रबोधन केले जाणार आहे, अशी माहिती यावेळी संघटनेचे संस्थापक व ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी दिली.मानवी साखळी २२ किलोमीटरची या लोकजागर यात्रेत शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड, नांदणी, धरणगुत्ती आदी परिसरातील शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षकही सहभागी झाले आहेत. कुरुंदवाड येथील सेनापती संताजी घोरपडे यांच्या समाधीस्थळावरुन या यात्रेस प्रारंभ झाला. तेथून नृसिंहवाडीच्या नदीघाटापासून २२ किलोमीटर लांब मानवी साखळीद्वारे या पंचगंगा नदी प्रदूषण जागर करण्यात आला.पदयात्रेच्या अग्रभागी जलकुंभया मोहिमेसाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेच्या अग्रभागी पंचगंगा नदीतील पाण्याचा जलकुंभ एका सजवलेल्या वाहनावर ठेवण्यात आला आहे. पंचगंगा प्रदूषण मुक्त करा, पाणी वाचवा अशा आशयाच्या घोषणा देत तसेच जागृती करणारे फलक हाती घेत विद्यार्थी, शिक्षक, नागरिक यांच्यासह अनेक मान्यवर या पदयात्रेत सहभागी झाले आहेत.

टॅग्स :riverनदीkolhapurकोल्हापूर