शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

ST Workers Strike: संप करणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई ? एसटी महामंडळ ॲक्शन मोडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 09:03 IST

ST Workers Strike: एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या पाच महिन्यांपासून एसटीचा संप सुरू आहे. या संपात सहभागी असलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासाठी ३१ मार्चची मुदत देण्यात आली होती.

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या पाच महिन्यांपासून एसटीचा संप सुरू आहे. या संपात सहभागी असलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासाठी ३१ मार्चची मुदत देण्यात आली होती. तरीही  मोठ्या प्रमाणात कर्मचारी संपावर आहेत. ३१ मार्चपर्यंत हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ४७,७०७ आहे. या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुदतीपूर्वी जे संपकरी कर्मचारी कामावर हजर राहणार नाहीत त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. त्यानुसार, जे कर्मचारी कामावर सध्या हजर राहत नाहीत, त्यांना नोकरीची गरज नाही असे समजून कारवाई केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील कामावर हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. तरीही  ३१ मार्चपर्यंत ३३,९७६ कर्मचारी कामावर हजर झाले आहे. तर ३१ मार्च रोजी फक्त ६५४ कर्मचारी नव्याने हजर झाले आहेत. 

आज सुनावणी एसटी विलीनीकरणासंदर्भात अद्याप तोडगा निघालेला नाही. एसटी विलीनीकरणावर बाजू मांडण्यासाठी आम्हाला १५ दिवस द्या, अशी विनंती राज्य सरकारतर्फे न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार, मंगळवार ५ एप्रिल रोजी यावर सुनावणी होणार आहे. 

संपातील एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी ३१ मार्च मुदत देण्यात आली होती. तरीही अनेक कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत. त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. तर मुदतीत जे कर्मचारी रुजू झाले आहेत, त्यांना दिलासा मिळेल. - शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

टॅग्स :ST Strikeएसटी संपMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार