‘एसटी’ महामंडळ ६६ वर्षांत पहिल्यांदाच ‘मे’मध्ये तोट्यात

By Admin | Updated: May 28, 2014 00:55 IST2014-05-28T00:55:40+5:302014-05-28T00:55:40+5:30

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाला ६६ वर्षांत पहिल्यांदाच भरघोस उत्पन्न देणार्‍या मे महिन्यात तोटा झाला आहे. मार्च ते मे हे तीन महिने एसटीसाठी उत्पन्नाच्या बाबतीत सुगीचे मानले जातात.

'ST' Corporation for the first time in 66 years' loss in May | ‘एसटी’ महामंडळ ६६ वर्षांत पहिल्यांदाच ‘मे’मध्ये तोट्यात

‘एसटी’ महामंडळ ६६ वर्षांत पहिल्यांदाच ‘मे’मध्ये तोट्यात

विलास गावंडे - यवतमाळ

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाला ६६ वर्षांत पहिल्यांदाच भरघोस उत्पन्न देणार्‍या मे महिन्यात तोटा झाला आहे. मार्च ते मे हे तीन महिने एसटीसाठी उत्पन्नाच्या बाबतीत सुगीचे मानले जातात. मात्र याच तीन महिन्यात तब्बल ४00 कोटींचा फटका बसला आहे. गतवर्षी केवळ मे महिना नफ्याचा राहिला. दोन महिने तोट्यात राहिल्यानंतरही महामंडळाने बोध घेतला नाही. परिणामी यावर्षी मे महिनाही हातचा गेला.

गेली काही वर्षांपासून एसटी महामंडळाला नफ्याचे दिवस स्वप्नातही नाहीत. सन २0१२-१३ या आर्थिक वर्षात ७२२ कोटीने तोट्यात राहिलेल्या एसटीने नफा वाढविण्यासाठी किंवा तोटा कमी करण्यासाठी कुठल्याही ठोस उपाययोजना आखल्या नाहीत. परिणामी तोट्याचा आकडा फुगत चालला आहे. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात लग्नाचा ठोक अधिक राहात असल्याने बसेस प्रवाशांनी खचाखच भरून धावतात. पण, यावर्षी एसटी महामंडळाला ही गर्दी

एसटी महामंडळाच्या स्थापनेला येत्या १ जून रोजी ६६ वर्षे पूर्ण होत आहेत.

कॅशकरता आली नाही. प्रवाशांच्या सेवेतहे ब्रीद घेवून रस्त्यावर धावणार्‍या एसटीने प्रत्यक्ष चांगली सेवा पुरविली नाही. अलीकडे यात कमालीची अनियमितता आली आहे. नियोजनाचा अभाव, बसेसचा तुटवडा, भंगार बसेस आदी कारणांमुळे प्रवासी एसटीपासून तुटत गेले आहे. यात भरीसभर म्हणजे अवैधरीत्या चालणारी खासगी वाहने, मनुष्यबळाचा तुटवडा हे एक कारणही एसटी महामंडळाच्या अधोगतीला नेण्यास कारणीभूत ठरल्याचे सांगितले जाते. एकट्या यवतमाळ विभागात ८0 चालक, १५0 वाहक मंजूरीपेक्षा कमी आहेत. यांत्रिक कामगारांची संख्या तर ५0 टक्क्यांवर पोहोचली आहे. परिणामी प्रवाशांना दज्रेदार सेवा मिळत नाही. तोटा वाढत असल्याने एसटी महामंडळ डिझेलचेही पैसे वेळेवर देत नाही. याशिवाय कामगारांना भविष्य निर्वाह निधीची रक्कम चार-चार महिने वाटप करत नाही. सेवानवृत्त झालेल्या कामगाराला नवृत्तीच्या दिवशीच उपदानाची रक्कम दिली जावी, असा निर्णय असतानाही अनेक दिवसपर्यंत त्याला महामंडळाच्या कार्यालयात येरझारा माराव्या लागतात. हक्काच्या पैशांसाठी त्यांची पायपीट सुरू आहे.

Web Title: 'ST' Corporation for the first time in 66 years' loss in May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.