शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

मोठी बातमी! SSC, HSC विद्यार्थ्यांना परीक्षा फी परत मिळणार; कोर्टाची लढाई यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 21:53 IST

कोरोना साथीमुळे यावर्षी इयत्ता दहावी व बारावी परीक्षा झाल्या नाहीत. मात्र बोर्डाने परीक्षेसाठी प्रत्येक विद्यार्थांकडून ४०० ते ५०० रुपये फी घेतली होती.

मिरज : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून २०२१ मध्ये बोर्डाच्या परीक्षेसाठी घेतलेले शुल्क खर्च वजा करून उर्वरित रक्कम परत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५९ रुपये व बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ९४ रुपये परत दिले जाणार आहेत. जे अकरावी सीईटी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्याचे ३५ रुपये वजा करून उरलेली रक्कम ५९ रुपये दिली जाणार आहे. दहावीच्या १३ लाख व बारावीच्या १६ लाख विद्यार्थ्यांची सुमारे २२ कोटी रुपये परीक्षा फी परत मिळणार आहे.

कोरोना साथीमुळे यावर्षी इयत्ता दहावी व बारावी परीक्षा झाल्या नाहीत. मात्र बोर्डाने परीक्षेसाठी प्रत्येक विद्यार्थांकडून ४०० ते ५०० रुपये फी घेतली होती. ही परीक्षा फी परत मिळावी यासाठी मिरजेतून न्यायालयीन लढा सुरू करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता व न्या. जी एस कुलकर्णी यांनी बोर्डाला दहावी व बारावीचे घेतलेली परीक्षा फी विद्यार्थ्यांना परत देण्याबाबत निर्णय घेण्याचा आदेश दिला होता. उच्च न्यायालयात वकिली करणारे मिरजेतील वकील पद्मनाभ पिसे यांनी मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक प्रतापसिंह चोपदार यांच्या वतीने याबाबत जनहित याचिका दाखल केली होती. याबाबत न्यायालयाच्या आदेशामुळे दहावी व बारावी बोर्डाने परीक्षेसाठी घेतलेले शुल्क खर्च वजा करुन उर्वरित रक्कम परत देण्याचा निर्णय घेतला आहे.

दहावीच्या व बारावीच्या २९ लाख विद्यार्थ्यांची सुमारे २२ कोटी रुपये परीक्षा फीची रक्कम शाळा व महाविद्यालयांकडे वर्ग करण्यात येणार आहे. ही रक्कम कमी असली तरी विद्यार्थ्यांनी हक्काची लढाई जिंकल्याचे प्रा. रवींद्र फडके यांनी सांगितले. परीक्षा शुल्क परत मिळण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणारे मिरजेचे वकील पद्मनाभ पिसे यांचा मिरज हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे, रोटरी क्लबचे अध्यक्ष गिरीश लांडगे व प्रा. रवींद्र फडके यांनी सत्कार केला.