शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

मोठी बातमी! SSC, HSC विद्यार्थ्यांना परीक्षा फी परत मिळणार; कोर्टाची लढाई यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 21:53 IST

कोरोना साथीमुळे यावर्षी इयत्ता दहावी व बारावी परीक्षा झाल्या नाहीत. मात्र बोर्डाने परीक्षेसाठी प्रत्येक विद्यार्थांकडून ४०० ते ५०० रुपये फी घेतली होती.

मिरज : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून २०२१ मध्ये बोर्डाच्या परीक्षेसाठी घेतलेले शुल्क खर्च वजा करून उर्वरित रक्कम परत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५९ रुपये व बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ९४ रुपये परत दिले जाणार आहेत. जे अकरावी सीईटी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्याचे ३५ रुपये वजा करून उरलेली रक्कम ५९ रुपये दिली जाणार आहे. दहावीच्या १३ लाख व बारावीच्या १६ लाख विद्यार्थ्यांची सुमारे २२ कोटी रुपये परीक्षा फी परत मिळणार आहे.

कोरोना साथीमुळे यावर्षी इयत्ता दहावी व बारावी परीक्षा झाल्या नाहीत. मात्र बोर्डाने परीक्षेसाठी प्रत्येक विद्यार्थांकडून ४०० ते ५०० रुपये फी घेतली होती. ही परीक्षा फी परत मिळावी यासाठी मिरजेतून न्यायालयीन लढा सुरू करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता व न्या. जी एस कुलकर्णी यांनी बोर्डाला दहावी व बारावीचे घेतलेली परीक्षा फी विद्यार्थ्यांना परत देण्याबाबत निर्णय घेण्याचा आदेश दिला होता. उच्च न्यायालयात वकिली करणारे मिरजेतील वकील पद्मनाभ पिसे यांनी मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक प्रतापसिंह चोपदार यांच्या वतीने याबाबत जनहित याचिका दाखल केली होती. याबाबत न्यायालयाच्या आदेशामुळे दहावी व बारावी बोर्डाने परीक्षेसाठी घेतलेले शुल्क खर्च वजा करुन उर्वरित रक्कम परत देण्याचा निर्णय घेतला आहे.

दहावीच्या व बारावीच्या २९ लाख विद्यार्थ्यांची सुमारे २२ कोटी रुपये परीक्षा फीची रक्कम शाळा व महाविद्यालयांकडे वर्ग करण्यात येणार आहे. ही रक्कम कमी असली तरी विद्यार्थ्यांनी हक्काची लढाई जिंकल्याचे प्रा. रवींद्र फडके यांनी सांगितले. परीक्षा शुल्क परत मिळण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणारे मिरजेचे वकील पद्मनाभ पिसे यांचा मिरज हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे, रोटरी क्लबचे अध्यक्ष गिरीश लांडगे व प्रा. रवींद्र फडके यांनी सत्कार केला.