शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

कीटकनाशकांच्या मिश्रणामुळे फवारणी बळी , प्रयोगशाळेचा निष्कर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 05:00 IST

फवारणीला जास्त खर्च लागतो म्हणून शेतकºयांनी दोन-चार प्रकारची कीटकनाशके एकत्र करून ती फवारली आणि तीच त्यांच्या जीवावर बेतल्याचा निष्कर्ष अमरावतीच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेने काढला आहे.

यवतमाळ : फवारणीला जास्त खर्च लागतो म्हणून शेतकºयांनी दोन-चार प्रकारची कीटकनाशके एकत्र करून ती फवारली आणि तीच त्यांच्या जीवावर बेतल्याचा निष्कर्ष अमरावतीच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेने काढला आहे.यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन दोन डझन शेतकºयांना जीव गमवावा लागला. ७००हून अधिक जणांना बाधा झाली. त्यामुळे सर्वत्र भीतीचे तसेच तणावाच वातावरण निर्माण झाले आहे. हे नेमके कशामुळे घडले, हे शोधण्यासाठी मृत शेतकºयांचा व्हिसेरा व बाधित रुग्णांच्या रक्ताचे रक्त नमुने अमरावतीच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. मात्र ते सर्व ‘निगेटीव्ह’ आले आहेत.अर्थात व्हीसेरा व रक्तात कुठेच विषाचे अंश आढळून आलेले नाहीत. कंपन्या राज्य शासनाच्या प्रयोगशाळेत जे नमुने पाठवितात, ते उत्तम दर्जाचे असतात. त्यात कुठलीही भेसळ करण्यात आलेली नसते. पण बाजारात उपलब्ध होणाºया कीटकनाशकांमध्ये मात्र तसा दर्जा आढळून येत नाही. त्यामुळे कीटकनाशकांची तीव्रता वाढविण्यासाठी शेतकरी दोन-तीन कीटकनाशके एकत्र करतात व हेच त्यांच्या जीवावर बेतल्याचे दिसते.पैसे वाचवण्याचा प्रयोग जिवावर बेततोन्यायवैद्यक प्रयोगशाळा अमरावतीचे उपसंचालकडॉ. विजय ठाकरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, यवतमाळ जिल्ह्यात प्रति बाटली ५० ते ७० रुपये या दराने फवारणी केली जाते. त्यामुळे एक शेतमजूर दिवसात ३० ते ४० बाटल्या कीटकनाशक फवारतो. फवारणीचा खर्च कमी व्हावा म्हणून शेतकरी तीन ते चार कीटकनाशके एकत्र करतात. त्यामुळे ते नाशक अधिक जहाल होते. त्याची बाधा सर्वप्रथम फवारणी करणाºयाला होते; शिवाय फवारणीपूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजनाही केल्या जात नाहीत.

टॅग्स :Farmerशेतकरी