शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीसाठी विशेष फेरी : लाखापेक्षा अधिक जागा उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 06:01 IST

अकरावी प्रवेशाची चौथी आणि अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतरही तब्बल ३२ हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याने विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई  - अकरावी प्रवेशाची चौथी आणि अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतरही तब्बल ३२ हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याने विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरीसाठी महाविद्यालयांना इनहाउस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्याच्या जागा सरंडर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार विशेष फेरीसाठी एकूण १ लाख १५ हजार ७३० जागा उपलब्ध झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना १३ आणि १४ आॅगस्ट रोजी या जागांसाठी अर्ज करण्याची मुदत देण्यात आली असून त्यांची गुणवत्ता यादी १८ आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे.दुसऱ्या फेरीत अल्पसंख्याक कोट्यातील जागांचा घोळ झाल्यानंतर तिसरी गुणवत्ता यादी लांबणीवर पडली आणि अल्पसंख्याक कोट्यातील जागा सरंडर न करता महाविद्यालय स्तरावर त्याच जागा भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामुळे अनेक नव्वदीपार विद्यार्थीही तिसºया आणि चौथ्या यादीबाहेर राहिले. त्यामुळे पसंतीचे महाविद्यालय न मिळालेले ८० ते ९० टक्के गुण मिळालेले विद्यार्थीही प्रवेशाविनाच आहेत. अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी मिळावी यासाठी विशेष फेरीचे आयोजन केले आहे.केंद्रीय प्रवेशाच्या ९३,३२१ जागाविशेष फेरीसाठी केंद्रीय प्रवेशाच्या ९३ हजार ३२१ जागा उपलब्ध आहेत. महाविद्यालयांनी आपल्या तिन्ही कोट्यांतील जागा या वेळी समाप्त केल्याने या जागांची संख्या वाढली आहे. यामध्ये इनहाउसच्या ६०७२, अल्पसंख्याकच्या १० हजार ६६३, व्यवस्थापनाच्या ५,६७४ जागांची भर पडली आहे. यामुळे विशेष फेरीसाठी उपलब्ध जागांची संख्या १ लाखांहून अधिक झाली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रnewsबातम्या