शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

महाविकास आघाडीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला; नेमके प्रकरण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 05:42 IST

उपलब्ध असलेल्या सर्व संसाधनांचा गैरवापर करून भाजप विरोधी पक्षामध्ये दहशत निर्माण करेल, अशी भीती अर्जाद्वारे व्यक्त केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाविकास आघाडीच्या सर्व खासदार व आमदारांना सरसकट अटकपूर्व जामीन मंजूर करण्यासंदर्भात काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखल केलेला अर्ज विशेष न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. महाविकास आघाडीची राज्यात सत्ता असताना हा अर्ज करण्यात आला होता.

विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्या. एम. जी. देशपांडे यांनी हा अर्ज दाखल करून घेण्यायोग्य नसल्याचे म्हणत अर्ज फेटाळला. या अर्जावर उत्तर देण्यासाठी १८ जून रोजी न्यायालयाने ईडीला नोटीस बजावली होती. केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने मिळून स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या खासदार व आमदारांची छळवणूक करत आहे, असा आरोप अर्जाद्वारे करण्यात आला होता.

‘राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्याने भाजप अस्वस्थ झाले आहे. त्यामुळे भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी, देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या व अन्य नेते महाविकास आघाडीच्या सदस्यांविरोधात खोट्या तक्रारी करत आहेत. या सर्व प्रक्रियेत ईडी व अन्य केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख व माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली. केंद्र सरकार चालवित असलेल्या भाजप पक्षाकडे संपत्ती आहे आणि ते विरोधी पक्षाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत. उपलब्ध असलेल्या सर्व संसाधनांचा गैरवापर करून भाजप विरोधी पक्षामध्ये दहशत निर्माण करेल, अशी भीती काँग्रेस कार्यकर्त्यांनी अर्जाद्वारे व्यक्त केली होती.

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी