शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शाब्बास नेतेहो... असेच वागा..! असेच बोला..!!

By अतुल कुलकर्णी | Updated: February 20, 2022 07:14 IST

गेल्या काही वर्षांतील राजकारणावर नजर टाकली, तर मला आत्ताचे राजकारण जास्त सरस आणि दमदार वाटू लागले आहे... सर्वपक्षीय नेत्यांना पत्र.

अतुल कुलकर्णी

प्रिय सर्वपक्षीय प्रमुख नेतेहो,

मुद्दाम तुम्हाला पत्र लिहायला घेतले आहे. गेले काही दिवस मी रोज सकाळी सगळी कामे सोडून वर्तमानपत्र वाचतोय. त्यामुळे माझे मन प्रसन्न झाले. संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्या आरोप- प्रत्यारोपांच्या बातम्यांनी मला झालेला आनंद शब्दातीत आहे. मनातल्या मनात मी एकदम खुश झालोय. एका बाजूला सोमय्या, प्रसाद लाड, राम कदम, दुसरीकडे राऊत, अनिल परब तिसरीकडे नाना पटोले, नवाब मलिक, अतुल लोंढे, सचिन सावंत... नावे तरी किती घ्यायची. सगळे एकमेकांच्या विरुद्ध हे असे जोरदार भिडलेले पाहून आपल्याला फार भारी वाटत आहे. काय आपली संस्कृती... तिचा सार्थ अभिमान बाळगत ही सगळी मंडळी किती जाज्वल्यपूर्ण शब्दरचना करत एकमेकांशी वाद प्रतिवाद करत आहेत. कोणाला ‘भ’ची बारखडी पाठ, तर कोणाला ‘म’पासून सुरू होणारे सगळे शब्द पाठ... एवढे पाठांतर तर उभ्या आयुष्यात आम्हाला कधी करता आले नाही. त्याची खंत वाटू लागलीय हेही कबूल केले पाहिजे.

गेल्या काही वर्षांतील राजकारणावर नजर टाकली, तर मला आत्ताचे राजकारण जास्त सरस आणि दमदार वाटू लागले आहे. नाहीतर पूर्वीच्या काळात उगाचच सभ्यतेच्या नावाखाली एकमेकांना मदत करायचे सगळे... त्या सुप्रिया सुळे पहिल्यांदा खासदार होणार होत्या, तर बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या अंगाखांद्यावर वाढलेली मुलगी उभी आहे, म्हणून तिला मदत करणार, असे सांगून टाकले. त्यांचा पक्ष कोणता, यांचा पक्ष कोणता...? प्रतिभाताई राष्ट्रपतीपदासाठी उभ्या राहिल्या त्यावेळीसुद्धा मराठी महिला राष्ट्रपती होत आहे, असे म्हणत चक्क बाळासाहेबांनी त्यांना पण पाठिंबा देऊ केला. आपले पूर्वीचे नेते एकमेकांच्या व्यक्तिगत आयुष्यावर, बायका मुलांबद्दल चकार शब्द काढायचे नाहीत... आणि आत्ताचे नेते बघा... कसे बिनधास्त सगळ्या गोष्टींवर वाट्टेल तसे बोलतात. पोरी उचलून आणण्याची भाषा करतात, असा दमदारपणा पाहिजे. तो मागच्या काळात कधी दिसलाच नाही. विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, आर.आर. पाटील, गोपीनाथ मुंडे हे नेते असोत किंवा शरद पवार असोत, या नेत्यांना हे असले बोलणे कधी जमलेच नाही. त्यांचा कदाचित अभ्यास कमी पडला असावा. त्यांच्या काळात संजय राऊत, किरीट सोमय्या, राम कदम यांच्यासारखे नेते नव्हते. जरी असे नेते त्यावेळी असले असते तरी ही त्या नेत्यांना ‘भ’ आणि ‘म’च्या बाराखड्यांमधले शब्द वापरता आले असतेच याची कोणतीही खात्री देता येत नाही. 

मागे एकदा विलासराव आणि गोपीनाथराव एका व्यासपीठावर होते. रामदास फुटाणे यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. काय गाजली ती. त्यावर अस्मादिकांनी विलासरावांना फोन करून अभिनंदन केले, तर ते म्हणाले, आमच्यामुळे तुमचा टीआरपी वाढला... आम्हाला रॉयल्टी द्या आता... आत्ताच्या नेत्यांनी रॉयल्टी देत कशी नाही, असा दम भरत, चॅनलवाल्यांकडून पैसे वसूल केले पाहिजेत...

आपल्याकडे ना, कसली सभ्यताच राहिलेली नाही. बिहार, उत्तर प्रदेशात बघा बरं कसे सभ्य राजकारणी आहेत. ते कसे बोलतात, कसे वागतात, कसे एकमेकांना बघून घेऊ, अशी भाषा करतात. आपणही आता हळूहळू त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. सुसंस्कृत राज्य म्हणून काही मिळत नाही. उलट त्या राज्यांना बघा, बिमारू स्टेट म्हणून जास्तीचे पैसे मिळतात. आपल्यालादेखील तसा जास्तीचा निधी मिळायला पाहिजे. त्यासाठी सगळ्या नेत्यांनी रोज एकमेकांविरोधात बोलायला पाहिजे. धोबीघाटावर जशा चादरी आपटून- आपटून धुतात ना तसे एकमेकांना धू- धू धुतले पाहिजे. चॅनलवाल्यांशी ॲग्रीमेंट करून त्यांना मिळणाऱ्या टीआरपीमधून, जाहिरातीमधून हिस्सा मागून घेतला पाहिजे. मग बघा कशी मजा येते... माझी सगळ्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांना हात जोडून विनंती आहे, तुमच्या नेत्यांना हे असे करायला सांगा... मग बघा, महाराष्ट्राची ख्याती कशी बदलते ते... आपल्याला स्वर्गलोकापासून ते जगाच्या कानाकोपऱ्यातून सगळ्यांनी विचारले पाहिजे, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा...? असो. तुम्ही हे कराल ही खात्री आहे. थांबतो. आता मला चॅनलवर आरोप- प्रत्यारोप ही बातम्यांची मालिका बघायची आहे. जय महाराष्ट्र.आपलाच, बाबूराव

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण