शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

सोयाबीनचे दर ३,९०० रुपयांवर! हमीभावापेक्षा १,२०० रुपये जादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 04:40 IST

साप्ताहिक बाजार सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोयाबीनचे दर प्रतिक्ंिवटल ३,८७५, ते ३,९०० रुपयांपर्यंत पोहोचले असून, हमीभावापेक्षा हे दर सरासरी १,२०० रुपयांनी अधिक आहेत.

- राजरत्न सिरसाटअकोला : साप्ताहिक बाजार सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोयाबीनचे दर प्रतिक्ंिवटल ३,८७५, ते ३,९०० रुपयांपर्यंत पोहोचले असून, हमीभावापेक्षा हे दर सरासरी १,२०० रुपयांनी अधिक आहेत. अर्जेंटिंना आणि ब्राझीलमध्ये सोयाबीनच्या उत्पादनात घट झाल्याने हे दर वाढले असून, यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्तुळात वर्तविली जात आहे. सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता ‘लोकमत’ने मागील महिन्यात वर्तविली होती, हे विशेष.सोयाबीनचे मुख्य उत्पादक असलेल्या अर्जेंटिनामध्ये सहा कोटी टन, तर ब्राझीलमध्ये हे उत्पादन १० कोटी टन होते; तथापि पावसाच्या अनिश्चिततेमुळे यावर्षी दोन्ही देशातील सोयाबीनचे उत्पादन प्रचंड घटल्याने सोयाबीनच्या दरात तेजी आली आहे. येत्या दहा दिवसांत अर्जेंटिना येथे पाऊस न आल्यास आणखी ५० दशलक्ष टन सोयाबीन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.राज्यात खरीप हंगामात ३७ लाखांवर सोयाबीनचा पेरा झाला होता. विदर्भात हे क्षेत्र १७ लाख हेक्टरवर होते. विदर्भात सुरुवातीला पाऊस लांबल्याने या पिकावर त्याचे प्रतिकूल परिणाम झाले होते. परिणामी उत्पादन प्रचंड घटले,एकरी सरासरी ५० किलो ते दीड क्ंिवटल, असा उतारा लागल्याने शेतकरी त्रस्त होता; पण पैशाची प्रचंड निकड असल्याने अल्पभूधारक शेतकºयांनी सुरुवातीलाच १८०० ते २००० रुपये प्रतिक्ंिवटल दराने विक्री केली.हमीदर प्रतिक्ंिवटल २,६७५ रुपयेकेंद्र शासनाने गतवर्षी सोयाबीनचे हमीदर २ हजार ६७५ रुपये जाहीर केले आहेत. २०० रुपये बोनसही मिळणार आहे. हमीदर आणि बोनस मिळून शेतकºयांना ३ हजार ५० रुपये प्रतिक्ंिवटल मिळणार आहेत; पण शासकीय खरेदी केंद्रावर प्रतवारीचे निकष कडक करण्यात आल्याने शेतकºयांनी बाजारात सोयाबीन विक्री केली. आता मात्र हे दर ३,९०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.अर्जेंटिना व ब्राझीलमध्ये सोयाबीनचे उत्पादन घटल्याने भारतीय बाजारात तेजी आली असून, ३,९०० रुपये प्रतिक्ंिवटलने खरेदी सुरू आहे. दरात वाढ होण्याची शक्यता आहे.- वसंत बाछुका, उद्योजक, अकोला 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी