शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

लाखावर सोयाबीन उत्पादक शेतकरी मदतीविना !

By admin | Updated: August 18, 2016 18:37 IST

कृषी आणि महसूल विभागाच्या उदासिनतेचा फटका जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

गणेश मापारी खामगाव, (जि.बुलडाणा) - कृषी आणि महसूल विभागाच्या उदासिनतेचा फटका जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. गेल्यावर्षी खरिप हंगामामध्ये सोयाबीनचा पेरा केलेल्या मात्र पीक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांची माहिती सहा महिन्यांपासून जुळलेली नाही. त्यामुळे लाखाहून अधिक सोयाबीन उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गत तीन-चार वर्षांपासून शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शासनाकडून ठोस अशी काहीही मदत न मिळाल्यामुळे पीक विमा योजनेने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा दिला आहे. मात्र पीक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांकडे पेरणीची सुध्दा सोय नाही ही बाब हेरुन शासनाने औरंगाबाद, नाशिक, नागपूर व अमरावती या चार विभागातील कापूस, सोयाबीन आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय फेब्रुवारी २०१६ मध्ये घेतला. औरंगाबाद आणि नाशिक विभागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तर अमरावती व नागपूर विभागातील सोयाबीन आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याची योजना शासनाने आखली. पीक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या निम्मे रक्कम मदत म्हणून देण्यासाठी या चारही विभागातील कापूस, सोयाबीन व धान उत्पादक शेतकऱ्यांची माहिती मागविण्यात आली.

बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक व पीक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. त्यामुळे प्रशासनाने पीक विमा न काढलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची माहिती शासनाला देणे अपेक्षित होते. मात्र महसूल व कृषी विभागाकडून अद्याप पर्यंतही जिल्ह्यातील पीक विमा न काढलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची माहिती शासनाला गेलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील लाखावर शेतकरी शासकीय मदतपासून वंचित आहेत. महसूल व कृषी विभागाची उदासिनताच या प्रकारासाठी कारणीभूत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.अशा प्रकारे होत आहे माहितीचे संकलनमहसूल विभागाकडे शेतकऱ्यांची आकडेवारी आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या नमूना ८-अ वरुन काढण्यात येत आहे. ही संख्या कृषी विभागाला देण्यात आली आहे. कृषी विभागाने बँकांकडून गतवर्षी खरिपाचा पीक विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांची माहिती घेतली आहे. तसेच सोयाबीनचा पेरा केलेल्या शेतकऱ्यांची माहिती या दोन्ही विभागाकडे आहे. ही सर्व माहिती एकत्रित करुन सोयाबीन उत्पादक व पीक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांची माहिती संकलीत करण्यात येत आहे. तथापी सर्वत्र डिजीटलचा बोलबाला असताना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जुळविण्यासाठी कृषी व महसूल विभागाला करावा लागणारा आटापिटा हा चर्चेचा विषय आहे. ७० हजार शेतकऱ्यांनी उतरविला नाही विमा४ सन २०१० च्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात ४ लाख ३० हजार शेतकरी असल्याची नोंद आहे. गत वर्षी ३ लक्ष ६३ हजार २४६ शेतकऱ्यांनी खरिपाचा पीक विमा उतरविलेला आहे. त्यामुळे जवळपास ७० हजार शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविलेला नाही. यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनचाच पेरा केलेला आहे. परिणामी या आकडेवारीनुसार सोयाबीन उत्पादक असे ५० हजारावर शेतकरी असण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पीक विम्यासाठी अपात्र ठरलेल्या ८६ हजार शेतकऱ्यांमध्येही सोयाबीनचा पेरा केलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १ लाखाच्यावर सोयाबीन उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.त्या ८६ हजार शेतकऱ्यांना मिळावा लाभ४गत वर्षी खरिपाचा पीक विमा न उतरविलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची ही योजना आहे. जिल्ह्यातील ३ लक्ष ६३ हजार २४६ शेतकऱ्यांनी गेल्यावर्षी पीक विमा उतरविला आहे. यापैकी ८६ हजार ३३८ शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. अपात्र ठरविण्यात आलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत मिळालेली नाही. तर पीक विमा न उतरविलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याची योजना शासनाने आखली आहे. त्यामुळे पीक विमा काढून विम्यासाठी अपात्र ठरविण्यात आलेल्या शेतकऱ्यांना या योजनेतून मदत देण्यात यावी अशी मागणी पुढे आली आहे.

२५ आॅगस्टची डेडलाईनसोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची माहिती जुळविण्यासाठी कृषी व महसूल विभागाच्या अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप पर्यंत एकाही तालुक्याची माहिती संकलीत झाली नाही. त्यामुळे सदर माहिती २५ आॅगस्टपर्यंत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.⁠⁠⁠⁠