शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

लाखावर सोयाबीन उत्पादक शेतकरी मदतीविना !

By admin | Updated: August 18, 2016 18:37 IST

कृषी आणि महसूल विभागाच्या उदासिनतेचा फटका जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

गणेश मापारी खामगाव, (जि.बुलडाणा) - कृषी आणि महसूल विभागाच्या उदासिनतेचा फटका जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. गेल्यावर्षी खरिप हंगामामध्ये सोयाबीनचा पेरा केलेल्या मात्र पीक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांची माहिती सहा महिन्यांपासून जुळलेली नाही. त्यामुळे लाखाहून अधिक सोयाबीन उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गत तीन-चार वर्षांपासून शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शासनाकडून ठोस अशी काहीही मदत न मिळाल्यामुळे पीक विमा योजनेने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा दिला आहे. मात्र पीक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांकडे पेरणीची सुध्दा सोय नाही ही बाब हेरुन शासनाने औरंगाबाद, नाशिक, नागपूर व अमरावती या चार विभागातील कापूस, सोयाबीन आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय फेब्रुवारी २०१६ मध्ये घेतला. औरंगाबाद आणि नाशिक विभागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तर अमरावती व नागपूर विभागातील सोयाबीन आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याची योजना शासनाने आखली. पीक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या निम्मे रक्कम मदत म्हणून देण्यासाठी या चारही विभागातील कापूस, सोयाबीन व धान उत्पादक शेतकऱ्यांची माहिती मागविण्यात आली.

बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक व पीक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. त्यामुळे प्रशासनाने पीक विमा न काढलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची माहिती शासनाला देणे अपेक्षित होते. मात्र महसूल व कृषी विभागाकडून अद्याप पर्यंतही जिल्ह्यातील पीक विमा न काढलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची माहिती शासनाला गेलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील लाखावर शेतकरी शासकीय मदतपासून वंचित आहेत. महसूल व कृषी विभागाची उदासिनताच या प्रकारासाठी कारणीभूत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.अशा प्रकारे होत आहे माहितीचे संकलनमहसूल विभागाकडे शेतकऱ्यांची आकडेवारी आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या नमूना ८-अ वरुन काढण्यात येत आहे. ही संख्या कृषी विभागाला देण्यात आली आहे. कृषी विभागाने बँकांकडून गतवर्षी खरिपाचा पीक विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांची माहिती घेतली आहे. तसेच सोयाबीनचा पेरा केलेल्या शेतकऱ्यांची माहिती या दोन्ही विभागाकडे आहे. ही सर्व माहिती एकत्रित करुन सोयाबीन उत्पादक व पीक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांची माहिती संकलीत करण्यात येत आहे. तथापी सर्वत्र डिजीटलचा बोलबाला असताना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जुळविण्यासाठी कृषी व महसूल विभागाला करावा लागणारा आटापिटा हा चर्चेचा विषय आहे. ७० हजार शेतकऱ्यांनी उतरविला नाही विमा४ सन २०१० च्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात ४ लाख ३० हजार शेतकरी असल्याची नोंद आहे. गत वर्षी ३ लक्ष ६३ हजार २४६ शेतकऱ्यांनी खरिपाचा पीक विमा उतरविलेला आहे. त्यामुळे जवळपास ७० हजार शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविलेला नाही. यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनचाच पेरा केलेला आहे. परिणामी या आकडेवारीनुसार सोयाबीन उत्पादक असे ५० हजारावर शेतकरी असण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पीक विम्यासाठी अपात्र ठरलेल्या ८६ हजार शेतकऱ्यांमध्येही सोयाबीनचा पेरा केलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १ लाखाच्यावर सोयाबीन उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.त्या ८६ हजार शेतकऱ्यांना मिळावा लाभ४गत वर्षी खरिपाचा पीक विमा न उतरविलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची ही योजना आहे. जिल्ह्यातील ३ लक्ष ६३ हजार २४६ शेतकऱ्यांनी गेल्यावर्षी पीक विमा उतरविला आहे. यापैकी ८६ हजार ३३८ शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. अपात्र ठरविण्यात आलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत मिळालेली नाही. तर पीक विमा न उतरविलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याची योजना शासनाने आखली आहे. त्यामुळे पीक विमा काढून विम्यासाठी अपात्र ठरविण्यात आलेल्या शेतकऱ्यांना या योजनेतून मदत देण्यात यावी अशी मागणी पुढे आली आहे.

२५ आॅगस्टची डेडलाईनसोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची माहिती जुळविण्यासाठी कृषी व महसूल विभागाच्या अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप पर्यंत एकाही तालुक्याची माहिती संकलीत झाली नाही. त्यामुळे सदर माहिती २५ आॅगस्टपर्यंत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.⁠⁠⁠⁠