शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

राज्यात सरासरी ७०.७४ टक्के क्षेत्रावर पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 17:54 IST

अमरावती विभागात सर्वाधिक ८६.८९ टक्के पेरणी झाली आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम : राज्यात यंदा मान्सून अपेक्षेच्या तुलनेत लवकर दाखल झाल्याने ५ जुलैपर्यंत आठही विभागात मिळून सरासरी ७०.७४ टक्के क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. कृषी विभागाच्या ३ जुलै रोजीच्या अहवालानुसार राज्यात सर्वात कमी पेरणी ठाणे विभागात झाली आहे. या विभागात ५ जुलैपर्यंत १२.१५ टक्के पेरणी झाली आहे, तर अमरावती विभागात सर्वाधिक ८६.८९ टक्के पेरणी झाली आहे. त्याखालोखाल औरंगाबाद विभागात ८६.२२ आणि नाशिक विभागात ७७.०९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात ६५ हजार १५५ हेक्टर क्षेत्रावरील ऊस पिकाच्या लागवडीचा समावेश आहे.राज्यात ऊस पिकासह खरीप हंगामात सरासरी १ कोटी ५१ लाख ३३ हजार ७६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षीत आहे. गतवर्षी पावसाळ्याला विलंब झाला आहे. त्यामुळे ३० जूनपर्यंत राज्यात केवळ ७ लाख ३६ हजार १८६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा मात्र पाऊस वेळेवर आल्याने जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला. त्यामुळे राज्यातील आठही विभागात मिळून ५ जुलैपर्यंत १ कोटी ७ लाख ५ हजार ९९३ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. तथापि, कोकण विभागात अद्यापही पेरण्यांना वेग आलेला नाही. या विभागात केवळ १२.१५ टक्के पेरणी झाली आहे. त्याशिवाय नाशिक विभागात ७७.०९, पुणे विभागात ६३.२९, कोल्हापूर विभागात ५०.८०, औरंगाबाद विभागात ८६.२२, लातूर विभागात ६९.५९, अमरावती विभागात ८६.८९, तर नागपूर विभागात ५१.३७ टक्के क्षेत्रावर खरीप पेरणी उरकली आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती