शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

‘ध्वनिक्षेपकास शिवाजी पार्कात परवानगी नाही’

By admin | Updated: January 26, 2017 05:27 IST

मुंबईच्या मध्यावर असलेले व शिवसेना, मनसेचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ‘शांतता क्षेत्रा’तील शिवाजी पार्कवर यापुढे ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी दिली जाणार नाही

मुंबई : मुंबईच्या मध्यावर असलेले व शिवसेना, मनसेचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ‘शांतता क्षेत्रा’तील शिवाजी पार्कवर यापुढे ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे आश्वासन बुधवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिले. त्याशिवाय परवानगी न घेताच, ध्वनिक्षेपक वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशीही माहिती सरकारने उच्च न्यायालयाला दिली. शिवाजी पार्क ‘शांतता क्षेत्रात’ मोडत असतानाही शिवाजी पार्क पोलिसांनी बालदिन, रथयात्रा या दिवशी या ठिकाणी ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी दिली. पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने, विकॉम ट्रस्टने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला.गेल्या सुनावणीत शिवाजी पार्क पोलिसांनी उच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागतली. मात्र, उच्च न्यायालयाने माफी देण्यापूर्वी यापुढे शिवाजी पार्कवर ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी देण्यात येणार नाही, असे आश्वासन राज्य सरकारला देण्याचा आदेश दिला. या आदेशाचे पालन करत, राज्य सरकारने यापुढे शिवाजी पार्कवर ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी देणार नाही, असे आश्वासन प्रतिज्ञापत्राद्वारे दिले. ‘परवानगी न घेताच ध्वनिक्षेपक वापरणाऱ्यांवर मुंबई पोलीस कायदा व संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल,’ असेही सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)