शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
3
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
4
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
5
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
6
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
7
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
8
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
9
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
10
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
11
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
13
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
14
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
15
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
16
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
17
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
18
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
19
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
20
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या रोखायच्या तर कर्जे माफ करा!

By admin | Updated: March 30, 2015 02:22 IST

नापिकी, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कर्जबाजारी झालेल्या एक हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी

धुळे/अमळनेर : नापिकी, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कर्जबाजारी झालेल्या एक हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पीक कर्ज माफ करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी धुळे व अमळनेर येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर चव्हाण प्रथमच धुळे व अमळनेरमध्ये आले होते. अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतकरी जेरीस आला आहे. मात्र आकाश कोसळल्यानंतरही शेतकऱ्यांकडे वसुलीचा तगादा सुरूच असल्याची टीका त्यांनी केली. इभ्रत जाण्याच्या भीतीने शेतकरी मरणाला कवटाळत असल्याचे सांगून सरकारने तत्परतेने मदत करावी, असेही ते म्हणाले. केंद्राचा भूसंपादन कायदा अत्यंत जाचक असून तो उद्योगधार्जिणा आहे. शेतकऱ्यांना जमीन संपादनाविरोधात न्यायालयातही दाद मागता येणार नाही, अशी तरतूद त्यात करण्यात आली आहे. हा कायदा रद्द करण्यासाठी जनजागृती गरजेची आहे. अमळनेर येथील मेळाव्यात चव्हाण म्हणाले, जळगाव जिल्हा काँग्रेसची स्थिती दयनीय असून, हा विचारमंथनाचा विषय झालेला आहे.