शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीतील मृत्यू अमानुष मारहाणीमुळेच, सुषमा अंधारेंचा आरोप

By नरेश डोंगरे | Updated: December 16, 2024 20:29 IST

Somnath Suryavanshi Death News: सूर्यवंशीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर तातडीने गुन्हा दाखल करा, अन्यथा आपण स्वत: परभणीत जाऊन आंदोलन करू, असा ईशारा शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिला.

- नरेश डोंगरे  नागपूर - लॉ चा स्टूडन्ट असलेल्या सोमनाथ सूर्यवंशीची कस्टडी डेथ पोलिसांनी केलेल्या अमाणूष मारहाणीमुळेच झाली. त्यामुळे सूर्यवंशीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर तातडीने गुन्हा दाखल करा, अन्यथा आपण स्वत: परभणीत जाऊन आंदोलन करू, असा ईशारा शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिला.

विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अंधारे यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत परभणी प्रकरण उचलले. त्या म्हणाल्या, कुठल्याही प्रकारचे नुकसान किंवा तोडफोडीचे समर्थन करणार नाही पण तशी वेळ कुणी आणली याची चौकशी व्हायला पाहिजे. परभणी येथील दंगल सदृश्य परिस्थितीचे सीसीटीव्ही फुटेज बघता ती स्थिती निर्माण करण्यात आल्याचा संशय येतो. मंत्रीपदासाठी शह काटशहाच्या राजकारणातून परभणी अशांत करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोपही त्यांनी केला. परभणीतील घटनेनंतर बंद पुकारण्यात आला होता. त्याच दिवशी भाजपने बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार संदर्भात मोर्चाचे आव्हान केले. जाणीवपूर्वक निळे दुपट्टे गळ्यात घालून गोंधळ निर्माण करण्यात आला. ते लोक कोण होते, असा प्रश्न करीत त्यांनी विशिष्ट लोकांवर गुन्हे दाखल करून चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. महिलेशी अश्लाघ्य वर्तन करण्यात आले. पोलीस अमानुष मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ विधी पदवीधर असलेला सोमनाथ याने तयार करण्याचा प्रयत्न केला आणि तोच त्याच्यासाठी जिवघेणा ठरला. त्याला अटक करून पोलिसांनी कोठडीत अमाणूष मारहाण केली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्युला जबाबदार असलेल्या मोंढा पोलीस स्टेशनचे निरीक्षक शरद मरे, तुरनर आणि एलसीबीचे बोरधान या तीनही पोलीस अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करा, या प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करा, दोन दिवसांत हे झाले नाही तर आपण परभणीत जाऊन तीव्र आंदोलन करू, असा इशारा अंधारे यांनी यावेळी दिला.

जबाबदारी कोण घेणारराज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी आपण आलो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. तसे असेल तर आकसबुद्धीने शिकणाऱ्या मुलांवर गुन्हे दाखल केले जाते, त्याची तसेच परभणीसह, बिड, अंबड आणि राज्यातील अन्य ठिकाणी झालेल्या गंभीर प्रकरणांची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांनी केला. आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले. मात्र, ना विरोधी पक्षनेतेपद, ना लक्षवेधी, ना प्रश्नोत्तरे अशांमध्ये देवा भाऊ, गंभीर प्रश्नांना न्याय कोण देणार, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

भुजबळ राजकीय वादाचे बळीमंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आल्याने छगन भुजबळ नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी रविवारी नागपुरात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याकडे आणि सत्कार समारंभाकडे पाठ फिरवली. लोकमतने आज हे वृत्त प्रकाशित केल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. हा मुद्दा अंधारे यांनी उचलला. भुजबळांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यामागे मराठा ओबीसी- वाद असावा, असे सांगतानाच ते राजकारणाचा बळी ठरल्याचे अंधारे म्हणाल्या. राज्यसभेवर नियुक्त करून अजितदादा त्यांचे पुनर्वसन करतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनMaharashtraमहाराष्ट्र