शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
3
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
4
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
5
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
6
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
7
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
8
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
9
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
11
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
12
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
13
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
14
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
15
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
16
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
17
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
18
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
19
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
20
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?

कुणी बुडविली काँग्रेस ?

By admin | Updated: October 21, 2014 00:59 IST

एकेकाळी नागपुरात काँग्रेसचा दबदबा होता. पक्षाच्या स्टेजवर कार्यकर्ते मावत नव्हते. एखादा मेळावा असला, निवडणूक असली की खांद्यावर काँग्रेसचा झेंडा घेऊन शेकडो कार्यकर्ते बाहेर पडायचे. कारण, आपली

आत्मचिंतन करा : गटबाजी, कार्यकर्त्यांची नाराजी अन् फितुरी भोवली कमलेश वानखेडे - नागपूरएकेकाळी नागपुरात काँग्रेसचा दबदबा होता. पक्षाच्या स्टेजवर कार्यकर्ते मावत नव्हते. एखादा मेळावा असला, निवडणूक असली की खांद्यावर काँग्रेसचा झेंडा घेऊन शेकडो कार्यकर्ते बाहेर पडायचे. कारण, आपली अडचण पक्ष सोडवेल याची कार्यकर्त्याला खात्री होती. पण अलीकडे काँग्रेसची संस्कृतीच बदलली. मंत्र्यांनी कधी जनता दरबार घेतले नाही. कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला नाही. पक्ष संघटना वाढीसाठी पाठबळ दिले नाही. नेत्यांनी कार्यकर्त्यांची आस्थेने विचारपूस केली नाही. नेत्यांनी लाल दिव्यातून फिरायचे अन् कार्यकर्त्यांनी चपलाच झिजवायच्या, असे कुठवर चालणार. कार्यकर्त्याला बळ मिळाले नाही तर तो कुठवर धावणार, याचा नेत्यांनी वेळीच विचार केला नाही. त्यामुळे कार्यकर्ता बसला आणि पर्यायानं पक्षही बसला.विधानसभा निवडणूक काँग्रेस लढली की उमेदवार, पक्ष संघटना लढली की नेत्यांचे कार्यकर्ते? निवडणुकीत पक्ष कुठे दिसला का ? असे एक ना अनेक प्रश्न आज निर्माण झाले आहेत. काँग्रेसच्या उमेदवारांनी व्यक्तिगत स्तरावर मते घेतली आहेत. पूर्ण निवडणुकीत पक्ष त्यांच्यासोबत नव्हताच. पक्षाचे संघटन फक्त मंचावर बसण्यापुरते होते. प्रचारात काँग्रेसमध्ये कुठलेही समन्वय दिसले नाही. शहर अध्यक्ष विकास ठाकरे हे स्वत: पश्चिम नागपुरातून निवडणूक लढत होते. नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद हे देखील रिंंगणात होते. नागपुरातील काँग्रेस सहा भागात विभागल्या गेली होती. सर्व मतदारसंघांच्या प्रचाराची धुरा एकहाती ठेवून काँग्रेसचा रथ पुढे दामटताना कुणी दिसले नाही. आजी- माजी खासदारांनी पुढाकार घेऊन एखाद्या अनुभवी नेत्यावर जबाबदारी सोपवून देवडियात निवडणुकीसाठी ‘वॉर रूम’ तयार करायला हवी होती. पण देवडियात सारे काही गार होते. पूर्ण निवडणूक काळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नागपुरात फक्त एक दिवस प्रचारासाठी आले. त्यांनी पूर्व नागपूर व पारशिवनी येथे जाहीर सभा घेतली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शहरात दाखल होईपर्यंत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना याची साधी माहितीदेखील नव्हती. मुख्यमंत्र्यांच्या सभेचे निरोप जाहिरात एजन्सीकडून गेले. कुणाचा पायपोस कुणात नव्हता.काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची रामटेक येथे सभा असताना नागपुरातून दिल्लीत स्थिरावलेले नेते येथे सक्रिय दिसले. पण राहुल गांधी परतल्यावर या नेत्यांनी पाहिजे तशी निवडणूक अंगावर घेतली नाही. काँग्रेसच्या प्रचारासाठी राज्यस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, महाराष्ट्राचे सहप्रभारी बाला बच्चन, रिता बहुगुणा यांच्यासह राजबब्बर व नगमा आल्या. पण त्यांचा प्रभाव मतदारांवर पडला नाही.