शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीकरांच्या मदतीसाठी धावले सोलापूरकर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 12:46 IST

ट्रकमध्ये बोटी घेऊन पोहोचले अन् सुरक्षित काढले पूरग्रस्तांना

ठळक मुद्देकृष्णेला आलेल्या पुरामुळे अवघं जीणं जलमय झालेल्या सांगलीकरांना मदतीची गरजसततच्या पावसामुळे सांगलीला कृष्णा अन् कोयनेच्या पाण्याने वेढा सोलापूर जिल्ह्यातून गेलेल्या पथकाने अतिशय नियोजनबध्द पध्दतीने काम सुरू केले

सोलापूर : कृष्णेला आलेल्या पुरामुळे अवघं जीणं जलमय झालेल्या सांगलीकरांना मदतीची गरज होती..ते जगणं असं झालंय की, मदतीची हाक देण्याचे त्राण कुणात नाहीत..पाण्याशी संघर्ष करण्यातच सांगलीकरांचा दिवस अन् रात्र जातेय..सर्वत्र दिसणाºया अन् अथांग पसरलेल्या पाण्याने भयभीत झालेल्या महिला, मुलं अन् रूग्णशय्येवर पडलेल्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याचं तर मोठं आव्हानच होतं..संकटात सापडलेल्यांच्या मदतीसाठी आपला हात पुढं करणं हा तर सोलापूरकरांचा धर्म हा धर्म सोलापूर जिल्ह्यातील युवकांनी विशेषत: मच्छिमारांनी मोठ्या निष्ठेने पाळला अन् सांगलीकरांचे जीवन सुसह्य करण्यात स्वत:त तन - मन - धन अर्पण केलं.

सततच्या पावसामुळे सांगलीला कृष्णा अन् कोयनेच्या पाण्याने वेढा दिला आहे. चौक, गल्ला तर सोडाच अगदी छोट्या बोळातही पाणी शिरलं...घरं पाण्यात गेली. या पुरात जीवन सुरक्षित करणं,हाच सध्या सांगलीकरांचा ध्यास आहे. या स्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर तसेच जिल्हा प्रशासनाने आवाहन केले अन् करमाळा तालुक्यातील मच्छिमारीचा व्यवसाय करणारे युवक स्वत:च्या होड्यांसह सज्ज झाले. 

करमाळा तालुक्यातील चिखलठाण, केत्तूर, टाकळी,  कंदर, कोंढारवाडी, रामवाडी गावातील मच्छिमारांनी आपल्या होड्या ट्रकमध्ये भरल्या अन् थेट सांगली गाठली...एकवीसजणांचे पथक आज सकाळपासून लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी होड्यांसह पाण्यात उतरले. सांगलीचे उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला हे पूर्वी करमाळयाचे मुख्याधिकारी होते. त्यांनी या पथकाला कुठल्या भागातून कुणाला कुठे सुरक्षित हलवायचे, याचे मार्गदर्शन केले. पूरग्रस्त मुलं, महिला अन् आजारी व्यक्तींना प्राधान्य देत, त्यांना सुरक्षितस्थळी हलविले...जोपर्यंत प्रत्येक सांगलीकर सुरक्षित होत नाही. तोपर्यंत थांबायचं नाही, असा या मच्छिमारांनी निर्धार व्यक्त केलायं.-११४ लोकांना सुरक्षित हलविलेसोलापूर जिल्ह्यातून गेलेल्या पथकाने अतिशय नियोजनबध्द पध्दतीने काम सुरू केले आहे. आज पहाटे सांगली पोहोचल्यानंतर त्यांनी वेगळवेगळ्या भागातील पूरस्थितीचे निरीक्षण केले. उपजिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची कुठे गरज आहे. त्या भागांचा प्राधान्यक्रम ठरविला अन् मोहीम सुरू केली. सकाळपासून ११४ जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरSangli Floodसांगली पूरwater transportजलवाहतूक