शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

सोलापूर एनटीपीसीच्या ६६० युनिट वीजनिर्मितीची चाचणी यशस्वी, दोन दिवसात वीजनिर्मिती सुरू होणार

By admin | Updated: March 28, 2017 14:52 IST

एप्रिलमध्ये होणार राष्ट्रार्पण

सोलापूरच्या एनटीपीसीच्या ६६० युनिट वीजनिर्मितीची चाचणी यशस्वी, दोन दिवसात वीजनिर्मिती सुरू होणारसोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथील एनटीपीसी प्रकल्पात पहिल्या टप्प्यातील ६६0 मेगावॅट वीजनिर्मिती चाचणी यशस्वी झाली आहे. येत्या दोन दिवसात हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. एप्रिलमध्ये शानदार कार्यक्रमाद्वारे हा प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात येईल, अशी माहिती समूह महाप्रबंधक नरेंद्र राय यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. एनटीपीसीचा प्रकल्प १३२0 मेगावॅट क्षमतेचा आहे. त्यातील पहिल्या ६६0 मेगावॅट टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी होटगी स्टेशन येथून रेल्वे लाईन टाकून महानदी (ओडिसा) प्रकल्पातून ३६00 टन कोळसा आणण्यात आला. तसेच उजनी धरणापासून ११७ किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीचे काम १२ आॅगस्ट रोजी पूर्ण झाले व डिसेंबरअखेर पाणी उपसा सुरू करण्यात आला. तत्पूर्वी पहिल्या टप्प्यातील बॉयलर २१ आॅगस्ट २0१६ रोजी पेटविण्यात आला. त्यानंतर ३0 नोव्हेंबर २0१६ रोजी स्टिम ब्लोर्इंगचे काम सुरू करण्यात आले. टर्बाईन हा प्रकल्पाचा मूळ गाभा आहे. टर्बाईन फिरताना या परिसरात काही काळ बॉयलरचा मोठा आवाज येत होता. लिंबीचिंचोळी येथील पॉवर ग्रीडला वीजजोडणी देण्यात आलेली आहे. या प्रकल्पात तयार झालेली वीज या पॉवर ग्रीडद्वारे महाराष्ट्र व इतर राज्याला वितरित होणार आहे. २३ ते २५ मार्च या काळात सलग तीन दिवस प्रकल्प क्षमतेने चालविण्यात आला. यातून निर्माण झालेली वीज ग्रीडला पुरविण्यात आली. या काळात बॉयलर, टर्बाईन व वीजनिर्मिती झाल्यानंतर ग्रीडपर्यंत वहन याच्या सर्व चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्या यशस्वी झाल्या. त्यामुळे केंद्र शासनाच्या परवानगीने येत्या दोन दिवसांत हा प्रकल्प क्षमतेने सुरू करण्यात येईल, असे राय यांनी स्पष्ट केले.-------------------असा आहे एनटीपीसी प्रकल्प...दक्षिण सोलापूर तालुक्यात फताटेवाडी, होटगी स्टेशन, आहेरवाडी परिसरात १८९२ एकरांवर हा प्रकल्प असून, सोलापूर रेल्वे स्टेशनपासून १८ कि.मी.वर आहे. १९ मार्च २0१२ रोजी हा प्रकल्प मंजूर झाला. ९ हजार ९९८ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, यातून १३२0 मेगावॅट वीज निर्मिती केली जाईल. त्यातील वीज महाराष्ट्र: ६५५.७५ मेगावॅट, मध्यप्रदेश: ३0४.६३, छत्तीसगढ: १२१.६0, गोवा: २१.७७,दमण,दीव: ७.५२, दादरा व नगर हवेली: १0.७३ व इतरसाठी १९८.00 मेगावॅट अशा पद्धतीने वितरित केली जाईल. प्रकल्पासाठी उजनी धरणातील ५२.६ एमसीएम पाणी राखीव ठेवण्यात आले आहे तर महानदी कोलमधून वर्षाला ७.५ लाख मेट्रिक टन कोळसा लागणार आहे.------------------------प्रकल्प सुरू होण्यास विलंब...प्रकल्पातील पहिला टप्पा सुरू होण्यास अनेक अडचणींमुळे एक वर्षाचा विलंब झाल्याचे राय यांनी स्पष्ट केले. त्यामध्ये जलवाहिनीचे काम, बॉयलर पुरवठा, सिव्हिल काम ही कारणे आहेत. बॉयलरचा करार जर्मन येथील हिटाशी कंपनीशी झाला होता. या कंपनीतील बदलाचा बॉयलर पुरविण्यावर परिणाम झाला. प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. २७५ मीटरची चिमणी उभारण्यात आली असून, यातून बाहेर पडणारे धूर, वाफ थंड होऊन वातावरणात मिसळेल. तसेच प्रकल्पाबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज पसरविण्यात आले. तापमान वाढेल, धुळीचे प्रदूषण होईल असे सांगण्यात येत होते. पण आता प्रकल्प सुरू होत आहे. नागरिकांनीच शहर आणि प्रकल्प परिसरातील तापमानाचा अभ्यास करावा. या प्रकल्पातून कोणतेच प्रदूषण होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे. परिसरात १ लाख ८२ हजार झाडे लावण्यात आली आहेत. भविष्यात शासनाच्या उपक्रमात कंपनी सहभागी होणार आहे. पाण्याचा थेंब अन् थेंबाचा रिसायकलिंगद्वारे वापर केला जाणार आहे. -----------------------वर्षभरात दुसरा टप्पायेत्या वर्षभरात प्रकल्पाचा दुसरा टप्पा कार्यान्वित होईल. त्याचे काम वेगात सुरू आहे. एनटीपीसी कंपनीची स्थापना १९७५ मध्ये झाली. कंपनीने देशभरात जाळे विणले आहे. सध्या ४९ हजार ९९८ मेगावॅट कंपनीची वीज उत्पादन क्षमता आहे. सोलापूरचा प्रकल्प सुरू झाल्यावर ५0 हजार मेगावॅटचाआकडा पुढे नेण्याचा विक्रम होईल, असे राय म्हणाले.