शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

"संविधान बदलाविषयी भाजपचा उमेदवार बोलला म्हणून..."; राज ठाकरेंनी खोडून काढला फडणवीसांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 10:43 IST

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर फेक नरेटिव्हबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकारे यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे.

Raj Thackeray on Fake Narrative :लोकसभा निवडणुकीत महायुतीत असलेल्या भाजपचा मोठा पराभव झाला आहे. महायुतीमध्ये मोठा भाऊ मानला जाणाऱ्या भाजपला केवळ नऊ जागा जिंकता आल्या. भाजपने त्यांच्या पराभवाचे सगळं खापर महाविकास आघाडीवर फोडलं. महाराष्ट्रात यंदा आपली लढाई चौथ्या पक्षाशी म्हणजे फेक नरेटिव्ह सोबत होती. दुर्दैवाने आपण इफेक्टिव्ह उत्तर दिलं नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पराभवाचे कारण सांगून टाकलं होतं. त्यानंतर सातत्याने देवेंद्र फडणवीस यांनी फेक नरेटिव्हवरुन विरोधकांवर टीका केली होती. मात्र आता लोकसभेला महायुतीसोबत असणाऱ्या राज ठाकरे यांनी यासाठी भाजपलाच जबाबदार धरलं आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान देशभरात संविधान बदलावरुन जोरदार चर्चा सुरु झाली होती. विरोधकांनी भाजप नेत्यांच्या भाषणाच्या आधारे संविधान बदलणार असा प्रचार केला. याचा फटका भाजपला मोठ्या प्रमाणात बसला. राज्यात भाजपच्या वाट्याल्या  ९ जागा आल्या. २०१९ ला २३ खासदार जिंकवूण आणणारा पक्ष ९ जागांवर आला. संविधान बदलाच्या चर्चांमुळे उत्तर प्रदेशातही भाजपला फटका बसला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची कारणीमीमांसा करताना आपण विरोधकांच्या फेक नरेटिव्हमुळे हरल्याचे म्हटलं.

फेक नरेटिव्ह फॅक्टरीला सोशल मीडियावर आपण तेवढ्या ताकदीने उत्तर देऊ शकलो नाही. आपली लढाई फेक नरेटिव्हशी होती. ज्या ठिकाणी आपण कमी पडलो त्या ठिकाणी त्या ठिकाणी इंडिया आघाडीशी हरलो नाही, फेक नरेटिव्हमुळे कमी पडलो आहे. संविधान बदलणार या खोट्या प्रचारामुळे या गोष्टी घडल्या, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. मात्र सोलापुरमध्ये बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे.

"संविधानाविषयी पहिल्यांदा कोण बोललं? पहिल्यांदा भाजपचा अयोध्येचा उमेदवार याबाबत बोलला. भाजपचा उमेदवार ४०० पार झाले की संविधान बदलणार हे बोलला. म्हणजे त्यांनी विरोधकांना नरेटिव्ह दिले. तोपर्यंत कुठे चर्चाही नव्हती या गोष्टीची. त्यानंतर भाजपचेच लोक याविषयी काही बोलले. तिथूनच हे सगळं सुरु झालं," असं राज ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाRaj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा