शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

"संविधान बदलाविषयी भाजपचा उमेदवार बोलला म्हणून..."; राज ठाकरेंनी खोडून काढला फडणवीसांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 10:43 IST

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर फेक नरेटिव्हबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकारे यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे.

Raj Thackeray on Fake Narrative :लोकसभा निवडणुकीत महायुतीत असलेल्या भाजपचा मोठा पराभव झाला आहे. महायुतीमध्ये मोठा भाऊ मानला जाणाऱ्या भाजपला केवळ नऊ जागा जिंकता आल्या. भाजपने त्यांच्या पराभवाचे सगळं खापर महाविकास आघाडीवर फोडलं. महाराष्ट्रात यंदा आपली लढाई चौथ्या पक्षाशी म्हणजे फेक नरेटिव्ह सोबत होती. दुर्दैवाने आपण इफेक्टिव्ह उत्तर दिलं नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पराभवाचे कारण सांगून टाकलं होतं. त्यानंतर सातत्याने देवेंद्र फडणवीस यांनी फेक नरेटिव्हवरुन विरोधकांवर टीका केली होती. मात्र आता लोकसभेला महायुतीसोबत असणाऱ्या राज ठाकरे यांनी यासाठी भाजपलाच जबाबदार धरलं आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान देशभरात संविधान बदलावरुन जोरदार चर्चा सुरु झाली होती. विरोधकांनी भाजप नेत्यांच्या भाषणाच्या आधारे संविधान बदलणार असा प्रचार केला. याचा फटका भाजपला मोठ्या प्रमाणात बसला. राज्यात भाजपच्या वाट्याल्या  ९ जागा आल्या. २०१९ ला २३ खासदार जिंकवूण आणणारा पक्ष ९ जागांवर आला. संविधान बदलाच्या चर्चांमुळे उत्तर प्रदेशातही भाजपला फटका बसला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची कारणीमीमांसा करताना आपण विरोधकांच्या फेक नरेटिव्हमुळे हरल्याचे म्हटलं.

फेक नरेटिव्ह फॅक्टरीला सोशल मीडियावर आपण तेवढ्या ताकदीने उत्तर देऊ शकलो नाही. आपली लढाई फेक नरेटिव्हशी होती. ज्या ठिकाणी आपण कमी पडलो त्या ठिकाणी त्या ठिकाणी इंडिया आघाडीशी हरलो नाही, फेक नरेटिव्हमुळे कमी पडलो आहे. संविधान बदलणार या खोट्या प्रचारामुळे या गोष्टी घडल्या, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. मात्र सोलापुरमध्ये बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे.

"संविधानाविषयी पहिल्यांदा कोण बोललं? पहिल्यांदा भाजपचा अयोध्येचा उमेदवार याबाबत बोलला. भाजपचा उमेदवार ४०० पार झाले की संविधान बदलणार हे बोलला. म्हणजे त्यांनी विरोधकांना नरेटिव्ह दिले. तोपर्यंत कुठे चर्चाही नव्हती या गोष्टीची. त्यानंतर भाजपचेच लोक याविषयी काही बोलले. तिथूनच हे सगळं सुरु झालं," असं राज ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाRaj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा