शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"संविधान बदलाविषयी भाजपचा उमेदवार बोलला म्हणून..."; राज ठाकरेंनी खोडून काढला फडणवीसांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 10:43 IST

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर फेक नरेटिव्हबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकारे यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे.

Raj Thackeray on Fake Narrative :लोकसभा निवडणुकीत महायुतीत असलेल्या भाजपचा मोठा पराभव झाला आहे. महायुतीमध्ये मोठा भाऊ मानला जाणाऱ्या भाजपला केवळ नऊ जागा जिंकता आल्या. भाजपने त्यांच्या पराभवाचे सगळं खापर महाविकास आघाडीवर फोडलं. महाराष्ट्रात यंदा आपली लढाई चौथ्या पक्षाशी म्हणजे फेक नरेटिव्ह सोबत होती. दुर्दैवाने आपण इफेक्टिव्ह उत्तर दिलं नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पराभवाचे कारण सांगून टाकलं होतं. त्यानंतर सातत्याने देवेंद्र फडणवीस यांनी फेक नरेटिव्हवरुन विरोधकांवर टीका केली होती. मात्र आता लोकसभेला महायुतीसोबत असणाऱ्या राज ठाकरे यांनी यासाठी भाजपलाच जबाबदार धरलं आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान देशभरात संविधान बदलावरुन जोरदार चर्चा सुरु झाली होती. विरोधकांनी भाजप नेत्यांच्या भाषणाच्या आधारे संविधान बदलणार असा प्रचार केला. याचा फटका भाजपला मोठ्या प्रमाणात बसला. राज्यात भाजपच्या वाट्याल्या  ९ जागा आल्या. २०१९ ला २३ खासदार जिंकवूण आणणारा पक्ष ९ जागांवर आला. संविधान बदलाच्या चर्चांमुळे उत्तर प्रदेशातही भाजपला फटका बसला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची कारणीमीमांसा करताना आपण विरोधकांच्या फेक नरेटिव्हमुळे हरल्याचे म्हटलं.

फेक नरेटिव्ह फॅक्टरीला सोशल मीडियावर आपण तेवढ्या ताकदीने उत्तर देऊ शकलो नाही. आपली लढाई फेक नरेटिव्हशी होती. ज्या ठिकाणी आपण कमी पडलो त्या ठिकाणी त्या ठिकाणी इंडिया आघाडीशी हरलो नाही, फेक नरेटिव्हमुळे कमी पडलो आहे. संविधान बदलणार या खोट्या प्रचारामुळे या गोष्टी घडल्या, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. मात्र सोलापुरमध्ये बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे.

"संविधानाविषयी पहिल्यांदा कोण बोललं? पहिल्यांदा भाजपचा अयोध्येचा उमेदवार याबाबत बोलला. भाजपचा उमेदवार ४०० पार झाले की संविधान बदलणार हे बोलला. म्हणजे त्यांनी विरोधकांना नरेटिव्ह दिले. तोपर्यंत कुठे चर्चाही नव्हती या गोष्टीची. त्यानंतर भाजपचेच लोक याविषयी काही बोलले. तिथूनच हे सगळं सुरु झालं," असं राज ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाRaj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा