शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सोलापूर महापौर निवड: एमआयएमच्या तटस्थ भूमिकेमुळे भाजपचा मार्ग सुकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 09:38 IST

महापौर आणि उपमहापौर पदासाठी बुधवारी सकाळी ११.३० वाजता निवडणूक होत आहे.

सोलापूर : महापौरपदाच्या निवडणुकीत एमआयएमच्या आठ नगरसेवकांनी तटस्थ राहावे, असे आदेश एमआयएमचे जिल्हा निरीक्षक अन्वर सादत यांनी मंगळवारी रात्री दिले. यामुळे महाआघाडीच्या गोटात खळबळ उडाली. तर भाजपच्या उमेदवार श्रीकांचना यन्नम यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे यातून स्पष्ट झाले असल्याचे बोलले जात आहे.

महापौर आणि उपमहापौर पदासाठी बुधवारी सकाळी ११.३० वाजता निवडणूक होत आहे. महापौरपदासाठी चार सदस्यांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजपकडून श्रीकांचना यन्नम तर महाविकास आघाडीने शिवसेनेच्या सारिका पिसे यांची उमेदवारी निश्चित केली आहे. १०२ सदस्य असलेल्या या महापालिकेत भाजपकडे सर्वाधिक ४९ सदस्य आहेत. भाजपनंतर शिवसेना २१, कांग्रेस १४, एमआयएम ९, राष्ट्रवादी ४ वंचित बहुजन आघाडी ३, बसपा १, माकड १ असे पक्षीय बलाबल आहे.

मात्र निवडणुकीच्यावेळी काँग्रेस आणि एमआयएमचे दोन नगरसेवक तांत्रिक कारणांमुळे बुधवारी उपस्थित नसतील. तर १०० सदस्य उपस्थित राहिल्यास बहुमतासाठी ५१ सदस्यांची आवश्यकता असेल. त्यामुळे ४९ सदस्य असलेल्या भाजपला फक्त दोन सदस्यांची आवश्यकता आहे.

तर दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडीने महाआघाडी केली असून आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला आहे. तर याच महाआघाडीत एमआयएम सुद्धा आपल्या सोबत असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. मात्र एमआयएमच्या आठ नगरसेवकांनी तटस्थ राहावे, असे आदेश एमआयएमचे जिल्हा निरीक्षक अन्वर सादत यांनी दिल्याने महाआघाडीची अडचणी वाढली आहे. तर भाजपच्या गोटात आनंदी वातावरण असून, श्रीकांचना यन्नम यांचा विजयाचा मार्ग सुकर दिसू लागला आहे.

आम्ही बंडखोरी करणारच: वल्याळ

उपमहापौरपदासाठी नऊ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. यात भाजपकडून राजेश काळे, नागेश वल्याळ, शिवसेनेचे अमोल शिंदे, भारतसिंग बडूरवाले, काँग्रेसचे फिरदोस पटेल, नरसिंग कोळी, एमआयएमच्या तस्लीम शेख, शाहजिदाबानो शेख यांचा समावेश आहे. काळे यांची निवड निश्चित मानली जात असली तरी नागेश वल्याळ बंडखोरीवर ठाम आहेत. वल्याळ यांच्यासोबत भाजपचे सात नगरसेवक आहेत. या सात जणांनी वेगळी भूमिका घेतल्यास महाआघाडीचा उमेदवार विजयी होऊ शकतो.