शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

Pension Second Wife: दुसऱ्या पत्नीला पतीच्या मृत्यूनंतर पेन्शन मिळते का? उच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 21:23 IST

Pension Second Wife Solapur: सोलापूरच्या महिलेने राज्य सरकारविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

मुंबई उच्च न्यायालयाने दुसऱ्या पत्नीचा पतीच्या निधनानंतर पेन्शनवर किती हक्क असतो याबाबत महत्वाचा निकाल दिला आहे. दुसरी पत्नी पतीच्या निधनानंतर मिळणाऱ्या पेन्शनचा लाभ घेऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. हे तेव्हाच लागू असेल जेव्हा दुसरे लग्न पहिल्या पत्नीच्या मृत्यू किंवा घटस्फोटाशिवाय झाले असेल. 

न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने सोलापूरच्या शामल टाटे यांच्या याचिकेवर हा निर्णय दिला आहे. टाटे यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. टाटे यांनी राज्य सरकारने त्यांना पेन्शनचा लाभ देण्यास नकार दिल्याविरोधात याचिका दाखल केली होती. 

शामल यांचे पती सोलापूर जिल्हा कलेक्टर कार्यालयात शिपाई होते. त्यांचा  १९९६ मध्ये मृत्यू झाला होता. महादेव यांनी पहिली पत्नी असताना दुसऱ्या महिलेशी विवाह केला होता. महादेव यांच्या मृत्यूनंतर दुसरी पत्नी शामल आणि पहिल्या पत्नीमध्ये समजुतीने पहिल्या पत्नीला पीएफच्या पैशांपैकी ९० टक्के आणि दुसऱ्या पत्नीला उरलेले १० टक्के आणि पेन्शन मिळेल असे वाटून घेतले होते. 

मात्र, काही काळाने महादेव यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. यामुळे शामल यांनी राज्य सरकारला पत्र लिहून महादेव यांच्या पेन्शनची उरलेली रक्कम द्यावी अशी मागणी केली होती. राज्य सरकारने २००७ ते १४ मध्ये शामल यांचे चार अर्ज फेटाळले. याविरोधात शामल यांनी २०१९ मध्ये उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. यावर न्यायालयाने पहिले लग्न जोवर कायदेशीर रित्या समाप्त होत नाही तोवर दुसऱ्या लग्नाला हिंदू विवाह कायद्यात मान्यता नाही. यामुळे पहिली पत्नीच कायदेशीररित्या पेन्शन मिळवू शकते. यामुळे या प्रकरणी दुसऱ्या पत्नीला पेन्शन देता येत नाही. 

टॅग्स :marriageलग्नHigh Courtउच्च न्यायालय