शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

सुशीलकुमार शिंदेंच्या पुनर्वसनावर अवलंबून काँग्रेसची मलमपट्टी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 16:19 IST

भाजपने राज्यात विधानसभेच्या २२० जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे. त्यामुळे सहाजिकच भाजपकडून तोडफोडीचे राजकारण करण्यात येण्याची शक्यता आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तसेच आपण कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस अध्यक्षपदावर राहणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे काँग्रेसमध्ये नवीन अध्यक्षचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. त्यात काही दिवसांपूर्वीच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव आले होते. शिंदे यांचे पुनर्वसन होणार या शक्यतेने सोलापूर काँग्रेसमध्ये उत्साह आला होता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर काँग्रेसला मोठे धक्के बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदेचे पुनर्वसन सोलापूर काँग्रेसला संजीवनी देणारे ठरू शकते.

भारतीय जनता पक्षाने सोलापूर काबीज करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपने राज्यात विधानसभेच्या २२० जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे. त्यामुळे सहाजिकच भाजपकडून तोडफोडीचे राजकारण करण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या सोलापूरमध्ये काँग्रेसचे तीन आमदार आहेत. त्यातच काँग्रेसच्या बऱ्याच आमदारांनी भाजपशी जवळीक करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

सोलापूरमधील प्रणिती शिंदे सोडल्यास, पंढरपूरचे आमदार भारत भालके आणि अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे हे दोन्ही काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचा चर्चा आहे. तसं झाल्यास सोलापूरमधील काँग्रेसवर मोठे संकट येण्याची शक्यता आहे. मात्र सुशीलकुमार शिंदे यांचे नाव काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत आल्यामुळे सोलापूर काँग्रेसमधील उत्साह वाढला आहे. किंबहुना शिंदे अध्यक्षपदी विराजमान झाल्यास, सोलापूरमधील अनेक नेत्यांचे पक्षांतर थांबू शकते, अशी चर्चाही काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे.

प्रणिती शिंदेसमोर 'वंचित'ला रोखण्याचे आव्हान

सोलापूर शहर उत्तर मतदार संघाच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर आपला विधानसभा मतदार संघ राखण्याचे आव्हान आहे. विधानसभेचे बिगूल वाजताच सोलापूर काँग्रेसमधील अनेक नेते पक्षांतर करण्याची शक्यता आहे. त्यातच सोलापूरमध्ये वंचितचे वाढलेले वर्चस्व प्रणिती शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी निर्माण करू शकते. लोकसभा निवडणुकीत त्याचा फटका काँग्रेसला बसलाच आहे. मात्र शिंदे यांचे पुनर्वसन झाल्यास, अनेक संकटाना तोंड देण्यास काँग्रेसला बळ मिळू शकते.