शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

समाजशास्त्रातील शेतकरी आत्महत्या प्रकरण वगळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 05:42 IST

विद्यार्थ्यांसाठी बेरोजगारी आणि कामगार चळवळींचा आशयही यंदा अभ्यासाला नाही

सीमा महांगडे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमातून २५ टक्के पाठ्यक्रम कपात करण्याचे जाहीर झाले. त्यात इयत्ता बारावीच्या समाजशास्त्र विषयातील ‘शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी’ हा धडा वगळण्यात आला. तो ‘भारतातील सामाजिक समस्या’ या पाठात समाविष्ट होता. तसेच ‘भारतातील सामाजिक चळवळी’ पाठातून कामगार चळवळींच्या संघटित प्रयत्नाचा आशयही कमी करण्यात आला आहे.दहावीच्या इतिहास विषयात ‘कला, क्रीडा, साहित्य क्षेत्र व इतिहास’ या पाचव्या प्रकरणातील भारतीय कलांचा इतिहास हा धडा वगळण्यात आला आहे. तर राज्यशास्त्राच्या सहाव्या प्रकरणातील ‘भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने’ हा धडा कमी करण्यात आला आहे.कोरोना प्रादुर्भावामुळे आॅनलाइन वर्ग सुरू आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी शिक्षण विभागाने २५ टक्के अभ्यासक्रम कपात करताना लोकशाही मूल्ये का वगळली, असा सवाल आता काही तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे.विज्ञान शाखेमध्ये ज्या ज्या प्रात्यक्षिकांमध्ये जीव विच्छेदनाची प्रक्रिया समाविष्ट आहे, ती प्रात्यक्षिके घेतली जाऊ नयेत, असे निर्देश दिले आहेत. जीवशास्त्राची प्रात्यक्षिके करताना एकच सूक्ष्मदर्शक अनेक विद्यार्थी वापरतात. त्यामुळे अशी प्रात्यक्षिकेही होणार नाहीत. अर्थातच सीबीएसईच्या प्रात्यक्षिक गुणांच्या पद्धतीप्रमाणेच राज्य मंडळाची गुणपद्धत असेल. अकरावी-बारावीच्या वर्षातील भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयांच्या एकूण प्रात्यक्षिकांपैकी ६० टक्केच प्रात्यक्षिके शिक्षकांकडून घेतली जावीत असे एससीईआरटीने सूचित केले आहे.२५ टक्के भार कोणाचा होणार कमी?प्रत्यक्ष शाळा सुरू होऊ शकत नाहीत. त्यामुळे एकूण अभ्यासक्रमातील वगळलेला २५ टक्के भाग आता शिक्षकांना शिकवावा लागणार नाही. मात्र त्यातील बराचसा भाग विद्यार्थ्यांना स्वअध्ययनासाठी दिला आहे. कमी केलेल्या भागावर प्रश्न विचारण्यात येणार नाहीत. मात्र स्वअध्ययन म्हणून दिलेला पाठ्यक्रमाचा भाग परीक्षा व मूल्यमापनासाठी असणार की नाही, याबाबत बऱ्याच विषयांमध्ये संभ्रम दिसून येत आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या