शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

समाजशास्त्रातील शेतकरी आत्महत्या प्रकरण वगळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 05:42 IST

विद्यार्थ्यांसाठी बेरोजगारी आणि कामगार चळवळींचा आशयही यंदा अभ्यासाला नाही

सीमा महांगडे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमातून २५ टक्के पाठ्यक्रम कपात करण्याचे जाहीर झाले. त्यात इयत्ता बारावीच्या समाजशास्त्र विषयातील ‘शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी’ हा धडा वगळण्यात आला. तो ‘भारतातील सामाजिक समस्या’ या पाठात समाविष्ट होता. तसेच ‘भारतातील सामाजिक चळवळी’ पाठातून कामगार चळवळींच्या संघटित प्रयत्नाचा आशयही कमी करण्यात आला आहे.दहावीच्या इतिहास विषयात ‘कला, क्रीडा, साहित्य क्षेत्र व इतिहास’ या पाचव्या प्रकरणातील भारतीय कलांचा इतिहास हा धडा वगळण्यात आला आहे. तर राज्यशास्त्राच्या सहाव्या प्रकरणातील ‘भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने’ हा धडा कमी करण्यात आला आहे.कोरोना प्रादुर्भावामुळे आॅनलाइन वर्ग सुरू आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी शिक्षण विभागाने २५ टक्के अभ्यासक्रम कपात करताना लोकशाही मूल्ये का वगळली, असा सवाल आता काही तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे.विज्ञान शाखेमध्ये ज्या ज्या प्रात्यक्षिकांमध्ये जीव विच्छेदनाची प्रक्रिया समाविष्ट आहे, ती प्रात्यक्षिके घेतली जाऊ नयेत, असे निर्देश दिले आहेत. जीवशास्त्राची प्रात्यक्षिके करताना एकच सूक्ष्मदर्शक अनेक विद्यार्थी वापरतात. त्यामुळे अशी प्रात्यक्षिकेही होणार नाहीत. अर्थातच सीबीएसईच्या प्रात्यक्षिक गुणांच्या पद्धतीप्रमाणेच राज्य मंडळाची गुणपद्धत असेल. अकरावी-बारावीच्या वर्षातील भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयांच्या एकूण प्रात्यक्षिकांपैकी ६० टक्केच प्रात्यक्षिके शिक्षकांकडून घेतली जावीत असे एससीईआरटीने सूचित केले आहे.२५ टक्के भार कोणाचा होणार कमी?प्रत्यक्ष शाळा सुरू होऊ शकत नाहीत. त्यामुळे एकूण अभ्यासक्रमातील वगळलेला २५ टक्के भाग आता शिक्षकांना शिकवावा लागणार नाही. मात्र त्यातील बराचसा भाग विद्यार्थ्यांना स्वअध्ययनासाठी दिला आहे. कमी केलेल्या भागावर प्रश्न विचारण्यात येणार नाहीत. मात्र स्वअध्ययन म्हणून दिलेला पाठ्यक्रमाचा भाग परीक्षा व मूल्यमापनासाठी असणार की नाही, याबाबत बऱ्याच विषयांमध्ये संभ्रम दिसून येत आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या