शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

समाजशास्त्रातील शेतकरी आत्महत्या प्रकरण वगळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 05:42 IST

विद्यार्थ्यांसाठी बेरोजगारी आणि कामगार चळवळींचा आशयही यंदा अभ्यासाला नाही

सीमा महांगडे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमातून २५ टक्के पाठ्यक्रम कपात करण्याचे जाहीर झाले. त्यात इयत्ता बारावीच्या समाजशास्त्र विषयातील ‘शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी’ हा धडा वगळण्यात आला. तो ‘भारतातील सामाजिक समस्या’ या पाठात समाविष्ट होता. तसेच ‘भारतातील सामाजिक चळवळी’ पाठातून कामगार चळवळींच्या संघटित प्रयत्नाचा आशयही कमी करण्यात आला आहे.दहावीच्या इतिहास विषयात ‘कला, क्रीडा, साहित्य क्षेत्र व इतिहास’ या पाचव्या प्रकरणातील भारतीय कलांचा इतिहास हा धडा वगळण्यात आला आहे. तर राज्यशास्त्राच्या सहाव्या प्रकरणातील ‘भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने’ हा धडा कमी करण्यात आला आहे.कोरोना प्रादुर्भावामुळे आॅनलाइन वर्ग सुरू आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी शिक्षण विभागाने २५ टक्के अभ्यासक्रम कपात करताना लोकशाही मूल्ये का वगळली, असा सवाल आता काही तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे.विज्ञान शाखेमध्ये ज्या ज्या प्रात्यक्षिकांमध्ये जीव विच्छेदनाची प्रक्रिया समाविष्ट आहे, ती प्रात्यक्षिके घेतली जाऊ नयेत, असे निर्देश दिले आहेत. जीवशास्त्राची प्रात्यक्षिके करताना एकच सूक्ष्मदर्शक अनेक विद्यार्थी वापरतात. त्यामुळे अशी प्रात्यक्षिकेही होणार नाहीत. अर्थातच सीबीएसईच्या प्रात्यक्षिक गुणांच्या पद्धतीप्रमाणेच राज्य मंडळाची गुणपद्धत असेल. अकरावी-बारावीच्या वर्षातील भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयांच्या एकूण प्रात्यक्षिकांपैकी ६० टक्केच प्रात्यक्षिके शिक्षकांकडून घेतली जावीत असे एससीईआरटीने सूचित केले आहे.२५ टक्के भार कोणाचा होणार कमी?प्रत्यक्ष शाळा सुरू होऊ शकत नाहीत. त्यामुळे एकूण अभ्यासक्रमातील वगळलेला २५ टक्के भाग आता शिक्षकांना शिकवावा लागणार नाही. मात्र त्यातील बराचसा भाग विद्यार्थ्यांना स्वअध्ययनासाठी दिला आहे. कमी केलेल्या भागावर प्रश्न विचारण्यात येणार नाहीत. मात्र स्वअध्ययन म्हणून दिलेला पाठ्यक्रमाचा भाग परीक्षा व मूल्यमापनासाठी असणार की नाही, याबाबत बऱ्याच विषयांमध्ये संभ्रम दिसून येत आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या