शहरं
Join us  
Trending Stories
1
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
2
भविष्यवाणी खरी ठरणार? जगन्नाथ मंदिराच्या कळसावर पक्ष्यांचे थवे, 'भविष्य मालिका' ग्रंथात उल्लेख...
3
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
4
"१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी
5
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
6
ट्रम्प टॅरिफची हवा निघाली, भारताकडून अमेरिकेची जोरदार खरेदी; चीनही टॉप ३ मध्ये, पाहा अधिक माहिती
7
२०२६ मध्ये भारतीय बाजारात 'धमाका' करण्याच्या तयारीत किआ! घेऊन येतेय ३ ढासू मॉडेल, EV चाही समावेश
8
'धुरंधर'मधला 'तो' सीन अन् सौम्या टंडनने अक्षय खन्नाच्या तब्बल ७ वेळा कानाखाली मारली, म्हणाली- "खूप वाईट..."
9
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
10
१० वर्षांची प्रतीक्षा संपली, नेपाळला जाणाऱ्यांसाठी खूशखबर; आता बिनधास्त घेऊन जा २००, ५०० ची नोट
11
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
12
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
13
Leopard Pune: 'बिबट्या दिसला तर पळू नका', पुण्यातील आयटी पार्कही दहशतीत! cognizant कंपनीने कर्मचाऱ्यांना काय सांगितलं?
14
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
15
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
16
Latur Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
17
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
18
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
19
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
20
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसांचा आठवडा; सरकारच्या निर्णयाला कोर्टात आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 04:38 IST

कामाचे ऑडिट करण्याची मागणी

मुंबई : सरकारी कार्यालयात शनिवारपासून लागू होणाऱ्या पाच दिवसांच्या आठवड्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला सोलापूरच्या एका सामाजिक कार्यकर्त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आधीच सणासुदीच्या सुट्ट्यांसह अन्य सुट्ट्या मिळत असताना आणखी सुट्ट्यांची गरज काय, असा सवाल या जनहित याचिकेद्वारे करण्यात आला आहे. या निर्णयामुळे सरकारी कार्यालयांत प्रलंबित राहणाºया कामांचे प्रमाण वाढेल. त्यामुळे सरकारने आधी कामाचे आॅडिट करावे; मगच पाच दिवसांचा आठवडा सुरू करावा, असे या याचिकेत म्हटले आहे.सोलापूरचे महेश गाडेकर यांनी राज्य सरकारच्या २४ फेब्रुवारी २०२० च्या परिपत्रकाला अ‍ॅड. विनोद सांगवीकर यांच्याद्वारे उच्च न्यायालायत आव्हान दिले. क्षुल्लक कामांसाठीही सरकारी कार्यालयांमध्ये महिनाभर वाट पाहावी लागते. या निर्णयाने सामान्य लोकांचे आणखी हाल होतील. कामकाजाची वेळ ४५ मिनिटांनी वाढविली असली तरी त्याने फारसे काही साध्य होणार नाही. हा निर्णय रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, अग्निशमन दल, पोलीस विभाग यांसारख्या सरकारी कार्यालयांना लागू होणार नाही. त्यामुळे तो सरकारी कर्मचाºयांमध्येच भेदभाव करणारा आहे, असे याचिकेत म्हटले आहे.आधीच सरकारी कर्मचाºयांना सणासुदीच्या, आजारी पडल्याबद्दल सुट्ट्या मिळतात. त्यातच त्यांचा लंच ब्रेक अर्धा तासाचा असतो तो एक तासावर जातोच. पुन्हा संध्याकाळी टी ब्रेक मिळतोच. त्यामुळे त्यांना शनिवारी सुट्टी देण्याची आवश्यकता नाही. याच्या उलट चित्र खासगी कंपन्यांमध्ये आहे. तेथील कर्मचारी चोवीस तास शिफ्टमध्ये काम करतात. त्यामुळे आउटपूट चांगला आहे. त्यांना वेळोवेळी किती काम केले, याचा लेखाजोखा मांडावा लागतो. त्यानुसार त्यांचे वेतन ठरते. मात्र, सरकारी कर्मचाºयांना दरमहा निश्चित वेतन मिळते. त्याशिवाय निरनिराळे वेतन आयोग लागू करण्यात येतात. निरनिराळे भत्तेही मिळतात. सरकारी कर्मचारी ३६५ पैकी २४९ दिवस काम करतात. तर खासगी कंपनीचा कर्मचारी ३०१ दिवस काम करतो. आयपीसी कलम ३५३ अंतर्गत एखाद्या सरकारी कर्मचाºयाला त्याचे कर्तव्य पार पाडताना अडविले तर तो दखलपात्र, अजामीनपात्र गुन्हा आहे. मात्र, त्यांनीच ठेवलेल्या प्रलंबित कामाचे काय, असा सवालही याचिकेद्वारे उपस्थित करण्यात आला आहे.सरकारचे २४ फेब्रुवारी २०२० चे परिपत्रक रद्द करावे. सरकारी कामाचे आॅडिट करावे आणि ही याचिका प्रलंबित असेपर्यंत या परिपत्रकाची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे