शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पाच दिवसांचा आठवडा; सरकारच्या निर्णयाला कोर्टात आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 04:38 IST

कामाचे ऑडिट करण्याची मागणी

मुंबई : सरकारी कार्यालयात शनिवारपासून लागू होणाऱ्या पाच दिवसांच्या आठवड्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला सोलापूरच्या एका सामाजिक कार्यकर्त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आधीच सणासुदीच्या सुट्ट्यांसह अन्य सुट्ट्या मिळत असताना आणखी सुट्ट्यांची गरज काय, असा सवाल या जनहित याचिकेद्वारे करण्यात आला आहे. या निर्णयामुळे सरकारी कार्यालयांत प्रलंबित राहणाºया कामांचे प्रमाण वाढेल. त्यामुळे सरकारने आधी कामाचे आॅडिट करावे; मगच पाच दिवसांचा आठवडा सुरू करावा, असे या याचिकेत म्हटले आहे.सोलापूरचे महेश गाडेकर यांनी राज्य सरकारच्या २४ फेब्रुवारी २०२० च्या परिपत्रकाला अ‍ॅड. विनोद सांगवीकर यांच्याद्वारे उच्च न्यायालायत आव्हान दिले. क्षुल्लक कामांसाठीही सरकारी कार्यालयांमध्ये महिनाभर वाट पाहावी लागते. या निर्णयाने सामान्य लोकांचे आणखी हाल होतील. कामकाजाची वेळ ४५ मिनिटांनी वाढविली असली तरी त्याने फारसे काही साध्य होणार नाही. हा निर्णय रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, अग्निशमन दल, पोलीस विभाग यांसारख्या सरकारी कार्यालयांना लागू होणार नाही. त्यामुळे तो सरकारी कर्मचाºयांमध्येच भेदभाव करणारा आहे, असे याचिकेत म्हटले आहे.आधीच सरकारी कर्मचाºयांना सणासुदीच्या, आजारी पडल्याबद्दल सुट्ट्या मिळतात. त्यातच त्यांचा लंच ब्रेक अर्धा तासाचा असतो तो एक तासावर जातोच. पुन्हा संध्याकाळी टी ब्रेक मिळतोच. त्यामुळे त्यांना शनिवारी सुट्टी देण्याची आवश्यकता नाही. याच्या उलट चित्र खासगी कंपन्यांमध्ये आहे. तेथील कर्मचारी चोवीस तास शिफ्टमध्ये काम करतात. त्यामुळे आउटपूट चांगला आहे. त्यांना वेळोवेळी किती काम केले, याचा लेखाजोखा मांडावा लागतो. त्यानुसार त्यांचे वेतन ठरते. मात्र, सरकारी कर्मचाºयांना दरमहा निश्चित वेतन मिळते. त्याशिवाय निरनिराळे वेतन आयोग लागू करण्यात येतात. निरनिराळे भत्तेही मिळतात. सरकारी कर्मचारी ३६५ पैकी २४९ दिवस काम करतात. तर खासगी कंपनीचा कर्मचारी ३०१ दिवस काम करतो. आयपीसी कलम ३५३ अंतर्गत एखाद्या सरकारी कर्मचाºयाला त्याचे कर्तव्य पार पाडताना अडविले तर तो दखलपात्र, अजामीनपात्र गुन्हा आहे. मात्र, त्यांनीच ठेवलेल्या प्रलंबित कामाचे काय, असा सवालही याचिकेद्वारे उपस्थित करण्यात आला आहे.सरकारचे २४ फेब्रुवारी २०२० चे परिपत्रक रद्द करावे. सरकारी कामाचे आॅडिट करावे आणि ही याचिका प्रलंबित असेपर्यंत या परिपत्रकाची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे