शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

सोशल मीडियाबाबत कायदा आणण्याचा डाव, संजय राऊत यांचे भाजपावर टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 04:25 IST

सोशल मीडियाचे अस्त्र आता भाजपावर उलटू लागले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता सोशल मीडियाबाबत कठोर कायदा आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सोशल मीडियाचे अस्त्र आता भाजपावर उलटू लागले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता सोशल मीडियाबाबत कठोर कायदा आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी केला.सोशल मीडियावर सरकारविरोधी आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी राज्यातील अनेक तरुणांना पोलिसांकरवी नोटिसा पाठविण्यात येत आहेत. या संदर्भात वृत्तवाहिन्यांशी बोलताना संजय राऊत म्हणालेकी, सोशल मीडियाद्वारे लोकांचीमने कलुषित करून भाजपा सत्तेवर आली. आता हेच अस्त्र त्यांच्यावर उलटले आहे. त्यामुळे सोशल मीडियाबाबत कठोर कायदे आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे राऊत यांनी सांगितले. देशात तालिबानी राजवट येत आहे का, असा सवाल करतानाच, सायबर सेलचे अधिकारी हे भाजपाचे एजंट असल्याचा आरोपही त्यांनी केला.गुरदासपूर आणि केरळमधील पोटनिवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला. या पराभवाचा मला आनंद नाही. मात्र, देशातील जनमत बदलत असल्याचे या निकालावरून दिसते आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांची धमकी देत, भाजपा आता मित्रपक्ष आणि विरोधी पक्षांवर दबाव टाकू शकत नाही. लोकांनी पाच वर्षांसाठी आम्हाला निवडून दिले याचे भान आम्हाला आहे, असेही राऊत म्हणाले.सोशल मीडियावरील लिखाणावरून नोटीस पाठविल्याप्रकरणी यापूर्वी शरद पवार आणि राज ठाकरे यांनीही सरकारवर टीका केली होती. सरकारच्या विरोधात मते मांडणाºया तरुणांची सरकार पोलिसांच्या माध्यमातून गळचेपी करीत असून, त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून नाहक त्रास दिला जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला होता.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाGovernmentसरकार