शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

...म्हणून वसंतदादा लोकांच्या हृदयात राहिले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 04:00 IST

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी नेहमीच सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले. म्हणूनच ते सामान्य लोकांच्याही हृदयात आपले स्थान कायम टिकवून आहेत

मुंबई : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी नेहमीच सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले. म्हणूनच ते सामान्य लोकांच्याही हृदयात आपले स्थान कायम टिकवून आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा ७०वा वर्धापन दिन आणि वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी महोत्सव समारोपानिमित्ताने परळमध्ये आयोजित कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते.पाटील म्हणाले की, वसंतदादा यांच्या साधेपणात मोठेपणा होता. ते नेहमीच स्पष्ट बोलत. सत्ता टिकविण्यासाठी त्यांनी कधी अट्टाहास केला नाही. उलट प्रसंगी सत्ता सोडण्यासाठी त्यांनी मागेपुढे पाहिलेले नाही. कोणताही निर्णय धाडसाने घेण्याची क्षमता त्यांच्यात होती. या वेळी आरएमएमएसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनीही वसंतदादा पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. अहिर म्हणाले की, वसंतदादा पाटील यांनी आरएमएमएसचे अध्यक्षस्थान भूषवून संघटनेला नवी दिशा प्राप्त करून दिली. १९८२ च्या संपात बंद पडलेल्या मुंबईतील १३ गिरण्या त्या वेळच्या केंद्र सरकारला ताब्यात घेण्यास भाग पाडून हजारो कामगारांचे उद्ध्वस्त संसार वाचविले. मुंबईतील गिरणी कामगारापासून माथाडी कामगारांपर्यंतच्या सर्वच कामगारवर्गाच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले. आंबेकर श्रम संशोधन संस्थेद्वारे ‘मानव विकास व्यवस्थापन आणि उद्योगातील सातत्य’ या विषयावर नोकरीभिमुख अभ्यासक्रम सुरू करून राज्यातील असंख्य विद्यार्थ्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करण्याची ग्वाही संघटनेचे सरचिटणीस गोविंद मोहिते यांनी दिली. मोहिते यांनी संघटनेच्या प्रदीर्घ वाटचालीचा अभ्यासपूर्ण मागोवा घेतला. तर लोकनेते वसंतरावदादा पाटील सोशल फ्रंटचे अध्यक्ष यशवंत हाप्पे यांनी वसंतदादांच्या आठवणींना उजाळा दिला.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी