शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

...म्हणून वसंतदादा लोकांच्या हृदयात राहिले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 04:00 IST

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी नेहमीच सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले. म्हणूनच ते सामान्य लोकांच्याही हृदयात आपले स्थान कायम टिकवून आहेत

मुंबई : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी नेहमीच सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले. म्हणूनच ते सामान्य लोकांच्याही हृदयात आपले स्थान कायम टिकवून आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा ७०वा वर्धापन दिन आणि वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी महोत्सव समारोपानिमित्ताने परळमध्ये आयोजित कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते.पाटील म्हणाले की, वसंतदादा यांच्या साधेपणात मोठेपणा होता. ते नेहमीच स्पष्ट बोलत. सत्ता टिकविण्यासाठी त्यांनी कधी अट्टाहास केला नाही. उलट प्रसंगी सत्ता सोडण्यासाठी त्यांनी मागेपुढे पाहिलेले नाही. कोणताही निर्णय धाडसाने घेण्याची क्षमता त्यांच्यात होती. या वेळी आरएमएमएसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनीही वसंतदादा पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. अहिर म्हणाले की, वसंतदादा पाटील यांनी आरएमएमएसचे अध्यक्षस्थान भूषवून संघटनेला नवी दिशा प्राप्त करून दिली. १९८२ च्या संपात बंद पडलेल्या मुंबईतील १३ गिरण्या त्या वेळच्या केंद्र सरकारला ताब्यात घेण्यास भाग पाडून हजारो कामगारांचे उद्ध्वस्त संसार वाचविले. मुंबईतील गिरणी कामगारापासून माथाडी कामगारांपर्यंतच्या सर्वच कामगारवर्गाच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले. आंबेकर श्रम संशोधन संस्थेद्वारे ‘मानव विकास व्यवस्थापन आणि उद्योगातील सातत्य’ या विषयावर नोकरीभिमुख अभ्यासक्रम सुरू करून राज्यातील असंख्य विद्यार्थ्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करण्याची ग्वाही संघटनेचे सरचिटणीस गोविंद मोहिते यांनी दिली. मोहिते यांनी संघटनेच्या प्रदीर्घ वाटचालीचा अभ्यासपूर्ण मागोवा घेतला. तर लोकनेते वसंतरावदादा पाटील सोशल फ्रंटचे अध्यक्ष यशवंत हाप्पे यांनी वसंतदादांच्या आठवणींना उजाळा दिला.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी