शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

...म्हणून आरक्षणाचा टक्का वाढवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 06:22 IST

आयोगाने केलेले विश्लेषण मान्य

मुंबई : मराठा समाजाला न्याय देणे, तसेच यापूर्वीच मागस प्रवर्गात समावेश केलेल्या मागास जातीस आरक्षणाच्या लाभापासून वंचित न करणे हा दुहेरी हेतून साध्य करण्यासाठी ५० टक्के आरक्षण मर्यादेचा पुनर्विचार होणे आवश्यक आहे, अशी स्पष्ट शिफारस मागासवर्ग आयोगाने केल्याने मराठा समाजाला सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक मागास प्रवर्गात १६ टक्के आरक्षण देऊन राज्यातील आरक्षणाचा टक्का ६२ पर्यंत वाढविण्यात आला आहे.

मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष् ट्या मागासलेला असल्याचे राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. आरक्षणाबाबत सांविधानिक तरतुदी पाहता एकूण लोकसंख्येच्या सुमारे ३० टक्के असणाऱ्या मराठा समाजास मागास दर्जा दिल्यानंतर जवळपास ८५ टक्के जनता मागास गणली जाणार आहे.

मराठा समाजाचा समावेश इतर मागास प्रवर्गात का केला नाही, याबाबतही आयोगाचे स्पष्टीकरण आहे. ५० टक्के आरक्षण मर्यादेचे उल्लंघन न करणे, तसेच उन्नत गटाबरोबर ठेवून असमान स्पर्धेस सामोरे जाण्यास प्रवृत्त करणे, या दोन्ही बाबींमुळे मराठा समाज पिडीत आहे. इतर मागासवर्ग यादीतील नागरिकांचा प्रवर्ग २९ टक्के आरक्षणाचा लाभ घेत आहे. या मागस प्रवर्गास त्यांच्या आरक्षणाचा लाभ लोकसंख्येच्या ३० टक्के प्रमाणात असणाºया मराठा समाजाबरोबर विभागून घेण्यास सांगितले तर मोठ्या वादविवादास निमंत्रण देणारे ठरेल, अशी भीती आयोगाने व्यक्त केली आहे.

आरक्षणाची मर्यादा ५० टक्के इतकीच ठेवल्यास त्यामधील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांचा कोटा वगळता उर्वरित २७ टक्के आरक्षणामध्ये सर्व मागासवर्ग गटांना समाविष्ट करणे म्हणजेच, उर्वरित ५० टक्के गटात अल्पसंख्यांक असणाºया उन्नत गटास प्राचीन काळापासून असलेल्या सामाजिक व शैक्षणिक प्रभुत्वास चालना देण्यासारखे होईल, असे आयोगाने म्हटले आहे.

मागास आयोगाच्या शिफारशीमाजी न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील मागासवर्ग आयोगाने मराठा समाज सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा निर्वाळा दिला असून राज्यातील सेवांमध्ये या समाजाचे प्रतिनिधित्व अपर्याप्त असल्याचे म्हटले आहे. मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणून डॉ. एस.बी. निमसे, माजी सेवानिवृत्त अधिकारी सुधीर ठाकरे, डॉ. पी.जी. येवले, डॉ. सुवर्णा रावल, प्रा. सी. बी. देशपांडे, डॉ. डी.डी. बाळसराफ, प्रा. बी.व्ही. कर्डिले, आर.व्ही. जाधव, डॉ. आर. एन. करपे यांनी काम पाहिले, तर डी.डी. देशमुख हे सदस्य सचिव होते. यापैकी डॉ. डी.डी. बाळसराफ यांच्यासह अन्य चार सदस्यांनी आपली वेगळी भूमिका मांडणारे स्वतंत्र अहवाल दिले आहेत.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण