शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

..तर मुंबईच्या नाड्या बंद करू, मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 20:46 IST

Manoj Jarange Patil: राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याची घोषणा केली आहे. मात्र सरकारने दगाफटका करण्याचा प्रयत्न केल्यास मुंबईकडे कूच करून मुंबई बंद करून टाकू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

.मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आठवडाभरापासून उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी आज अखेर आपलं उपोषण सोडलं आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याची घोषणा केली आहे. मात्र सरकारने दगाफटका करण्याचा प्रयत्न केल्यास मुंबईकडे कूच करून मुंबई बंद करून टाकू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

जरांगे पाटील उपोषण सोडताना याबाबत म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. आता जर  सरकारने दगाफटका केला, तर यांच्या पूर्ण नाड्या बंद करू. कोणत्या नाड्या बंद करायच्या तर आर्थिक आर्थिक नाडी बंद, सामाजिक, औद्योगिक, व्यावसायिक अशा सरकारच्या सगळ्या नाड्या बंद करू. चलो मुंबईची घोषणा करून मुंबई बंद करून टाकू.  असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दोन महिन्यांची म्हणजेच दोन जानेवारीपर्यंतची मुदत देत आहोत. ही सरकारला देण्यात येणारी शेवटची मुदत असेल. या मुदतीत आरक्षण मिळालं नाही तर मुंबईकडे कूच करू सरकारच्या नाड्या बंद करण्यात येतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMumbaiमुंबई