शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

...तर कित्येकांची उपासमार रोखणे शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 05:12 IST

आपण समाजात लहानाचे मोठे होतो. कोणत्या ना कोणत्या प्रकारे समाज

नितीन जगताप ।

आपण समाजात लहानाचे मोठे होतो. कोणत्या ना कोणत्या प्रकारे समाज आपल्याला काही ना काही देत असतो. यामुळेच आपण यशाच्या शिखरावर पोहोचतो. मान, सन्मान, प्रतिष्ठा मिळवितो. या समाजाच्या ऋणांची जाणीव ठेवून काही जण त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न करतात. अशांपैकीच एक म्हणजे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डी. शिवानंदन. त्यांनी ‘रोटी बँक’ची स्थापना करून कुणाचीही उपासमार होऊनये, असा वसा घेतला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती करून घेण्याचा हा प्रयत्न...प्रश्न : रोटी बँकची संकल्पना कशी सुचली?उत्तर : गडचिरोलीमध्ये तीन वर्षे पोलीस उपमहानिरीक्षक होतो. त्या वेळी तेथील गरिबी, उपासमार, कुपोषण हे जवळून पाहिले. तसेच पोलीस सेवेत असताना रस्त्यावर राहणाऱ्या मुलांमुळे गुन्हेगारी कशी वाढते हेही पाहिलेले आहे. त्यातूनच पोलिसातील माणूस जागा झाला. गुन्हेगाराला शिक्षा होणे पुरेसे नाही. गुन्हेगारी कमी करण्यासाठी मुलांना प्रगतीच्या वाटेवर घेऊन जावे, असा विचार मनात आला. त्यांच्यासाठी ठाणे, गडचिरोली, चंद्रपूर येथे तीन शाळा सुरू केल्या. पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर समाजासाठी काहीतरी करावे असा विचार सतावू लागला. कुपोषणामुळे अनेक लहान मुलांचा मृत्यू होतो, त्यामुळे याकडे लक्ष द्यायला हवे असे वाटले. यातूनच रोटी बँक उदयाला आली. २७ डिसेंबर २०१७ रोजी एका व्हॅनसोबत रोटी बँक ही स्वयंसेवी संस्था सुरू करण्यात आली.

प्रश्न : रोटी बँकेचे काम कसे चालते?उत्तर : ज्यांच्याकडे जास्त अन्न आहे त्यांनी संस्थेशी संपर्क साधायचा. २० ते ५० लोकांचे जेवण असेल तरी आम्ही गाडी पाठवतो. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे काम सुरू असते. लग्न, पार्टीचे जे जेवण असते ते उरल्यानंतर वाया जाते. पण तेच जेवण गरिबांना मिळते. कार्यालये, स्वयंपाकघरे यातील अतिरिक्त जेवण असेल तर संबंधित फोन करतात. ते अन्न गोळा केले जाते. त्याची तपासणी होते. नंतरच संस्था ते गरजू लोकांना वाटते. ६० ते ९० मिनिटांमध्ये अन्नाचे वाटप केले जाते. वितरित केलेल्या अन्नापैकी ९० टक्के ताजे तर १० टक्के लोकांकडून मिळालेले असते. टाटा कॅन्सर रुग्णालयात दररोज ४०० लोकांना जेवण देण्यात येते. दररोज एकूण तीन हजार जणांना जेवण दिले जाते.प्रश्न : रोटी बँकेचा विस्तार कसाहोत आहे?उत्तर : मुंबईत सुरुवात केली. त्यानंतर दोन वर्षांत नवी मुंबई, वसई-विरार, मीरा-भार्इंदर, ठाणे येथे त्याचा विस्तार करण्यात आला. नुकतीच नागपूर येथेही रोटी बँक सुरू करण्यात आली आहे. लवकरच ती पुण्यालाही सुरू करण्यात येईल. शाळा, कार्यालये, सभांमध्ये या उपक्रमाबाबत आम्ही माहिती देतो. सामाजिक बांधिलकीचे भान राखत लोक मोठ्या प्रमाणात देणगी देतात. सुरुवातीला जुनी गाडी वापरून आम्ही याची सुरुवात केली होती. आता देणगीतून मिळालेल्या दहा गाड्या आहेत. आणखी ५ ते ६ गाड्या देण्यासाठी लोक तयार आहेत. जेवणासोबतच काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गरजूंची आरोग्य तपासणी, उपचारही केले जातात. येत्या काळात मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देणार आहोेत.

प्रश्न : जॉय आॅफ शेअरिंग काय संकल्पना आहे?उत्तर : जॉय आॅफ शेअरिंगअंतर्गत बी-स्कूलमधील मुले स्वेच्छेने दोन चपाती जास्त आणतात. दररोज १२०० ते १६०० चपाती मिळतात. ते एका डब्यात आम्ही गोळा करतो. डाळ, भात, भाजी, फळे एकत्र जमवून गरीब मुलांना वाटतो.

प्रश्न : मोठ्या हॉटेलकडूनकसा प्रतिसाद मिळतो?उत्तर : लग्न किंवा इतर कार्यक्रम रोज नसतात. पंचतारांकित हॉटेल, क्लब उरलेले अन्न हे खत बनविण्यासाठी वापरतात. आमच्या उपक्रमात सामान्य लोक मोठ्या संख्येने सहभाग घेतात. पण मोठ्या हॉटेलकडून रोटी बँकेला कोणतीही मदत मिळत नाही. अन्न दिल्यानंतर काही झाल्यास त्रास नको म्हणून अन्न देणे ते टाळतात. परंतु ही भूमिका बदलायला हवी. अन्नाचा तुटवडा असून सर्वांनी पुढाकार घेतल्यास कित्येकांची उपासमार रोखता येईल.

प्रश्न : पुढील लक्ष्य काय आहे?उत्तर : अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. कुणीही उपाशीपोटी राहू नये हीच आमची तळमळ आहे. सुरुवातीला आम्ही हॉटेल, इतर स्वयंपाकघरात जेवण बनवत होतो. मात्र आता आम्ही आमचे स्वत:चे किचन सुरू करणार आहोत. पूर्वी आम्ही दररोज ३००० लोकांचे जेवण बनवत होतो, आता ६००० लोकांचे जेवण तयार करता येणार आहे. सध्या आम्ही वर्षाला सुमारे १० लाख लोकांना जेवण देत आहोत. २०२० या वर्षाला २० लाख लोकांना जेवण देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी लोक, कंपन्या, बँका सामाजिक दायित्वातून मदत करत आहेत. कुणीही उपाशीपोटी राहू नये यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे.

प्रश्न : लोक या उपक्रमाशी जोडले जात आहेत का?उत्तर : हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून शाळा, महाविद्यालयांत जागृती करण्यात येत आहे. याअंतर्गत आतापर्यंत दहाहून अधिक शाळा जोडल्या गेल्या आहेत. मी स्वत: जाऊन शाळा, महाविद्यालये, सभांमध्ये याची माहिती देतो. तसेच ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, विवेक ओबेरॉय, बोमन इराणी आदी जनजागृती करत आहेत.

टॅग्स :Mumbaiमुंबईfoodअन्न