शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

आतापर्यंत 1,658 महिला लढल्या, पण विजयी झाल्या फक्त 161

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 07:50 IST

२०१४ मध्ये जिंकल्या होत्या सर्वाधिक २० जणी...

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून  जाण्यासाठी १९६२ पासून २०१९ पर्यंत १ हजार ६५८ महिलांनी भाग्य आजमावले, पण त्यापैकी केवळ १० टक्के म्हणजे १६१ महिलाच आमदार बनू शकल्या. 

लोकसभा आणि विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला आहे, तो आगामी निवडणुकीत अमलात येणार नाही. २०२९ पासून हा निर्णय अमलात येण्याची शक्यता आहे. 

या पार्श्वभूमीवर पुरोगामी महाराष्ट्राने आजवर किती महिलांना विधानसभेत पाठविले यावर नजर टाकली तर महिलांना नेतृत्वाची संधी देण्याबाबत महाराष्ट्र पुरोगामी राहिलेला नाही असे  आजवरची  आकडेवारी दर्शविते.   

विधानसभेत महिलांचे प्रमाण निश्चितच वाढायला हवे. माणसाच्या जगण्याचा, त्यांच्या एकूणच विकासाचा विचार ज्या ठिकाणी होतो आणि तसे कायदे केले जातात, अशा सभागृहात संख्येने ५० टक्के असलेल्या महिलांना तेवढे तरी प्रतिनिधित्व मिळायला हवे. केवळ विधानसभाच नव्हे, तर समाजाच्या प्रत्येकच क्षेत्रात महिलांना समान संधी मिळायला हवी.  - डॉ. तारा भवाळकर, आगामी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष.

महिलेला मुख्यमंत्रिपद नाहीच महाराष्ट्रात आजवर महिलेला मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्रिपद मिळालेले नाही. विधानसभेच्या अध्यक्षपदावरही आजपर्यंत महिलेला संधी मिळालेली नाही. मध्यंतरी काँग्रेसच्या नेत्या खा. वर्षा गायकवाड यांनी महिलेला मुख्यमंत्रिपद मिळाले पाहिजे अशी भावना व्यक्त केली होती.

२०१९ च्या निवडणुकीत सर्वाधिक २४ महिला निवडून गेल्या होत्या. त्यातील वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, प्रतिभा धानोरकर (काँग्रेस) खासदार झाल्या.

१९७२ मध्ये ५१ महिला विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात होत्या पण कोणालाही विधानसभा गाठता आली नव्हती. यावेळी मोठे राजकीय पक्ष महिलांना किती संधी देतात याबाबत उत्सुकता आहे. 

महायुती सरकारमध्ये ३९ मंत्र्यांमध्ये केवळ अदिती तटकरे या एकमेव महिला होत्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर कॅबिनेट तर अदिती तटकरे या राज्यमंत्री होत्या.

टॅग्स :WomenमहिलाElectionनिवडणूक 2024