शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

...म्हणून 'अवनी' नरभक्षक झाली असेल, तिच्या जाण्याचे दु:खच : फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 14:23 IST

वाघिणीला गोळी घालून ठार मारल्याप्रकरणी देशात संतापाची लाट उसळली आहे.

मुंबई : वाघिणीला गोळी घालून ठार मारल्याप्रकरणी देशात संतापाची लाट उसळली आहे. मात्र, तेथील गावकऱ्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला आहे. यावरून वनमंत्र्यांवर टीकेची झोड उठलेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघिणीचा मृत्यू ही दुर्दैवी घटना असल्याचे म्हटले आहे. 

पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. वाघिणीच्या मृत्यूवरून कोणालाही आनंद होण्याचे कारण नाही. उलट दु:खच आहे. तिच्या मृत्यूबाबत आता काहीजण आक्षेप नोंदवत आहेत. मात्र,  वाघिणीने हल्ला केल्यानंतर बचावासाठी झालेल्या गोळीबारात ती मारली गेली असेही कारण पुढे आले आहे. आधी तिला बेशुद्ध करून पकडावे व नंतर तिचे पुनर्वसन करावे असा नियम आहे. पण त्यावेळी नेमकी काय परिस्थिती होती ते तपासून बघावे लागेल, असेही फडणवीस यांनी सांगितले. 

केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी काही आक्षेप घेतले आहेत. त्या सुरुवातीपासूनच प्राणीप्रेमी आहेत. अनेकदा त्या मला यासंदर्भात फोन करत असतात. प्राण्यांबाबतचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत त्या माझ्याकडे पाठपुरावा करत असतात. त्यांनी तीव्र शब्दात त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत, असे फडणवीस यांनी सांगितले. 

वाघ हे जंटलमन असतात. त्यांच्या क्षेत्रात जाऊन त्यांना त्रास दिला तर ते प्रतिक्रिया देतात आणि त्यातून ते नरभक्षक बनतात. या वाघिणीच्या बाबतीत पूर्वी कधीतरी असे झाले असावे, अशी शक्यताही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसManeka Gandhiमनेका गांधी