शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

‘एसएनडीटी’च्या विद्यार्थिनी निवडणार ‘स्वदिशा’

By admin | Updated: March 23, 2017 03:16 IST

गेल्या काही वर्षांत व्यवसाय, नोकरी क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे येणाऱ्या नवनवीन व्यवसायांची भाषा

मुंबई: गेल्या काही वर्षांत व्यवसाय, नोकरी क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे येणाऱ्या नवनवीन व्यवसायांची भाषा, स्वरूप बदले आहे, पण अभ्यासक्रमात व्यवसायाभिमुख बदल झालेले नाहीत. त्यामुळे पदवी घेतल्यावर नोकरीसाठी बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक समस्या असते. विद्यार्थ्यांना पदवी घेतल्यावर नोकरीसाठी वणवण करावी लागू नये, म्हणून राज्यात पहिल्यांदाच मुंबईच्या एसएनडीटी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींसाठी प्रायोगिक तत्त्वावर ‘स्वदिशा’ प्रकल्प हाती घेतला आहे. युनायटेड नेशन डेव्हलमेंट प्रोग्राम, महाराष्ट्र राज्य सरकार, तलरंग, सीसीआय आणि व्हीबॉक्स यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात ‘स्वदिशा’ हा कार्यक्रम २ मार्च रोजी सुरू करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी देशभरात सुरू असलेल्या ‘दिशा’ या कार्यक्रमांतर्गत राज्यात ‘स्वदिशा’ हा प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रकल्प एका वर्षासाठी हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पात पहिल्या पातळीवर एसएनडीटी विद्यापीठातील १५ हजार विद्यार्थिनींना त्यांच्या आवडीची नोकरी मिळावी, म्हणून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ८ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले होते. यानंतर, २१ मार्चपासून पाच दिवसीय शिक्षकांसाठी प्रशिक्षण ठेवण्यात आल्याची माहिती तलरंगच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता रैना यांनी ‘लोकमत’ला दिली.श्वेता रैना यांनी पुढे सांगितले, गेल्या काही वर्षांत व्यवसायात झालेल्या बदलांचा विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून अंदाज येत नाही. त्यामुळे पदवी हातात असतानाही विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे या विद्यापीठातील विद्यार्थिनींसाठी नोकरी मिळवून देण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पात सुरुवातीला विद्यार्थिनींची ‘सायकोमेट्रिक्स टेस्ट’ घेतली जाणार आहे. यामधून विद्यार्थिनींच्या आवडी-निवडींचा अंदाज येईल. यानंतरच्या पातळीवर तलरंगतर्फे त्यांचे मेंटॉरिंग केले जाणार आहे. विद्यार्थिनींशी चर्चा करून, त्यांच्यासमोर असलेल्या नोकरीच्या पर्यायांची त्यांना ओळख करून दिली जाणार आहे. याच्या पुढच्या टप्प्यात सीसीआयकडे हा अहवाल सादर होईल. यानंतर सीसीआयमार्फत या विद्यार्थिनींना नोकरी उपलब्ध करून दिली जाणार आहे. एका वर्षानंतर हा प्रकल्प पुढे सातत्याने चालू राहावा, म्हणून या प्रकल्पात प्राध्यापकांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे. प्राध्यापकांना आताच्या मुलांची विचारसरणी कशी आहे, त्यांना हव्या असणाऱ्या नोकऱ्या कशा आहेत, त्या मिळवण्यासाठी त्यांनी काय करणे आवश्यक आहे, याविषयी ५ दिवसीय प्रशिक्षणात माहिती दिली जाणार आहे. या विद्यार्थ्यांशी कसा संवाद साधायचा, त्यांना करिअरची नवी दारे कशी खुली करून द्यायची, याविषयी ही विशेष माहिती दिली जाणार आहे. या सर्वातून एक प्रक्रिया सुरू करणार असल्याचे श्वेता यांनी सांगितले.