शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘एसएनडीटी’च्या विद्यार्थिनी निवडणार ‘स्वदिशा’

By admin | Updated: March 23, 2017 03:16 IST

गेल्या काही वर्षांत व्यवसाय, नोकरी क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे येणाऱ्या नवनवीन व्यवसायांची भाषा

मुंबई: गेल्या काही वर्षांत व्यवसाय, नोकरी क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे येणाऱ्या नवनवीन व्यवसायांची भाषा, स्वरूप बदले आहे, पण अभ्यासक्रमात व्यवसायाभिमुख बदल झालेले नाहीत. त्यामुळे पदवी घेतल्यावर नोकरीसाठी बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक समस्या असते. विद्यार्थ्यांना पदवी घेतल्यावर नोकरीसाठी वणवण करावी लागू नये, म्हणून राज्यात पहिल्यांदाच मुंबईच्या एसएनडीटी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींसाठी प्रायोगिक तत्त्वावर ‘स्वदिशा’ प्रकल्प हाती घेतला आहे. युनायटेड नेशन डेव्हलमेंट प्रोग्राम, महाराष्ट्र राज्य सरकार, तलरंग, सीसीआय आणि व्हीबॉक्स यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात ‘स्वदिशा’ हा कार्यक्रम २ मार्च रोजी सुरू करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी देशभरात सुरू असलेल्या ‘दिशा’ या कार्यक्रमांतर्गत राज्यात ‘स्वदिशा’ हा प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रकल्प एका वर्षासाठी हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पात पहिल्या पातळीवर एसएनडीटी विद्यापीठातील १५ हजार विद्यार्थिनींना त्यांच्या आवडीची नोकरी मिळावी, म्हणून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ८ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले होते. यानंतर, २१ मार्चपासून पाच दिवसीय शिक्षकांसाठी प्रशिक्षण ठेवण्यात आल्याची माहिती तलरंगच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता रैना यांनी ‘लोकमत’ला दिली.श्वेता रैना यांनी पुढे सांगितले, गेल्या काही वर्षांत व्यवसायात झालेल्या बदलांचा विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून अंदाज येत नाही. त्यामुळे पदवी हातात असतानाही विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे या विद्यापीठातील विद्यार्थिनींसाठी नोकरी मिळवून देण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पात सुरुवातीला विद्यार्थिनींची ‘सायकोमेट्रिक्स टेस्ट’ घेतली जाणार आहे. यामधून विद्यार्थिनींच्या आवडी-निवडींचा अंदाज येईल. यानंतरच्या पातळीवर तलरंगतर्फे त्यांचे मेंटॉरिंग केले जाणार आहे. विद्यार्थिनींशी चर्चा करून, त्यांच्यासमोर असलेल्या नोकरीच्या पर्यायांची त्यांना ओळख करून दिली जाणार आहे. याच्या पुढच्या टप्प्यात सीसीआयकडे हा अहवाल सादर होईल. यानंतर सीसीआयमार्फत या विद्यार्थिनींना नोकरी उपलब्ध करून दिली जाणार आहे. एका वर्षानंतर हा प्रकल्प पुढे सातत्याने चालू राहावा, म्हणून या प्रकल्पात प्राध्यापकांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे. प्राध्यापकांना आताच्या मुलांची विचारसरणी कशी आहे, त्यांना हव्या असणाऱ्या नोकऱ्या कशा आहेत, त्या मिळवण्यासाठी त्यांनी काय करणे आवश्यक आहे, याविषयी ५ दिवसीय प्रशिक्षणात माहिती दिली जाणार आहे. या विद्यार्थ्यांशी कसा संवाद साधायचा, त्यांना करिअरची नवी दारे कशी खुली करून द्यायची, याविषयी ही विशेष माहिती दिली जाणार आहे. या सर्वातून एक प्रक्रिया सुरू करणार असल्याचे श्वेता यांनी सांगितले.