शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

सोळा हजार शेतकरी आत्महत्या अन् कर्जमाफी श्रीमंतांना : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 14:44 IST

ईडीच्या मदतीने विरोधकांचा आवाज बंद करण्यात येईल असा तुम्हाला वाटत असेल तर अशा शेकडो ईडीचं काय करायचं यासाठी आम्ही ताकदवान आहोत त्याची चिंता तुम्ही करू नका असा इशाराही पवारांनी दिला.

मुंबई - मागील पाच वर्षांपासून शेतकऱ्याला त्याच्या घामाची किंमत मिळत नाही. शेतकऱ्याला दोन पैसे मिळालेले या सत्ताधाऱ्यांना पटत नाही. देशाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असताना यांच्याकडून श्रीमंतांची थकबाकी माफ केली जाते पण शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जात नाही, त्यामुळे मागील पाच वर्षात राज्यात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे गेवराई मतदारसंघाचे उमेदवार विजयसिंह पंडित आणि बीडचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या सभेला झालेल्या गर्दीवरून या दोन्ही मतदार संघात चमत्कार होणार, असं शरद पवार यांनी म्हटले आहे.

आपल्या सर्व मित्रापक्षाकडून नव्या पिढीला नेतृत्व देण्याचे काम होत आहे. ५२ वर्षापूर्वी मी २७ वर्षाचा असताना यशवंतराव चव्हाण यांनी मला विधानसभेला उभे राहण्याची संधी दिली. त्यामुळे तरुणांना संधी देण्याची जबाबदारी माझ्यावर देखील आहे. आज मी राज्यात फिरताना पाहतोय की लोकांमध्ये या सरकारविषयी नाराजी आहे. लोकांना बदल हवाय. लोकांच्या प्रश्नासाठी आणि लोकांसाठी तुम्ही काय केलं ते सांगा. मात्र ते सांगायची तुमची लायकी नाही आणि सांगायला भांडवलही नाही. त्यामुळे विरोधकांवर तुम्ही आज खोटा खटला भरू शकता पण निकाल लागल्यावर तुमची जागा दाखवण्याचे काम तेव्हाचे सरकार करेल यात शंका नाही, असंही पवार म्हणाले.

देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणतात शरद पवारांनी काय केलं. पण अमित शाहानाच पाच वर्षापूर्वी कोणीही ओळखत नव्हते. राज्यात रोजगार हमी कायदा पहिल्यांदा आम्ही आणला, महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय आम्हीच घेतला हे सारे समजून घ्या, मग बोला. महाराष्ट्रासाठी आम्ही काय केलं हे विचारायचा अधिकार तुम्हाला नाही तो राज्याच्या जनतेला आहे.

आपल्या सत्तेचा गैरवापर करण्याचे काम आजचे सत्ताधारी करत आहेत. देशाचे माजी अर्थमंत्री चिदंबरम सरकारविरोधात बोलत असल्याने त्यांच्यावर खोटेनाटे आरोप करून महिन्याभरापूर्वी तुरुंगात घालण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले. माझ्यावर देखील आरोप करण्याचा प्रयत्न केला. ईडीच्या मदतीने विरोधकांचा आवाज बंद करण्यात येईल असा तुम्हाला वाटत असेल तर अशा शेकडो ईडीचं काय करायचं यासाठी आम्ही ताकदवान आहोत त्याची चिंता तुम्ही करू नका असा इशाराही पवारांनी दिला.