शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

सहा ऊसतोड मजुरांचा कालव्यात बुडून मृत्यू

By admin | Updated: February 20, 2015 01:21 IST

ट्रॅक्टर कालव्यात उलटून बुधवारी झालेल्या दुर्घटनेत वाहून गेलेल्या सातपैकी सहा जणांचे मृतदेह गुरुवारी कालव्यात तरंगताना आढळले. ट्रॅक्टरचालकाचा शोध सुरू आहे.

टेंभुर्णी (सोलापूर) : उजनी कालव्याच्या पुलावरून नगर जिल्ह्यातील दहिगावाचे ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांना घेऊन निघालेला ट्रॅक्टर कालव्यात उलटून बुधवारी झालेल्या दुर्घटनेत वाहून गेलेल्या सातपैकी सहा जणांचे मृतदेह गुरुवारी कालव्यात तरंगताना आढळले. ट्रॅक्टरचालकाचा शोध सुरू आहे. ट्रॅक्टरचा पाठलाग करणाऱ्या व दुर्घटनेस जबाबदार असणारे मुकादम (टोळीमालक) बाळासाहेब सोपान चंदनकर व बळीराम चंदनकर यांच्यावर टेंभुर्णी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी दुर्घटनेच्या ठिकाणापासून एका किलोमीटरवर रांझणी गावाजवळील पुलाजवळ शुभम बाळासाहेब गुंजाळ (५) याचा मृतदेह तरंगताना आढळला. तेथून पुढे काही अंतरावर हिरा राजू मोरे (२५), अर्जुन राजू मोरे (६) या मायलेकांचे मृतदेह आढळले. अकलूजजवळ कविता बाळासाहेब गुंजाळ (२५) व रांझणी पुलाजवळ कार्तिक राजू मोरे (४) आणि सुरेखा अंबादास गुंजाळ (३०, सर्व रा. दहिगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) यांचे मृतदेह सापडले. (प्रतिनिधी)गावाकडे जाताना काळाचा घालासंबंधित मजूर तीन महिन्यांपासून आलेगाव (ता. माढा) येथील बाळासाहेब सोपान चंदनकर यांच्याकडे ऊसतोड करत होते. दररोज काम मिळत नसल्याने मुकादमाकडून घेतलेले पैसे कसे फेडणार, असा प्रश्न त्यांना सतावत होता. त्यामुळे मुकादमाची नजर चुकवून हे मजूर दहिगावकडे निघाले होते. चंदनकर यांना हे समजताच त्यांनी मध्यरात्री ट्रॅक्टरचा पाठलाग केला. मात्र ते पाठलाग करत असल्याने घाबरलेल्या चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॅक्टर कालव्यात उलटला.