शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

मध्य रेल्वेच्या गर्दीच्या स्थानकावर फेरिवाल्यांमुळे परिस्थिती आणखी बिकट; डोंबिवलीतील रोजचंच मरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 15:29 IST

मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकात कल्याण दिशेकडील पादचारी पुलावर प्रचंड गर्दी होते.

ठळक मुद्देमध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकात कल्याण दिशेकडील पादचारी पुलावर प्रचंड गर्दी होते. पादचारी पुलावरुन बाहेरील बाजुला पूर्व आणि पश्चिमेकडे जेव्हा प्रवासी बाहेर येतात त्या ठिकाणी फेरिवाल्यांनी जागा अडवलेली असते.

- अनिकेत घमंडी

डोंबिवली- मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकात कल्याण दिशेकडील पादचारी पुलावर प्रचंड गर्दी होते. विशेषत: फलाट क्रमांक १, ३,४, ५ या ठिकाणी अप-डाऊनच्या जलद आणि धीम्या गतीच्या फलाटावर एकाचवेळी लोकल आली की पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होते. पादचारी पुलावरुन बाहेरील बाजुला पूर्व आणि पश्चिमेकडे जेव्हा प्रवासी बाहेर येतात त्या ठिकाणी फेरिवाल्यांनी जागा अडवलेली असते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते, कोंडी होते. चेंगराचेंगरी होते. अबालवृद्ध गरोदर मातांना मार्ग काढतांना त्रास होतो. यासंदर्भात प्रवासी संघटनांनी वेळोवेळी स्थानक प्रशासन आणि लोहमार्ग पोलीसांना सतर्क केले आहे. पण तरीही फारसा तोडगा निघत नाही.

आधीच पादचारी पुलाची रुंदी तीन दशकांपासून आहे तेवढीच असल्याने कोंडीत भर पडते. त्यातच रेल्वे हद्दीतील पुलावर फेरिवाले बसतात, सुरक्षा रक्षक त्यांना हटकवण्याचे नाटक करतात. अनेकदा चिरिमिरीसाठी हा दिखावा असल्याचा आरोप प्रवासी करतात. दोन्ही दिशेकडील स्कायवॉकवर बाहेर पडण्यासाठी फेरिवाल्यांचेच अडथळे असतात. त्यामुळे समस्या तीव्र प्रमाणात भेडसावते. मधल्या पुलावरुन येणे फारसे प्रवासी पसंत करत नाहीत. तो पुल लांब पडतो, त्यातच मानपाडा मार्गावर जाण्यासाठी पाटकर रोड, केळकर रोड आदी मार्गावरुन रिक्षा सहज मिळतात. त्यामुळे कल्याण दिशेकडील जुन्या पादचारी पुलावरुनच जाणे पसंत करतात. प्रवाशांनी आरडाओरडा केल्यानंतर आरपीएफ आणि लोहमार्ग पोलीस सुरक्षा रक्षक ठेवतात, पण ती सुविधा तोकडी असते. नावाला असते. अल्पावधीतच ती सुविधा बंद केली जाते, पुन्हा ओरडा झाला की स्थिती जैसे थे होते. ही शोकांतिका असल्याचे प्रवासी सांगतात.

- ठाकुर्ली रेल्वे स्थानकात पूर्वेकडील मुंबईच्या दिशेने असलेल्या पादचारी पुलाच्या पाय-यांची जागा ही अरुंद आहे. एकावेळी केवळ एकच व्यक्ति सुटसुटीतपणे जाऊ शकेल एवढीच जागा तेथे आहे. पण त्यासंदर्भात रेल्वे प्रशासन कानाडोळा करत आहे. त्यासाठी स्थानकाचे रिमॉडेलींग झाले तेव्हा तातडीने या पाय-यांची रुंदी वाढवावी असे आवाहन करण्यात आले होते. पण त्याकडे सोयीस्कररित्या कानाडोळा का करण्यात आला. ब्रीजवरुन जाण्यापेक्षा असंख्य प्रवासी हे रेल्वे फाटक बंद असतांनाही जीव धोक्यात घालत रुळ ओलांडत ये-जा करतात. रेल्वे प्रशासनाला प्रवाशांचे हाल, बळीच हवे आहेत का? असा सवाल संतप्त प्रवाशांनी केला.

- दिवा स्थानकात देखिल मुंबई मार्गावरील पादचारी पूलाचे पूर्वेकडे जेथे लॅडींग होते, ते लॅडींग होत असतांना प्रवाशांच्या दुतर्फा गर्दीने कोंडी होते. गेल्याच आठवड्यात प्रचंड पाऊस पडला तेव्हा देखिल ही समस्या भेडसावली होती. प्रवासी तेथे ताटकळले, गर्दी झाली होती. तेव्हा चेंगराचेंगरी झाली होती. प्रत्यक्षदर्शींनी यासंदर्भात प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. आदेश भगत यांना कळवले, त्यांनी आरपीएफ, लोहमार्ग पोलीसांना कळवले. पण ही स्थिती का यावी, पोलीस तेथे असायलाच हवे. गर्दीच्या वेळात तरी सुविधा हवीच अशी अपेक्षा दिव्यातील प्रवाशांनी केली.

- आसनगाव स्थानकातही सध्याचा पादचारी पूल हा अरुंद असून तेथेही लोकल आली की गर्दी वाढते. त्याचा त्रास प्रवाशांना होतो. तेथे आवश्यक त्या उपाययोजना व्हायला हव्यात त्या का केल्या जात नाहीत, असा टाहो प्रवाशांनी व्यक्त केला.