शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
2
Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
3
"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
4
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
5
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
6
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
7
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
8
Health Tips: हृदय विकाराच्या 'या' सात सूक्ष्म संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच करा उपाय!
9
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
10
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
11
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
12
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
13
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
14
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
15
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
16
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
17
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
18
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
19
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
20
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
Daily Top 2Weekly Top 5

‘सामाजिक न्याय’मधील भ्रष्टाचाराची एसआयटी चौकशी - मुख्यमंत्री

By यदू जोशी | Updated: December 21, 2017 03:57 IST

सामाजिक न्याय विभागात आघाडी सरकारच्या काळात २००४ ते २०१४ या काळात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या कथित घोटाळ्यांची विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली.

यदु जोशी नागपूर : सामाजिक न्याय विभागात आघाडी सरकारच्या काळात २००४ ते २०१४ या काळात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या कथित घोटाळ्यांची विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली.विरोधकांच्या प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना भाजपाचे राजेंद्र पाटणी यांनी या घोटाळ्यांची यादीच सादर केली होती. या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी एसआयटी चौकशी जाहीर केली. सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाºया आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी टीव्ही खरेदीमध्ये आर्थिक घोटाळे झाले होते. २० हजार रुपये किमतीचे टीव्ही ९० हजार रुपयांत खरेदी करण्यात आले. काही अधिकारी, कर्मचारी बरेच टीव्ही आपल्या घरी घेऊन गेले.घरकूल नाही, पण पाट्या खरेदीरमाई आवास योजनेंतर्गत घरे न बांधताच लाभार्र्थ्यांच्या घरावर लावण्यासाठीच्या पाट्यांची तब्बल १२ कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली. घरेच न बांधली गेल्याने या पाट्या तशाच पडून राहिल्या. एकेका पाटीची किंमत १५०० ते १७०० रुपये इतकी होती. या पाट्या दारावर लावण्यासाठी खरेदी केलेल्या प्रत्येकी दोन स्क्रूंची किंमत तब्बल ९० रुपये इतकी होती. लोकमतने हे प्रकरण उचलून धरले होते.मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी कोट्यवधी रुपयांची औषधी खरेदी करण्यात आली. त्यात गरज नसलेल्या औषधांचाही समावेश होता. न वापरलेली औषधी तशीच पडून राहिली. त्यांची ‘एक्सपायरी डेट’ही संपली. खरेदीचा खर्च अक्षरश: पाण्यात गेला. याशिवाय, संगणक प्रशिक्षणातही कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाले. विद्यार्थीसंख्या जादा दाखवून त्यांच्या नावावर तीन कंपन्यांना कोट्यवधी रुपयांची खैरात वाटण्यात आली. या प्रकरणात तत्कालीन मंत्री कार्यालयातील एक पीए, अन्य काही अधिकारीही गुंतलेले होते. या प्रकरणाची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत केली जात आहे. ही चौकशी एसआयटीकडे दिली जाण्याची शक्यता आहे.या घोटाळ्यांची गरज भासल्यास विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) चौकशी केली जाईल, अशी घोषणा साामजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केली. मात्र, त्यामुळे समाधान न झालेले भाजपाचे राजेंद्र पाटणी, डॉ. संजय कुटे यांनी, ‘गरज भासल्यास म्हणजे काय? एसआयटीमार्फत चौकशी होणार की नाही’ असा संतप्त सवाल केला. त्यावर, एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.फडणवीस सरकारने आज पहिल्यांदाच सामाजिक न्याय विभागातील १० वर्षांच्या घोटाळ्याची एसआयटी चौकशीची घोषणा करून काँग्रेसला लक्ष्य केले. या १० वर्षांत सामाजिक न्याय खाते हे काँग्रेसकडे होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस