शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बहिणीच्या बिदाईपूर्वीच भाऊ सरणावर

By admin | Updated: May 19, 2017 19:15 IST

बहिणीचे लग्न जुळले, हुंडाही ठरला, पत्रिकाही छापल्या; परंतु लग्नाचा खर्च काही पेलवेना

ऑनलाइन लोकमतबीड, दि. 19 - बहिणीचे लग्न जुळले, हुंडाही ठरला, पत्रिकाही छापल्या; परंतु लग्नाचा खर्च काही पेलवेना. त्यामुळे निराश झालेल्या भावाने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नांदलगावात घडली. बहिणीची बिदाई करण्यापूर्वीच भाऊ सरणावर गेल्याच्या या हृदयद्रावक घटनेने तालुका सुन्न झाला आहे. या घटनेने हुंड्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.नवनाथ बाबासाहेब गावडे (१९, रा. नांदलगाव) असे मयताचे नाव आहे. बाबासाहेब गावडे यांना तीन मुली, दोन मुले. गाठीशी असलेल्या चार एकर शेतीत राबून हे कुटुंब उदरनिर्वाह भागवते. त्यांच्या दोन मुलींचे विवाह झाले असून, तिसरीही उपवर झाल्याने तिच्यासाठी वर शोधण्यात आला. आधीच दोन मुलींच्या लग्नावर बाबासाहेब गावडेंचा लाखोंचा खर्च झाला होता. त्यात तिसऱ्या मुलीचे लग्न जुळल्यामुळे त्यांनी पैशांची जुळवाजुळव सुरु केली. ३१ मे रोजी लग्नमुहूर्त ठरला होता. त्यापूर्वी हुंडा, बस्ता, संसारोपयोगी साहित्य, मंडप, जेवण आदी खर्चासाठी त्यांना लाखो रुपयांची गरज होती. त्यांच्यावर आधीच कर्जाचा डोंगर असल्याने कर्ज देण्यास कोणी धजावत नव्हते. नातेवाईक, मित्र परिवारानेही आखडता हात घेतला, बँक दारात उभे करीना त्यामुळे बाबासाहेब बेचैन झाले होते. त्यांचा मुलगा नवनाथही चिंताग्रस्त होता.  वधू- वर पक्षाकडील मंडळींनी लग्नाची जोरात तयारी केली; परंतु पैशांची तरतूद होत नसल्याने बाबासाहेब यांचा थोरला मुलगा नवनाथ गावडे याने स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. तलवाडा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकामी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. शोकाकूल वातावरणात शुक्रवारी नवनाथवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तलवाडा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.बाबासाहेब गावडे यांच्या तिसऱ्या मुलीसाठी लाखो रुपयांचा हुंडा देण्याचे निश्चित झाले होते. ३१ मे रोजी विवाह सोहळा असल्याने त्यापूर्वीच हुंडा द्यायचा होता. मात्र, लग्नखर्चासोबतच हुंड्याची रक्कम जुळविणे गावडे कुटुंबियांना मुश्किल बनले होते. त्यामुळे नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या नवनाथने टोकाचे पाऊल उचलले. त्यामुळे लग्नघरच्या आनंदावर दु:खाचे विघ्न पडले आहे.