शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

एकच चर्चा ; मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंचा फोन बारामतीला, की उपमुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 13:14 IST

शिवसेनेने आधीच भाजपला 50-50 च्या फॉर्म्युल्याची आठवण करून दिली आहे. त्यामुळे शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक होण्याची शक्यता आहे. मात्र निवडून आलेल्या जागा पाहता, भाजप उपमुख्यमंत्री पद देण्यास राजी होईल अशी शक्यता आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेने कोणत्याही एका पक्षाला कौल दिला नाही. त्यामुळे कोणताही पक्ष एकट्याने सरकार स्थापनेचा दावा करू शकत नाही. अशा स्थितीत दोन किंवा तीन पक्षांना एकत्र येऊन सत्तास्थापनेसाठी दावा करावा लागणार आहे. यात आता शिवसेनेला चांगलीच डिमांड आली आहे.

2014 मध्ये लागलेल्या निकालाप्रमाणेच हा निकाल असून यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या जागा घटल्या आहे. तर विरोधी पक्षावर जनतेचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. गेल्यावेळी भाजपला 122 जागा मिळाल्या होत्या. त्याचवेळी शरद पवारांनी बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दाखवल्यामुळे शिवसेनेची किंमत झटक्यात कमी झाली होती. अशा स्थितीत भाजपने सरकार स्थापन केले होते. तर शिवसेना विरोधी बाकावर बसली होती. मात्र भाजपने हिंदूत्ववादी विचारसरणी म्हणून शिवसेनेला सोबत घेतले. परंतु, सबंध पाच वर्षे सत्तेत शिवसेनाला सावत्र भावाची वागणूक मिळाली. त्यामुळे शिवसेनेना सत्तेत असून पाच वर्षे विरोधकांच्या भूमिकेत दिसली.

दरम्यान नुकत्याच लागलेल्या विधानसभा निकालात शिवसेना आणि भाजपला काही जागांचे नुकसान झाले. मात्र युतीला सत्तास्थापनेसाठी हव्या असलेल्या जागा उभय पक्षांना मिळाल्या आहेत. आता भाजपसोबत गेल्यास शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळणार हे निश्चित आहे. मात्र सेनेच्या महत्त्वकांक्षा वाढल्या आहेत. अशा स्थितीत काँग्रेसने शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊ केली आहे. राज्य पातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी संदर्भातील महत्त्वाचे निर्णय शरद पवार यांच्याकडेच सोपविण्यात आले आहेत. त्यामुळे शिवसेनेसोबत जाण्याच्या निर्णयात पवारच मुख्य भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे बारामती पुन्हा एकदा चर्चेत येणार असं दिसत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद अशा दोन ऑफर आहेत. त्यातील मुख्यमंत्रीपदाची ऑफर घेण्यासाठी त्यांना बारामतीला फोन करावा लागणार आहे. तर उपमुख्यमंत्रीपदासाठी त्यांना भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना दिल्लीत फोन करावा लागणार आहे. आता उद्धव बारामतीला फोन लावणार की, दिल्लाला असा प्रश्न सोशल मीडियावर चर्चीला जात आहे.

शिवसेनेने आधीच भाजपला 50-50 च्या फॉर्म्युल्याची आठवण करून दिली आहे. त्यामुळे शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक होण्याची शक्यता आहे. मात्र निवडून आलेल्या जागा पाहता, भाजप उपमुख्यमंत्री पद देण्यास राजी होईल अशी शक्यता आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.