शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

एकच चर्चा ; मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंचा फोन बारामतीला, की उपमुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 13:14 IST

शिवसेनेने आधीच भाजपला 50-50 च्या फॉर्म्युल्याची आठवण करून दिली आहे. त्यामुळे शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक होण्याची शक्यता आहे. मात्र निवडून आलेल्या जागा पाहता, भाजप उपमुख्यमंत्री पद देण्यास राजी होईल अशी शक्यता आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेने कोणत्याही एका पक्षाला कौल दिला नाही. त्यामुळे कोणताही पक्ष एकट्याने सरकार स्थापनेचा दावा करू शकत नाही. अशा स्थितीत दोन किंवा तीन पक्षांना एकत्र येऊन सत्तास्थापनेसाठी दावा करावा लागणार आहे. यात आता शिवसेनेला चांगलीच डिमांड आली आहे.

2014 मध्ये लागलेल्या निकालाप्रमाणेच हा निकाल असून यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या जागा घटल्या आहे. तर विरोधी पक्षावर जनतेचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. गेल्यावेळी भाजपला 122 जागा मिळाल्या होत्या. त्याचवेळी शरद पवारांनी बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दाखवल्यामुळे शिवसेनेची किंमत झटक्यात कमी झाली होती. अशा स्थितीत भाजपने सरकार स्थापन केले होते. तर शिवसेना विरोधी बाकावर बसली होती. मात्र भाजपने हिंदूत्ववादी विचारसरणी म्हणून शिवसेनेला सोबत घेतले. परंतु, सबंध पाच वर्षे सत्तेत शिवसेनाला सावत्र भावाची वागणूक मिळाली. त्यामुळे शिवसेनेना सत्तेत असून पाच वर्षे विरोधकांच्या भूमिकेत दिसली.

दरम्यान नुकत्याच लागलेल्या विधानसभा निकालात शिवसेना आणि भाजपला काही जागांचे नुकसान झाले. मात्र युतीला सत्तास्थापनेसाठी हव्या असलेल्या जागा उभय पक्षांना मिळाल्या आहेत. आता भाजपसोबत गेल्यास शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळणार हे निश्चित आहे. मात्र सेनेच्या महत्त्वकांक्षा वाढल्या आहेत. अशा स्थितीत काँग्रेसने शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊ केली आहे. राज्य पातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी संदर्भातील महत्त्वाचे निर्णय शरद पवार यांच्याकडेच सोपविण्यात आले आहेत. त्यामुळे शिवसेनेसोबत जाण्याच्या निर्णयात पवारच मुख्य भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे बारामती पुन्हा एकदा चर्चेत येणार असं दिसत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद अशा दोन ऑफर आहेत. त्यातील मुख्यमंत्रीपदाची ऑफर घेण्यासाठी त्यांना बारामतीला फोन करावा लागणार आहे. तर उपमुख्यमंत्रीपदासाठी त्यांना भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना दिल्लीत फोन करावा लागणार आहे. आता उद्धव बारामतीला फोन लावणार की, दिल्लाला असा प्रश्न सोशल मीडियावर चर्चीला जात आहे.

शिवसेनेने आधीच भाजपला 50-50 च्या फॉर्म्युल्याची आठवण करून दिली आहे. त्यामुळे शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक होण्याची शक्यता आहे. मात्र निवडून आलेल्या जागा पाहता, भाजप उपमुख्यमंत्री पद देण्यास राजी होईल अशी शक्यता आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.