शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

एकच चर्चा ; मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंचा फोन बारामतीला, की उपमुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 13:14 IST

शिवसेनेने आधीच भाजपला 50-50 च्या फॉर्म्युल्याची आठवण करून दिली आहे. त्यामुळे शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक होण्याची शक्यता आहे. मात्र निवडून आलेल्या जागा पाहता, भाजप उपमुख्यमंत्री पद देण्यास राजी होईल अशी शक्यता आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेने कोणत्याही एका पक्षाला कौल दिला नाही. त्यामुळे कोणताही पक्ष एकट्याने सरकार स्थापनेचा दावा करू शकत नाही. अशा स्थितीत दोन किंवा तीन पक्षांना एकत्र येऊन सत्तास्थापनेसाठी दावा करावा लागणार आहे. यात आता शिवसेनेला चांगलीच डिमांड आली आहे.

2014 मध्ये लागलेल्या निकालाप्रमाणेच हा निकाल असून यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या जागा घटल्या आहे. तर विरोधी पक्षावर जनतेचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. गेल्यावेळी भाजपला 122 जागा मिळाल्या होत्या. त्याचवेळी शरद पवारांनी बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दाखवल्यामुळे शिवसेनेची किंमत झटक्यात कमी झाली होती. अशा स्थितीत भाजपने सरकार स्थापन केले होते. तर शिवसेना विरोधी बाकावर बसली होती. मात्र भाजपने हिंदूत्ववादी विचारसरणी म्हणून शिवसेनेला सोबत घेतले. परंतु, सबंध पाच वर्षे सत्तेत शिवसेनाला सावत्र भावाची वागणूक मिळाली. त्यामुळे शिवसेनेना सत्तेत असून पाच वर्षे विरोधकांच्या भूमिकेत दिसली.

दरम्यान नुकत्याच लागलेल्या विधानसभा निकालात शिवसेना आणि भाजपला काही जागांचे नुकसान झाले. मात्र युतीला सत्तास्थापनेसाठी हव्या असलेल्या जागा उभय पक्षांना मिळाल्या आहेत. आता भाजपसोबत गेल्यास शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळणार हे निश्चित आहे. मात्र सेनेच्या महत्त्वकांक्षा वाढल्या आहेत. अशा स्थितीत काँग्रेसने शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊ केली आहे. राज्य पातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी संदर्भातील महत्त्वाचे निर्णय शरद पवार यांच्याकडेच सोपविण्यात आले आहेत. त्यामुळे शिवसेनेसोबत जाण्याच्या निर्णयात पवारच मुख्य भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे बारामती पुन्हा एकदा चर्चेत येणार असं दिसत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद अशा दोन ऑफर आहेत. त्यातील मुख्यमंत्रीपदाची ऑफर घेण्यासाठी त्यांना बारामतीला फोन करावा लागणार आहे. तर उपमुख्यमंत्रीपदासाठी त्यांना भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना दिल्लीत फोन करावा लागणार आहे. आता उद्धव बारामतीला फोन लावणार की, दिल्लाला असा प्रश्न सोशल मीडियावर चर्चीला जात आहे.

शिवसेनेने आधीच भाजपला 50-50 च्या फॉर्म्युल्याची आठवण करून दिली आहे. त्यामुळे शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक होण्याची शक्यता आहे. मात्र निवडून आलेल्या जागा पाहता, भाजप उपमुख्यमंत्री पद देण्यास राजी होईल अशी शक्यता आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.