शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

एकच चर्चा ; मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंचा फोन बारामतीला, की उपमुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 13:14 IST

शिवसेनेने आधीच भाजपला 50-50 च्या फॉर्म्युल्याची आठवण करून दिली आहे. त्यामुळे शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक होण्याची शक्यता आहे. मात्र निवडून आलेल्या जागा पाहता, भाजप उपमुख्यमंत्री पद देण्यास राजी होईल अशी शक्यता आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेने कोणत्याही एका पक्षाला कौल दिला नाही. त्यामुळे कोणताही पक्ष एकट्याने सरकार स्थापनेचा दावा करू शकत नाही. अशा स्थितीत दोन किंवा तीन पक्षांना एकत्र येऊन सत्तास्थापनेसाठी दावा करावा लागणार आहे. यात आता शिवसेनेला चांगलीच डिमांड आली आहे.

2014 मध्ये लागलेल्या निकालाप्रमाणेच हा निकाल असून यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या जागा घटल्या आहे. तर विरोधी पक्षावर जनतेचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. गेल्यावेळी भाजपला 122 जागा मिळाल्या होत्या. त्याचवेळी शरद पवारांनी बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दाखवल्यामुळे शिवसेनेची किंमत झटक्यात कमी झाली होती. अशा स्थितीत भाजपने सरकार स्थापन केले होते. तर शिवसेना विरोधी बाकावर बसली होती. मात्र भाजपने हिंदूत्ववादी विचारसरणी म्हणून शिवसेनेला सोबत घेतले. परंतु, सबंध पाच वर्षे सत्तेत शिवसेनाला सावत्र भावाची वागणूक मिळाली. त्यामुळे शिवसेनेना सत्तेत असून पाच वर्षे विरोधकांच्या भूमिकेत दिसली.

दरम्यान नुकत्याच लागलेल्या विधानसभा निकालात शिवसेना आणि भाजपला काही जागांचे नुकसान झाले. मात्र युतीला सत्तास्थापनेसाठी हव्या असलेल्या जागा उभय पक्षांना मिळाल्या आहेत. आता भाजपसोबत गेल्यास शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळणार हे निश्चित आहे. मात्र सेनेच्या महत्त्वकांक्षा वाढल्या आहेत. अशा स्थितीत काँग्रेसने शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊ केली आहे. राज्य पातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी संदर्भातील महत्त्वाचे निर्णय शरद पवार यांच्याकडेच सोपविण्यात आले आहेत. त्यामुळे शिवसेनेसोबत जाण्याच्या निर्णयात पवारच मुख्य भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे बारामती पुन्हा एकदा चर्चेत येणार असं दिसत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद अशा दोन ऑफर आहेत. त्यातील मुख्यमंत्रीपदाची ऑफर घेण्यासाठी त्यांना बारामतीला फोन करावा लागणार आहे. तर उपमुख्यमंत्रीपदासाठी त्यांना भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना दिल्लीत फोन करावा लागणार आहे. आता उद्धव बारामतीला फोन लावणार की, दिल्लाला असा प्रश्न सोशल मीडियावर चर्चीला जात आहे.

शिवसेनेने आधीच भाजपला 50-50 च्या फॉर्म्युल्याची आठवण करून दिली आहे. त्यामुळे शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक होण्याची शक्यता आहे. मात्र निवडून आलेल्या जागा पाहता, भाजप उपमुख्यमंत्री पद देण्यास राजी होईल अशी शक्यता आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.