शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

हल्लीचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत; कार्यकर्त्यांसमोर अजित पवार काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 20:27 IST

आपली महायुती असल्यामुळे युतीत अंतर पडेल असे काम कुणाकडून होता कामा नये किंवा चुकीचे वक्तव्य कुणाकडून येता कामा नये असं अजितदादांनी कार्यकर्ते, नेत्यांना कानमंत्र दिला.

मुंबई -  हल्ली ज्याच्या त्याच्या पाया पडण्याची एक पद्धत सुरू झाली आहे. आपल्या आई-वडिलांच्या पहिल्यांदा पाया पडा पण तसं होत नाही, पुढाऱ्यांच्याच पाया पडताना जास्त लोक दिसतात. मात्र अलिकडे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत असं स्पष्ट विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांसमोर केले आहे. 

काँग्रेस सेवादलाच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी अजित पवारांनी हे विधान केले. ते म्हणाले की, पक्षात येणाऱ्यांची जनमानसात प्रतिमा चांगली असली पाहिजे. चुकीचे काम केलेले असेल त्यावर पांघरूण घालण्यासाठी कोण येत असेल तर त्यांनी ते पहिल्यांदा डोक्यातून काढून टाकावे. मला कायदा श्रेष्ठ वाटतो आणि मी कायद्याचा आदर करतो. चुकीचे समर्थन करणार नाही. दिशाभूल करुन काम फारकाळ टिकत नाही. होणार नसेल तर काम होणार नाही हे आम्ही स्पष्ट करतो असं त्यांनी सांगितले. 

तसेच यापुढे सेवादलाचे काम जोमाने करायचे आहे. आजची पिढी सेवादलाकडे जात नाही. पण चंद्रकांत दायमा यांनी सेवादल हा आपला परिवार समजून काम केले आहे. चंद्रकांत दायमा यांचे काम एकत्रित कॉंग्रेस असताना एकदम जवळून पाहिले आहे.  सेवादलाची शिस्त कशी पुढे नेता येईल यासाठी ते काम करत आले आणि आजही ती शिस्त पुढे नेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व घटकांना घेऊन स्वराज्य निर्माण केले तसे काम आपल्या या पक्षात झाले पाहिजे. महिलांचा, वडिलधारी लोकांचा मानसन्मान ठेवला गेला पाहिजे. या कृतीने काम करा असं अजित पवारांनी सांगितले. 

दरम्यान, आपली महायुती असल्यामुळे युतीत अंतर पडेल असे काम कुणाकडून होता कामा नये किंवा चुकीचे वक्तव्य कुणाकडून येता कामा नये. पक्षाला अडचण निर्माण होईल आणि राज्यातील लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल असे वक्तव्य करु नये, भान ठेवून वक्तव्य करा. सर्वधर्मसमभावाची भूमिका आपल्या पक्षाची आहे. शिव - शाहू - फुले - आंबेडकरांच्या विचाराने सुरु असलेले हे राज्य आम्ही पुढे नेत आहोत म्हणूनच आम्ही केलेल्या कामाला त्यांचा आशीर्वाद मिळाला आहे. आता लोकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. प्रचंड बहुमताने राज्यात सत्ता आली आहे असा कानमंत्र अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार