शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

हल्लीचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत; कार्यकर्त्यांसमोर अजित पवार काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 20:27 IST

आपली महायुती असल्यामुळे युतीत अंतर पडेल असे काम कुणाकडून होता कामा नये किंवा चुकीचे वक्तव्य कुणाकडून येता कामा नये असं अजितदादांनी कार्यकर्ते, नेत्यांना कानमंत्र दिला.

मुंबई -  हल्ली ज्याच्या त्याच्या पाया पडण्याची एक पद्धत सुरू झाली आहे. आपल्या आई-वडिलांच्या पहिल्यांदा पाया पडा पण तसं होत नाही, पुढाऱ्यांच्याच पाया पडताना जास्त लोक दिसतात. मात्र अलिकडे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत असं स्पष्ट विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांसमोर केले आहे. 

काँग्रेस सेवादलाच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी अजित पवारांनी हे विधान केले. ते म्हणाले की, पक्षात येणाऱ्यांची जनमानसात प्रतिमा चांगली असली पाहिजे. चुकीचे काम केलेले असेल त्यावर पांघरूण घालण्यासाठी कोण येत असेल तर त्यांनी ते पहिल्यांदा डोक्यातून काढून टाकावे. मला कायदा श्रेष्ठ वाटतो आणि मी कायद्याचा आदर करतो. चुकीचे समर्थन करणार नाही. दिशाभूल करुन काम फारकाळ टिकत नाही. होणार नसेल तर काम होणार नाही हे आम्ही स्पष्ट करतो असं त्यांनी सांगितले. 

तसेच यापुढे सेवादलाचे काम जोमाने करायचे आहे. आजची पिढी सेवादलाकडे जात नाही. पण चंद्रकांत दायमा यांनी सेवादल हा आपला परिवार समजून काम केले आहे. चंद्रकांत दायमा यांचे काम एकत्रित कॉंग्रेस असताना एकदम जवळून पाहिले आहे.  सेवादलाची शिस्त कशी पुढे नेता येईल यासाठी ते काम करत आले आणि आजही ती शिस्त पुढे नेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व घटकांना घेऊन स्वराज्य निर्माण केले तसे काम आपल्या या पक्षात झाले पाहिजे. महिलांचा, वडिलधारी लोकांचा मानसन्मान ठेवला गेला पाहिजे. या कृतीने काम करा असं अजित पवारांनी सांगितले. 

दरम्यान, आपली महायुती असल्यामुळे युतीत अंतर पडेल असे काम कुणाकडून होता कामा नये किंवा चुकीचे वक्तव्य कुणाकडून येता कामा नये. पक्षाला अडचण निर्माण होईल आणि राज्यातील लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल असे वक्तव्य करु नये, भान ठेवून वक्तव्य करा. सर्वधर्मसमभावाची भूमिका आपल्या पक्षाची आहे. शिव - शाहू - फुले - आंबेडकरांच्या विचाराने सुरु असलेले हे राज्य आम्ही पुढे नेत आहोत म्हणूनच आम्ही केलेल्या कामाला त्यांचा आशीर्वाद मिळाला आहे. आता लोकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. प्रचंड बहुमताने राज्यात सत्ता आली आहे असा कानमंत्र अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार