शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

नाशिकमध्ये इन्कम टॅक्सच्या छापेमारीनंतर रखडलेले कांद्याचे लिलाव सुरू; लासलगावमध्ये अजूनही लिलाव बंदच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 15:07 IST

नाशिकमध्ये गेल्या 4 दिवसांपासून रखडलेले कांद्याचे लिलाव आज पुन्हा सुरू झाले आहेत. 

ठळक मुद्दे नाशिकमध्ये गेल्या 4 दिवसांपासून रखडलेले कांद्याचे लिलाव आज पुन्हा सुरू झाले आहेत. लासलगाव वगळता इतर सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचा लिलाव सुरू झाल्याचं समजतं आहे. जिल्हाधिकारी आणि व्यापाऱ्यांची एक बैठकही घेण्यात आली. यानंतर छाप्यानंतरचा वाद थोडा निवळलेला दिसतो आहे, असं बोललं जात आहे.

नाशिक, दि. 18- तीन दिवसांच्या बंदनंतर लासलगाव वगळता जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोमवारी लिलाव सुरू झाला. उमराणे बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल सर्वोच्च बाजारभाव १४०१ मिळाला. लिलाव सुरु होण्याआधी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मागील आठवड्यात गुरु वारी साठेबाजीच्या नावाखाली आयकर विभागाने जिल्ह्यातील प्रमुख बाजारसमितीतील कांदा व्यापाºयांकडे धाडी टाकल्याने कांदा व्यापाºयांकडून बंद पुकारला होता.त्यात उमराणे येथील व्यापारी खंडु देवरे यांचेकडेही आयकर विभागाने धाड टाकल्याने येथील व्यापारी असोसिएशनतर्फे माल निकाशी होत नसल्याचे कारण देत २५ सप्टेंबर पर्यंत लिलाव बंदचे निवेदन बाजार समितीला देण्यात आले होते. मात्र काल जिल्हाधिकारी व व्यापारी यांची बैठक होऊन बाजार समितीचे लिलाव पुर्ववत सुरु करण्याचे आदेश दिल्याने उमराणे बाजार समतिीचे लिलाव पुर्ववत सुरु झाले आहेत.लिलाव सुरु होतात की नाही याबद्दल शेतकरी वर्गात संभ्रम असल्याने सकाळच्या सत्रात कांदा आवक कमी होती.शिवाय भाव काय निघतात याबाबतही शंका होती. परंतु भाव समाधानकारक निघाल्याने लिलाव सुरळीत सुरु झाला आहे. बाजारभाव कमीतकमी ५०० रु पये,जास्तीत जास्त १४०१ रु पये तर सरासरी भाव १२०० रु पयांपर्यंत होते. दरम्यान, सकाळपासूनच देवळा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

काय आहे नेमके प्रकरण?जिल्ह्यात कांदा व्यापा-यांवर प्राप्तिकर विभागाने घातलेल्या धाडींचा शेतक-यांना फटका बसला आहे. या धाडसत्राच्या निषेधार्थ व्यापा-यांनी कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्यामुळे शुक्रवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद राहिले. मागील चार ते पाच दिवसांपासून कांद्याचे भाव कमी होत असतानाच गुरुवारच्या धाडसत्रामुळे भावातील घसरण अधिक वेगाने झाली.यामुळे कांदा उत्पादकांची चिंता वाढली आहे.  गुरुवारी लिलाव झाले असले तरी येवला येथील व्यापा-यांनी शुक्रवार ( 15 सप्टेंबर ) व शनिवार (16 सप्टेंबर ) लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला लासलगाव येथे तर व्यापा-यांनी बेमुदत बंद पुकारल्याने शेतक-यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. वर्षभरापासून गडगडणा-या कांदा दराने अलिकडेच उसळी घेत अल्पावधीत प्रतिक्विंटल अडीच हजारांचा टप्पा गाठला होता. भाव वाढल्याने शेतक-यांनी चाळीत साठविलेला कांदा बाजारात नेण्यास प्राधान्य दिले. शहरी भागात कांदा भावाची ओरड होऊ लागल्याने केंद्र शासनाने भाव नियंत्रित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. 

सटाण्यात एकाच वेळी तीन छापेसटाण्यात आयकर विभागातील अधिका-यांच्या वेगवेगळ्या पथकाने एकाच वेळी तीन ठिकाणी छापे टाकल्याने व्यापा-यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. गुरुवारी (14 सप्टेंबर )सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास येथील कांदा व्यापारी वर्धमान लुंकड यांच्या नाशिक रोडवरील कांदा गुदाम, बाजार समिती आवारातील कार्यालय व निवासस्थानी छापे टाकले. छापेमारीनंतर दिवसभर तपासणी चालूच होती. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून, काही कांदा व्यापा-यांनी खरेदी बंद ठेवली होती.