शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

हिंदुस्थानच्या हातात बांगड्या नव्हेत, भीमाची गदा आहे हे पाकिस्तानला दाखवा - उद्धव ठाकरे

By admin | Updated: September 21, 2016 08:36 IST

लातों के भूत बातों से नहीं मानते, हिंदुस्थानच्या हातात भीमाची गदा आहे, बांगड्या नाहीत हे दाखवा, असे सांगत पाकिस्तानचा बदला घ्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ -  ' लातों के भूत बातों से नहीं मानते. निर्लज्ज व कोडग्यांना शब्दांच्या माराने काय धडा मिळणार? असे विचारत पाकिस्तानवर कारवाई करत बदला घ्या!' असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारला दिला आहे.  ' हिंदुस्थानच्या हातात भीमाची गदा आहे, बांगड्या नाहीत हे दाखवा. बदला घ्या! खरंच बदला घ्या!' असे उद्धव यांनी सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे. 
दोन दिवसांपूर्वी काश्मीरमधील उरी येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एकूण १९ जवान शहीद झाले. त्याच पार्श्वभूमीवर देशभरातून पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. भाजपाचा मित्रपक्ष व सत्तेतील सहकारी असणा-या शिवसेनेनेही देशवासियांची मागणी लावून धरत पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली आहे.'पठाणकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्याची गर्जना पंतप्रधान आणि लष्करप्रमुखांनी केली होती. तीच डफली आता वाजवली जात आहे. पण पाकिस्तानला धडा शिकवणार म्हणजे नक्की काय करणार' असे उद्धव यांनी विचारले आहे. ' पठाणकोटच्याबाबतीत जे घडले नेमके तसेच ‘उरी’च्या बाबतीत तेच घडणार असेल तर बदल्याची व कारवाईची मर्दानी भाषा कोणी करू नये' असा टोलाही उद्धव यांनी मारला आहे. 
 (अमेरिकेसारखी हिम्मत दाखवणार नसाल तर, मोदी सरकार तुमचा काय फायदा ? - उद्धव ठाकरे)
(दहा घुसखोरांचा सीमेवरच खात्मा)
  •  
 
  •  
 
अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे : 
- हिंदुस्थानवर संकटाचा पहाड कोसळला आहे. अशावेळी राजकीय मतभेदांना गाडून सरकारच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची गरज आहे. कश्मीरात पाकड्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात १८ जवानांचे मरण ओढवले. या बलिदानाने देश सुन्न झाला आहे व धक्क्यातून अद्यापि सावरलेला नाही. संताप आणि आक्रोश यामुळे देशात उद्रेकाचे वातावरण निर्माण झाले आहे, ते शांत कसे करणार हा प्रश्‍न आहे. पाकिस्तानला धडा शिकवू, उरीतील घटनेचा बदला घेऊ, हल्लेखोरांना सोडणार नाही, असे आमच्या पंतप्रधानांनी सांगितले आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो आणि पाकिस्तानला धडा शिकविण्याचे बळ त्यांना लाभो अशी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो, पण पाकिस्तानला धडा शिकवणार म्हणजे नक्की काय करणार? पठाणकोटवरील हल्ल्यानंतरही अशाच प्रकारची वक्तव्ये जोरकसपणे करण्यात आली होती, त्याचे काय झाले? पाकिस्तानला धडा शिकविण्याचे बाजूला राहिले व त्यांच्याशी प्रेमालाप सुरू झाला. पठाणकोटचे बलिदान जणू व्यर्थ गेले. 
- जागतिक पातळीवर पाकिस्तानचा मुखवटा फाडू व त्यांचा खरा चेहरा उघडा करू, असे पठाणकोटच्या वेळी सांगितले. तीच ‘डफली’ आता वाजवली जात आहे. पठाणकोटवरील हल्ल्याचा शोध घेण्यासाठी पाकिस्तानचे तपास पथक पंजाबात येऊ दिले व त्यातला एक जण ‘आयएसआय’वाला होता. हिंदुस्थानच्या अधिकार्‍यांनी त्यांना पठाणकोटवरील हल्ल्यात पाकचा हात असल्याचे पुरावे दिले, पण त्या नापाक लोकांनी ते मानले नाहीत व हिंदुस्थानच्या इभ्रतीचा तमाशा केला. आता ‘उरी’च्या बाबतीत नेमके तेच घडणार असेल तर बदल्याची व कारवाईची मर्दानी भाषा कोणी करू नये. 
- आमच्या देशात कारवाई कोणावर होते, तर साध्वी प्रज्ञा सिंगवर होते. कश्मीरात अतिरेक्यांशी लढणार्‍या कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यावर होते. दहशतवादविरोधी पथके ‘सनातन’सारख्या आश्रमात जाऊन वृद्ध, अपंग साधकांचा छळ करतील. हिंदुत्ववाद्यांवर, प्रखर राष्ट्रभक्तांवर कठोर कारवाई करण्याची एकही संधी ही मंडळी सोडणार नाहीत, पण १८ जवानांचे बळी घेणार्‍या पाकड्यांवर म्हणावी तशी कठोर कारवाई होत नाही. ती आता तरी होईल अशी अपेक्षा आहे. पठाणकोटवरील हल्ल्यानंतर आमच्या लष्करप्रमुखांनीही खणखणीत शब्दांत सांगितलेच होते की, ‘‘पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ. बदला घेऊ. वेळ, दिवस आणि जागा आम्ही ठरवू!’’ आज उरीतील भयंकर घटनेनंतरही ले. जनरल रणबीर सिंग यांनी तेच प्रखर शब्द वापरले. ‘‘बदला घेऊ. वेळ, दिवस, जागा आम्ही ठरवू!’’ 
- १२५ कोटी जनता त्या दिवसाची व क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. करा! करा! काहीतरी करा! बदला घ्या! महाभारतात भीम किचकाची मांडी फोडून घटाघटा रक्त प्यायला होता तसा बदला घ्या. किचकाने द्रौपदीस मांडी दाखवून अपमानित केले. त्याचा बदला भीमाने घेतला. हिंदुस्थानच्या हातात भीमाची गदा आहे, बांगड्या नाहीत हे दाखवा. बदला घ्या! खरंच बदला घ्या! पाकिस्तान आतंकवादी देश आहेच. त्यास आतंकवादी देश घोषित करण्याचा व्यर्थ खटाटोप कशाला? पाकिस्तान कंगाल व भिकारी आहेच. त्याच्यावर आर्थिक निर्बंधांची गुळणी टाकून काय होणार? जगात पाकिस्तानचा चेहरा कधीच उघडा झाला आहे. आता पुन्हा तोच चेहरा खरवडून काय हाती लागणार? संयुक्त राष्ट्रसंघात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पाकिस्तानवर हल्ला करणार आहेत. हे यापूर्वी अनेकदा झाले. निर्लज्ज व कोडग्यांना शब्दांच्या माराने काय धडा मिळणार? लातों के भूत बातों से नहीं मानते. कृती करा! बदला घ्या! १८ जवानांच्या कुटुंबांचा, १२५ कोटी जनतेचा हाच आक्रोश आहे!