शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुस्थानच्या हातात बांगड्या नव्हेत, भीमाची गदा आहे हे पाकिस्तानला दाखवा - उद्धव ठाकरे

By admin | Updated: September 21, 2016 08:36 IST

लातों के भूत बातों से नहीं मानते, हिंदुस्थानच्या हातात भीमाची गदा आहे, बांगड्या नाहीत हे दाखवा, असे सांगत पाकिस्तानचा बदला घ्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ -  ' लातों के भूत बातों से नहीं मानते. निर्लज्ज व कोडग्यांना शब्दांच्या माराने काय धडा मिळणार? असे विचारत पाकिस्तानवर कारवाई करत बदला घ्या!' असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारला दिला आहे.  ' हिंदुस्थानच्या हातात भीमाची गदा आहे, बांगड्या नाहीत हे दाखवा. बदला घ्या! खरंच बदला घ्या!' असे उद्धव यांनी सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे. 
दोन दिवसांपूर्वी काश्मीरमधील उरी येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एकूण १९ जवान शहीद झाले. त्याच पार्श्वभूमीवर देशभरातून पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. भाजपाचा मित्रपक्ष व सत्तेतील सहकारी असणा-या शिवसेनेनेही देशवासियांची मागणी लावून धरत पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली आहे.'पठाणकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्याची गर्जना पंतप्रधान आणि लष्करप्रमुखांनी केली होती. तीच डफली आता वाजवली जात आहे. पण पाकिस्तानला धडा शिकवणार म्हणजे नक्की काय करणार' असे उद्धव यांनी विचारले आहे. ' पठाणकोटच्याबाबतीत जे घडले नेमके तसेच ‘उरी’च्या बाबतीत तेच घडणार असेल तर बदल्याची व कारवाईची मर्दानी भाषा कोणी करू नये' असा टोलाही उद्धव यांनी मारला आहे. 
 (अमेरिकेसारखी हिम्मत दाखवणार नसाल तर, मोदी सरकार तुमचा काय फायदा ? - उद्धव ठाकरे)
(दहा घुसखोरांचा सीमेवरच खात्मा)
  •  
 
  •  
 
अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे : 
- हिंदुस्थानवर संकटाचा पहाड कोसळला आहे. अशावेळी राजकीय मतभेदांना गाडून सरकारच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची गरज आहे. कश्मीरात पाकड्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात १८ जवानांचे मरण ओढवले. या बलिदानाने देश सुन्न झाला आहे व धक्क्यातून अद्यापि सावरलेला नाही. संताप आणि आक्रोश यामुळे देशात उद्रेकाचे वातावरण निर्माण झाले आहे, ते शांत कसे करणार हा प्रश्‍न आहे. पाकिस्तानला धडा शिकवू, उरीतील घटनेचा बदला घेऊ, हल्लेखोरांना सोडणार नाही, असे आमच्या पंतप्रधानांनी सांगितले आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो आणि पाकिस्तानला धडा शिकविण्याचे बळ त्यांना लाभो अशी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो, पण पाकिस्तानला धडा शिकवणार म्हणजे नक्की काय करणार? पठाणकोटवरील हल्ल्यानंतरही अशाच प्रकारची वक्तव्ये जोरकसपणे करण्यात आली होती, त्याचे काय झाले? पाकिस्तानला धडा शिकविण्याचे बाजूला राहिले व त्यांच्याशी प्रेमालाप सुरू झाला. पठाणकोटचे बलिदान जणू व्यर्थ गेले. 
- जागतिक पातळीवर पाकिस्तानचा मुखवटा फाडू व त्यांचा खरा चेहरा उघडा करू, असे पठाणकोटच्या वेळी सांगितले. तीच ‘डफली’ आता वाजवली जात आहे. पठाणकोटवरील हल्ल्याचा शोध घेण्यासाठी पाकिस्तानचे तपास पथक पंजाबात येऊ दिले व त्यातला एक जण ‘आयएसआय’वाला होता. हिंदुस्थानच्या अधिकार्‍यांनी त्यांना पठाणकोटवरील हल्ल्यात पाकचा हात असल्याचे पुरावे दिले, पण त्या नापाक लोकांनी ते मानले नाहीत व हिंदुस्थानच्या इभ्रतीचा तमाशा केला. आता ‘उरी’च्या बाबतीत नेमके तेच घडणार असेल तर बदल्याची व कारवाईची मर्दानी भाषा कोणी करू नये. 
- आमच्या देशात कारवाई कोणावर होते, तर साध्वी प्रज्ञा सिंगवर होते. कश्मीरात अतिरेक्यांशी लढणार्‍या कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यावर होते. दहशतवादविरोधी पथके ‘सनातन’सारख्या आश्रमात जाऊन वृद्ध, अपंग साधकांचा छळ करतील. हिंदुत्ववाद्यांवर, प्रखर राष्ट्रभक्तांवर कठोर कारवाई करण्याची एकही संधी ही मंडळी सोडणार नाहीत, पण १८ जवानांचे बळी घेणार्‍या पाकड्यांवर म्हणावी तशी कठोर कारवाई होत नाही. ती आता तरी होईल अशी अपेक्षा आहे. पठाणकोटवरील हल्ल्यानंतर आमच्या लष्करप्रमुखांनीही खणखणीत शब्दांत सांगितलेच होते की, ‘‘पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ. बदला घेऊ. वेळ, दिवस आणि जागा आम्ही ठरवू!’’ आज उरीतील भयंकर घटनेनंतरही ले. जनरल रणबीर सिंग यांनी तेच प्रखर शब्द वापरले. ‘‘बदला घेऊ. वेळ, दिवस, जागा आम्ही ठरवू!’’ 
- १२५ कोटी जनता त्या दिवसाची व क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. करा! करा! काहीतरी करा! बदला घ्या! महाभारतात भीम किचकाची मांडी फोडून घटाघटा रक्त प्यायला होता तसा बदला घ्या. किचकाने द्रौपदीस मांडी दाखवून अपमानित केले. त्याचा बदला भीमाने घेतला. हिंदुस्थानच्या हातात भीमाची गदा आहे, बांगड्या नाहीत हे दाखवा. बदला घ्या! खरंच बदला घ्या! पाकिस्तान आतंकवादी देश आहेच. त्यास आतंकवादी देश घोषित करण्याचा व्यर्थ खटाटोप कशाला? पाकिस्तान कंगाल व भिकारी आहेच. त्याच्यावर आर्थिक निर्बंधांची गुळणी टाकून काय होणार? जगात पाकिस्तानचा चेहरा कधीच उघडा झाला आहे. आता पुन्हा तोच चेहरा खरवडून काय हाती लागणार? संयुक्त राष्ट्रसंघात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पाकिस्तानवर हल्ला करणार आहेत. हे यापूर्वी अनेकदा झाले. निर्लज्ज व कोडग्यांना शब्दांच्या माराने काय धडा मिळणार? लातों के भूत बातों से नहीं मानते. कृती करा! बदला घ्या! १८ जवानांच्या कुटुंबांचा, १२५ कोटी जनतेचा हाच आक्रोश आहे!