शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निमित्त गणित ऐच्छिक असावे/ नसावे?... चे

By admin | Updated: June 27, 2017 11:53 IST

सध्या गणित ऐच्छिक असावे की नसावे याची जोरदार चर्चा सगळीकडे सुरू आहे. तसा आमचा गणोबा सर्वांना घाबरवतोच म्हणा, पण खरं तर त्याला घाबरण्याची काहीही गरज नाही.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 27- सध्या गणित ऐच्छिक असावे की नसावे याची जोरदार चर्चा सगळीकडे सुरू आहे. तसा आमचा गणोबा सर्वांना घाबरवतोच म्हणा, पण खरं तर त्याला घाबरण्याची काहीही गरज नाही. जेव्हा तो समजतो, तेव्हा तो आवडतो. म्हणूनच त्याला समजून घेणे आवश्यक आहे. 
शास्त्रांचे शास्त्र म्हणजे गणित. जीवनातील सर्व समस्या सोडविण्यासाठी गणित आवश्यक आहे. म्हणूनच ते अनिवार्य असावे, असा शिक्षणशास्त्राचा नियम. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या जीवनात पावलोपावली आवश्यक असलेल्या क्रिया आहेत. गणिताचं कमीत कमी एवढं तरी ज्ञान प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. इयत्ता आठवीपर्यंत त्या चार प्रक्रियांखेरीज सरासरी, शेकडेवाडी, नफा-तोटा, सरळव्याज, चक्रवाढव्याज या जीवनोपयोगी अंकगणिताचा समावेश आहे. त्याचबरोबर प्रत्यक्षात व्यवहारात न लागणारे बीजगणित व भूमितीही आहे. प्रश्न वाचणे, त्यावर विचार करणे, आकृती काढण्याचे कौशल्य संपादन करणे, आपण केलेला विचार तर्कसंगत पद्धतीने मांडता येण्याचा सराव मिळणे फार आवश्यक असते. या सरावामुळे आपल्या मेंदूला पुढील आयुष्यात येणाऱ्या समस्या उलगडून, त्यांचा गुंता सहज सोडविता येतो. त्यासाठी भूमिती अधिक महत्त्वाची, पण या सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी पुढील गोष्टींचे पथ्य पाळणे आवश्यक आहे. 
 
१) गणितातील प्रत्येक क्रियेचे संबोध नीट समजले पाहिजेत. 
२) प्रत्येक उदाहरणावर उलटसुलट विचार करता यायला पाहिजे. सोडविलेल्या उदाहरणाचा ताळा करून उत्तर अचूक असल्याचा पडताळा करण्याची सवय लागली पाहिजे. सरावासाठी त्याच पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न तयार करण्याचेही कौशल्य संपादन करता यावे, एकमेकांशी चर्चा करून, खेळातूनही काही गोष्टींचा सराव करता येतो. 
३) आज ‘फास्ट फूड’चा जमाना आहे. म्हणजेच कोणतीही गोष्ट विनासायास मिळविण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. स्पर्धेचेही युग आहे. त्यामुळे शिकवणीवर्ग, मार्गदर्शिका (गाईडस्-सोल्युशन) याचा अवलंब केला जातो. त्यामुळे मुलांच्या मेंदूला आवश्यक व्यायाम मिळत नाही. जी वस्तू वापरली जात नाही ती गंजते, निरुपयोगी होते याचा आपल्याला विसर पडत चालला आहे. आपला मेंदू म्हणजे अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा आहे. घासला तरच ब्रह्मराक्षस उभा राहतो म्हणजेच आपल्याला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शोधणे सहज शक्य होते. आज भरपूर पैसा आहे, मुलांना देण्यासाठी वेळ मात्र नाही. त्यामुळे पालक चुकीच्या गोष्टींचा अवलंब करून कल्मशपादाप्रमाणे शापाचे उदक स्वत:च्याच पायावर पाडत आहेत; त्यांना त्याचे भान असायला हवे. 
४) विद्यार्थ्यांना खुलासेवार उदाहरणे सोडवता आली पाहिजेत. तरच त्यांच्यात एखाद्या प्रश्नाच्या बाबतीत विचार करण्याची शक्ती निर्माण होईल. त्यात कठीण असे काही नाही. पूर्वी अशाच प्रकारे विद्यार्थी उदाहरणे सोडवू शकत. आत्ताची पिढी तर अधिक बुद्धिमान आहे. व्यवधाने अधिक आहेत हे खरे; परंतु पाण्यात पडलं की प्राणीसुद्धा स्वत:ला वाचवण्यासाठी धडपडतो मग विद्यार्थी (मूल) तर बुद्धिमान माणूस आहे, तो कसा घाबरेल? घाबरतो आपण. ठेच लागल्याशिवाय शहाणपण येईल का? 
५) या सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी इ. ८ वी पर्यंत अत्यंत उत्कृष्ट शिक्षक आवश्यक आहेत. शिक्षकांचे स्वत:चे गणितातील संबोध सुस्पष्ट असावे. त्यांना सोप्याकडून कठीणाकडे जाण्याची जाण असावी. शिक्षक उच्चविद्याविभूषित असण्यापेक्षा शिकविण्याची हातोटी आणि शिकण्याची आस असणारा असावा. विद्यार्थ्यांवर प्रेम करून त्यांना आपलेसे करणारा असावा. अभ्यासूवृत्तीचा, मेहनती असावा. मान्य की मुंबईसारख्या शहरात शिक्षकाचे घर शाळेपासून लांब असते, त्याला प्रवासाची दगदगही होते, पण तरीही आपल्या पेशाशी प्रामाणिक राहण्याची प्रबळ इच्छा त्याच्याकडे असणे आवश्यक आहे आणि इच्छा असेल तर मार्ग दिसतोच. शिक्षक क्षमाशील असावा, त्याबरोबरच स्वत:च्या चुका मान्य करून त्या सुधारण्याकडे त्याचा कल असावा. आपोआपच त्याचा हा गुण विद्यार्थ्यातही प्रतिबिंबित होईल; परंतु आज दुर्दैवाने त्याचीच उणीव आहे. त्यामुळे कच्चा पायावर इमारत उभी करणं कठीणच नव्हे, तर दुरापास्त आहे. शासन, शिक्षण खाते तसेच समाजानेही यावर केवळ विचार करणे गरजेचे नाही, तर त्यादृष्टीने ठोस पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे. 
 
आता गणिताच्या निकषांची दुसरी बाजू - 
इ. ८ वी पर्यंत, गणितातील हे सारे प्राथमिक संबोध प्रत्येकाला येणे आवश्यक आहेत. भरपूर सरावाने या साऱ्या संबोधांचे दृढीकरण व्हावे हा अभ्यासक्रम शिथिल करण्यामागचा खरा हेतू आहे. हे लक्षात असू द्या. गणिती संबोध जीवनाश्यक म्हणून इ. ८ वी पर्यंत ते अनिवार्य आहेत.
मात्र, त्यानंतर विद्यार्थ्यांवर कोणतेही निर्बंध नसावे. त्याने त्याच्या आवडीनुसार शिक्षण घ्यावे. पालकांनीही त्याच्यावर कोणतीही सक्ती करू नये. त्याची आवड, कल व पात्रता याकडे चोखंदळपणे लक्ष द्यावे व त्याला योग्य मार्गाने जाण्यास मदत करावी. येथून पुढे गणितात गती असणारे, गणित आवडणारे विद्यार्थी गणिताचा अभ्यास करतीलच, पण ज्यांना त्यात विशेष प्रावीण्य नसेल त्यांनी गणित सोडून इतर विषयांचा अधिक अभ्यास करावा. संगणकीय किंवा इतर अभ्यासक्रम निवडण्यासाठी गणिताची अजिबात आवश्यकता नाही. एक ना धड भाराभर चिंध्या नकोतच. त्यापेक्षा तो त्याला आवडणारा कोणताही अभ्यासक्रम कोणत्याही दडपणाशिवाय मनापासून पूर्ण करू शकेल. अर्थात ज्या अभ्यासक्रमात गणिताची आवश्यकता आहे तो अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा अट्टाहास त्याने किंवा त्याच्या पालकांनी करू नये. 
 
 
आणखी वाचा:
 

गणिताला पर्याय देण्यास तज्ज्ञांचा नकार

 
 
 
एस.एस.सी. बोर्डानेही गणितासाठी पर्यायी व्यवस्था केली तर निकाल लावण्याच्या निकषात त्यांची ओढाताण होणार नाही. परीक्षेचे स्टँडर्ड राखण्यातच औचित्य आहे. भाराभर गुण देऊन विद्यार्थी व पालकांची फसवणूक किंवा दिशाभूल करू नये. विद्यार्थी ज्ञानाने परिपूर्ण व्हावा, स्वत:च्या पायावर त्याच्या भविष्यासाठी त्याने उभे राहावे ही काळाची गरज आहे. याचे भान कृपया असू द्यावे. 
शासनानेही शिक्षणास सर्वाधिक महत्त्व द्यावे. नादारी व शिष्यवृत्ती यात गोंधळ करू नये. शिष्यवृत्ती ही बुद्धिमत्ता तपासणारीच असायला पाहिजे. तेथे गणिताला आणि गणिताच्या काठिन्यपातळीला कोणताही पर्याय असता नये. बुद्धिमान मुलांचे खच्चीकरण कोणत्याही प्रकारे होता नये. त्यामुळे वैयक्तिक त्या विद्यार्थ्याचेच नव्हे तर राष्ट्राचेही नुकसान होईल. 
तेव्हा गणिताचे महत्त्व कमी न होऊ देता, सामान्य विद्यार्थ्यांसाठी गणिताला ऐच्छिकतेचा पर्याय ठेवावा, जेणेकरून त्यांना पुढील शिक्षणात अडथळा येणार नाही.
 
- विजया चौधरी
(उपमुख्याध्यापिका, बालमोहन विद्यामंदिर, दादर)