शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
2
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
3
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
4
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
5
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
6
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
7
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
8
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
9
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
10
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
11
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
12
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
13
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
14
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
15
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
16
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
17
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
18
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
19
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
20
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं

साखर कारखान्यांना अल्प मुदतीचे कर्ज

By admin | Updated: October 7, 2015 02:04 IST

आगामी गाळप हंगामासाठी (२०१५-१६) राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना १८० कोटी रुपयांचे अल्प मुदतीचे कर्ज आणि थकहमी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या मंगळवारी

मुंबई : आगामी गाळप हंगामासाठी (२०१५-१६) राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना १८० कोटी रुपयांचे अल्प मुदतीचे कर्ज आणि थकहमी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याचा लाभ राज्यातील किमान २२ सहकारी साखर कारखान्यांना होणार आहे.यापुढे एकाही साखर कारखान्याला थकहमी मिळणार नाही, अशी भूमिका प्रारंभी भाजपप्रणीत राज्य सरकारने घेतली होती. मात्र, त्यावर टीका झाली होती. शिवाय, उणे नक्त मूल्य (निगेटिव्ह नेट वर्थ) असलेल्या आणि थकहमीवरील पूर्व हंगामी, तसेच अल्प मुदत कर्ज बाकी नसलेल्या, तसेच गेल्या वर्षीच्या हंगामात एफआरपीप्रमाणे ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत किमान ९० टक्के ऊस देयके अदा केलेल्या सहकारी साखर कारखान्यांना अल्पमुदत कर्ज व थकहमी देण्याची शिफारस साखर आयुक्तांनी केली होती. त्यामुळे सरकारने थकहमी देण्याचा निर्णय घेतला. (विशेष प्रतिनिधी)गाळप क्षमतेनुसार मिळणार कर्जकारखान्यांच्या प्रतिदिन गाळप क्षमतेनुसार अल्पमुदत कर्जाची मर्यादा राहणार आहे. प्रतिदिन १२५० टनापर्यंत गाळप क्षमतेसाठी ५ कोटी, १२५१ ते २५०० टन गाळपासाठी ७ कोटी, २५०१ ते ३५०० टन गाळपासाठी ९ कोटी, ३५०१ ते ५००० टन गाळपासाठी १२ कोटी आणि ५ हजार टनापेक्षा जास्त गाळप क्षमतेसाठी १५ कोटी रुपये अशी कर्ज मर्यादा राहणार आहे. अनेक साखर कारखान्यांचे निगेटिव्ह नेट वर्थ झालेले असून, कारखान्यांना वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. राज्यात ९.८७ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे. निव्वळ गाळपासाठी अंदाजे ७.६० लाख मेट्रीक टन उसाची उपलब्धता अपेक्षित आहे. यातून ८५.८८ लाख मेट्रीक टन साखर उत्पादन होईल.