शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

साखर कारखान्यांना अल्प मुदतीचे कर्ज

By admin | Updated: October 7, 2015 02:04 IST

आगामी गाळप हंगामासाठी (२०१५-१६) राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना १८० कोटी रुपयांचे अल्प मुदतीचे कर्ज आणि थकहमी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या मंगळवारी

मुंबई : आगामी गाळप हंगामासाठी (२०१५-१६) राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना १८० कोटी रुपयांचे अल्प मुदतीचे कर्ज आणि थकहमी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याचा लाभ राज्यातील किमान २२ सहकारी साखर कारखान्यांना होणार आहे.यापुढे एकाही साखर कारखान्याला थकहमी मिळणार नाही, अशी भूमिका प्रारंभी भाजपप्रणीत राज्य सरकारने घेतली होती. मात्र, त्यावर टीका झाली होती. शिवाय, उणे नक्त मूल्य (निगेटिव्ह नेट वर्थ) असलेल्या आणि थकहमीवरील पूर्व हंगामी, तसेच अल्प मुदत कर्ज बाकी नसलेल्या, तसेच गेल्या वर्षीच्या हंगामात एफआरपीप्रमाणे ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत किमान ९० टक्के ऊस देयके अदा केलेल्या सहकारी साखर कारखान्यांना अल्पमुदत कर्ज व थकहमी देण्याची शिफारस साखर आयुक्तांनी केली होती. त्यामुळे सरकारने थकहमी देण्याचा निर्णय घेतला. (विशेष प्रतिनिधी)गाळप क्षमतेनुसार मिळणार कर्जकारखान्यांच्या प्रतिदिन गाळप क्षमतेनुसार अल्पमुदत कर्जाची मर्यादा राहणार आहे. प्रतिदिन १२५० टनापर्यंत गाळप क्षमतेसाठी ५ कोटी, १२५१ ते २५०० टन गाळपासाठी ७ कोटी, २५०१ ते ३५०० टन गाळपासाठी ९ कोटी, ३५०१ ते ५००० टन गाळपासाठी १२ कोटी आणि ५ हजार टनापेक्षा जास्त गाळप क्षमतेसाठी १५ कोटी रुपये अशी कर्ज मर्यादा राहणार आहे. अनेक साखर कारखान्यांचे निगेटिव्ह नेट वर्थ झालेले असून, कारखान्यांना वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. राज्यात ९.८७ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे. निव्वळ गाळपासाठी अंदाजे ७.६० लाख मेट्रीक टन उसाची उपलब्धता अपेक्षित आहे. यातून ८५.८८ लाख मेट्रीक टन साखर उत्पादन होईल.