शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

धक्कादायक; कर्ज न घेता दिव्यांग शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 10:11 IST

राज्यात असलेल्या दिव्यांग शेतकऱ्यांनी कर्ज मिळावे म्हणून दिव्यांग महामंडळाकडे अर्ज केले होते

मुंबई - राज्यातील दिव्यांग शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कोणतेही कर्ज न घेता बोजा टाकण्यात आला असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केला आहे. राज्यातील १०९ असे शेतकरी आहेत ज्यांच्या सातबाऱ्यावर कर्जाच्या खोट्या नोंदी करण्यात आल्या असल्याचे आरोप गजभिये यांनी केला आहे. मुंबईत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात पत्रकारांशी ते बोलत होते.

राज्यात असलेल्या दिव्यांग शेतकऱ्यांनी कर्ज मिळावे म्हणून दिव्यांग महामंडळाकडे अर्ज केले होते. मात्र त्यांनी फक्त अर्ज केला म्हणून त्यांच्या सातबाऱ्यावर कर्जाची नोंद करण्यात आल्या असून, बँकेच्या अधिकाऱ्यांनी पैसे भरण्यासाठी तगादा लावला आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कोणतेही कर्ज मिळाले नसल्याचा गंभीर आरोप आमदार प्रकाश गजभिये यांनी केला आहे. राज्यात अशी १०९ असे शेतकरी असून त्यांना कर्ज घेण्यासाठी अडचणी येत असल्याचे गजभिये म्हणाले.

शिवसेना-भाजप सरकारच्या काळात अपंग शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा चालवली आहे. सत्तेत असलेल्या पक्षांच्या जाहीरनाम्यात सातबारे कोरे करण्याचा आश्वासन होते, मात्र राज्यात एकही ऑनलाइन  सातबारा कोरा झाला नाहीत. सातारा,गोंदिया,भंडारा,अमरावती या भागात ऑनलाइन  सातबाऱ्याच्या प्रकरणात मूळ कुळाच्याच नोंदी काढण्यात आल्या आहे. त्या कायद्यालाच समाप्त करण्याचे काम या सरकारने केले असल्याचा आरोप गजभिये यांनी केला आहे.