शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

धक्कादायक प्रकार! खचलेल्या मनांना धीर देणारे हात नसल्याने तिघांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 06:51 IST

बोराळा गावास सदर प्रतिनिधीने भेट दिली असता, गावात तरूणांची संख्या लक्षणीय दिसली़ शवविच्छेदन अहवालातील तिघांचे कारण समान आहे़

चंद्रकांत देवणे 

वसमत (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील बोराळा गावात सलग तीन दिवसांत तीन आत्महत्या झाल्याने समाजमन हादरून गेले आहे़ या आत्महत्यांना अतिवृष्टी, नापिकी हे मुख्य कारण आहेच, सोबतच सततच्या संकटाच्या मालिकेने खचलेल्यांना धीर, हिंमत देणारे हात नसल्याने व संकट कोणासमोर न सांगण्याची वृत्ती या कारणांची झालर असल्याचेही समोर येत आहे़ या घटनेनंतर आ़ राजू पाटील नवघरे यांनी मंगळवारी या गावात ग्रामसभा घेत गावच दत्तक घेतल्याची घोषणा केली़

बोराळा गावास सदर प्रतिनिधीने भेट दिली असता, गावात तरूणांची संख्या लक्षणीय दिसली़ शवविच्छेदन अहवालातील तिघांचे कारण समान आहे़ वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांची आत्महत्या म्हणून तर एका प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची नोंद आहे. ९ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केलेल्या प्रभाकर जाधव (३२) याच्या घरी मंंगळवारी भेट दिली असता वडील प्रल्हादराव जाधव व नातेवाईक भेटले. त्याच्या वडिलांनी सांगितले की, प्रभाकरच घरचा कर्ता कारभारी होता. अतिवृष्टी, नापिकीमुळे तो वैतागला होता़ सततच्या मानसिक दडपणातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. १० ऑक्टोबर रोजी आत्महत्या केलेल्या संतोष खराटे (२२) याने शेतीच्या वादातून हे टोकाचे पाऊल उचलले. तसेच राजू गंगातीरे याने ७ ऑक्टोबर रोजीच आत्महत्येचा प्रयत्न केला, पण त्यास ग्रामस्थांनी वाचवले. मात्र त्याने पाचव्या दिवशी आत्महत्या केली़ या तिन्ही प्रकरणात तरुणांनी संकटाचा दबाव असह्य झाल्यानेच टोकाचा निर्णय घेतल्याचे दिसले. वेळीच धीर देणारे समर्थ हात समोर आले असते तर कदाचित हे प्रकार टळले असते.

टॅग्स :Suicideआत्महत्या