शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

धक्कादायक प्रकार! खचलेल्या मनांना धीर देणारे हात नसल्याने तिघांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 06:51 IST

बोराळा गावास सदर प्रतिनिधीने भेट दिली असता, गावात तरूणांची संख्या लक्षणीय दिसली़ शवविच्छेदन अहवालातील तिघांचे कारण समान आहे़

चंद्रकांत देवणे 

वसमत (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील बोराळा गावात सलग तीन दिवसांत तीन आत्महत्या झाल्याने समाजमन हादरून गेले आहे़ या आत्महत्यांना अतिवृष्टी, नापिकी हे मुख्य कारण आहेच, सोबतच सततच्या संकटाच्या मालिकेने खचलेल्यांना धीर, हिंमत देणारे हात नसल्याने व संकट कोणासमोर न सांगण्याची वृत्ती या कारणांची झालर असल्याचेही समोर येत आहे़ या घटनेनंतर आ़ राजू पाटील नवघरे यांनी मंगळवारी या गावात ग्रामसभा घेत गावच दत्तक घेतल्याची घोषणा केली़

बोराळा गावास सदर प्रतिनिधीने भेट दिली असता, गावात तरूणांची संख्या लक्षणीय दिसली़ शवविच्छेदन अहवालातील तिघांचे कारण समान आहे़ वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांची आत्महत्या म्हणून तर एका प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची नोंद आहे. ९ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केलेल्या प्रभाकर जाधव (३२) याच्या घरी मंंगळवारी भेट दिली असता वडील प्रल्हादराव जाधव व नातेवाईक भेटले. त्याच्या वडिलांनी सांगितले की, प्रभाकरच घरचा कर्ता कारभारी होता. अतिवृष्टी, नापिकीमुळे तो वैतागला होता़ सततच्या मानसिक दडपणातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. १० ऑक्टोबर रोजी आत्महत्या केलेल्या संतोष खराटे (२२) याने शेतीच्या वादातून हे टोकाचे पाऊल उचलले. तसेच राजू गंगातीरे याने ७ ऑक्टोबर रोजीच आत्महत्येचा प्रयत्न केला, पण त्यास ग्रामस्थांनी वाचवले. मात्र त्याने पाचव्या दिवशी आत्महत्या केली़ या तिन्ही प्रकरणात तरुणांनी संकटाचा दबाव असह्य झाल्यानेच टोकाचा निर्णय घेतल्याचे दिसले. वेळीच धीर देणारे समर्थ हात समोर आले असते तर कदाचित हे प्रकार टळले असते.

टॅग्स :Suicideआत्महत्या