शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक प्रकार! खचलेल्या मनांना धीर देणारे हात नसल्याने तिघांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 06:51 IST

बोराळा गावास सदर प्रतिनिधीने भेट दिली असता, गावात तरूणांची संख्या लक्षणीय दिसली़ शवविच्छेदन अहवालातील तिघांचे कारण समान आहे़

चंद्रकांत देवणे 

वसमत (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील बोराळा गावात सलग तीन दिवसांत तीन आत्महत्या झाल्याने समाजमन हादरून गेले आहे़ या आत्महत्यांना अतिवृष्टी, नापिकी हे मुख्य कारण आहेच, सोबतच सततच्या संकटाच्या मालिकेने खचलेल्यांना धीर, हिंमत देणारे हात नसल्याने व संकट कोणासमोर न सांगण्याची वृत्ती या कारणांची झालर असल्याचेही समोर येत आहे़ या घटनेनंतर आ़ राजू पाटील नवघरे यांनी मंगळवारी या गावात ग्रामसभा घेत गावच दत्तक घेतल्याची घोषणा केली़

बोराळा गावास सदर प्रतिनिधीने भेट दिली असता, गावात तरूणांची संख्या लक्षणीय दिसली़ शवविच्छेदन अहवालातील तिघांचे कारण समान आहे़ वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांची आत्महत्या म्हणून तर एका प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची नोंद आहे. ९ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केलेल्या प्रभाकर जाधव (३२) याच्या घरी मंंगळवारी भेट दिली असता वडील प्रल्हादराव जाधव व नातेवाईक भेटले. त्याच्या वडिलांनी सांगितले की, प्रभाकरच घरचा कर्ता कारभारी होता. अतिवृष्टी, नापिकीमुळे तो वैतागला होता़ सततच्या मानसिक दडपणातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. १० ऑक्टोबर रोजी आत्महत्या केलेल्या संतोष खराटे (२२) याने शेतीच्या वादातून हे टोकाचे पाऊल उचलले. तसेच राजू गंगातीरे याने ७ ऑक्टोबर रोजीच आत्महत्येचा प्रयत्न केला, पण त्यास ग्रामस्थांनी वाचवले. मात्र त्याने पाचव्या दिवशी आत्महत्या केली़ या तिन्ही प्रकरणात तरुणांनी संकटाचा दबाव असह्य झाल्यानेच टोकाचा निर्णय घेतल्याचे दिसले. वेळीच धीर देणारे समर्थ हात समोर आले असते तर कदाचित हे प्रकार टळले असते.

टॅग्स :Suicideआत्महत्या