शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

धक्कादायक; उन्हाच्या तीव्रतेमुळे राज्यात ६,५०० एकर तुतीचे क्षेत्र घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 09:56 IST

टिकून राहिलेल्या क्षेत्रातील रेशीमकोषाला येतोय चांगला भाव; तुतीच्या क्षेत्रात सर्वाधिक फटका औरंगाबाद विभागाला

ठळक मुद्देयंदा राज्यात बारामती, जालना व पूर्णा (अमरावती) येथे रेशीमकोष खरेदी केंद्र सुरूकडक उन्हाळा, लांबलेला पाऊस, पावसाची संततधार व अनुदानाची तीन वर्षे संपल्याने क्षेत्र कमी झाल्याची कारणेतासगाव (सांगली) येथे रेशीमकोषासाठी दररोज दीड टन क्षमतेची स्वयंचलित रीलिंग मशीन पुढील महिन्यात सुरू होणार.

अरुण बारसकर 

सोलापूर : मागील वर्षीच्या दुष्काळाच्या तीव्रतेमुळे राज्यभरातील   ६ हजार ५०० एकर क्षेत्र घटले आहे, त्यात औरंगाबाद विभागातील चार हजार हेक्टरला फटका बसला होता. टिकून राहिलेल्या क्षेत्रातील रेशीमकोषाला चांगला दर मिळत असून, तो प्रति किलो ५०० रुपयांपर्यंत पोहोचला असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात मागील काही वर्षांत तुतीच्या लागवडीवर शासनाने भर दिला आहे. रेशीमकोषाला स्थानिक बाजारापेठा निर्माण होण्यासाठीही राज्य शासनाने प्रयत्न केल्याने    तुतीच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली होती. तुती लागवडीचा मनरेगामध्ये समावेश केल्याने लागवडीपासून सलग तीन वर्षे दोन लाख ९५ हजार रुपये अनुदान स्वरूपात शेतकºयांना मिळतात. शिवाय कमी पाण्यावर येणारे हे पीक आहे. यामुळे प्रामुख्याने औरंगाबाद, अमरावती, नागपूर व पुणे विभागात मोठ्या प्रमाणावर तुतीची लागवड झाली होती.

तुतीचे क्षेत्र २३ हजार ५०० एकर इतके झाले होते. मात्र मागील वर्षी दुष्काळाची प्रचंड दाहकता असल्याने तुतीच्या क्षेत्रावर मोठी घट झाली आहे. राज्यातील जवळपास ६ हजार ५०० एकर क्षेत्र जळाले होते. त्यामध्ये औरंगाबाद विभागातील चार हजार एकर, पुणे विभागातील एक हजार एकर, अमरावती विभागातील ११०० एकर तर नागपूर व अन्य एक अशा दोन जिल्ह्यांतील ४०० एकर क्षेत्र कमी झाले आहे. 

सध्या राज्यात १७ हजार एकर तुतीचे क्षेत्र असून, या टिकून राहिलेल्या क्षेत्रातील रेशीमकोषाला चांगला दर मिळत आहे. मागील वर्षी प्रतिकिलो ३०० ते ३५० रुपयांपर्यंत रेशीमकोषाची विक्री झाली होती. यावर्षी मात्र त्याच रेशीमकोषचा दर ४०० ते ५०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. चांगला पैसा मिळू लागल्याने शिवाय बाजारपेठही जवळच उपलब्ध झाल्याने शेतकºयांच्या हातात चार पैसे राहू लागले आहेत. 

बारामती, जालना व पूर्णा येथे रेशीमकोष खरेदी केंद्र

  • - यंदा राज्यात बारामती, जालना व पूर्णा (अमरावती) येथे रेशीमकोष खरेदी केंद्र सुरू
  • - कडक उन्हाळा, लांबलेला पाऊस, पावसाची संततधार व अनुदानाची तीन वर्षे संपल्याने क्षेत्र कमी झाल्याची कारणे
  • - औरंगाबाद जिल्ह्यात ९०० एकर, जालना ७५० एकर, लातूर ५५० एकर, उस्मानाबाद ६५० एकर, परभणी ३७५ एकर, हिंगोली, बीड, यवतमाळ व बुलडाणा प्रत्येकी ३०० एकर, नागपूर २०० एकर क्षेत्रातील तुतीचे क्षेत्र कमी झाले. 
  • - तासगाव (सांगली) येथे रेशीमकोषासाठी दररोज दीड टन क्षमतेची स्वयंचलित रीलिंग मशीन पुढील महिन्यात सुरू होणार.

मनरेगामधून प्रति एकरी दोन लाख ९५ हजार रुपये अनुदान मिळते. शिवाय ट्रेनिंगची सोय. यावर्षी पाच हजार एकर तुती लागवडीचे उद्दिष्ट तर १० हजार शेतकºयांची नोंदणी अपेक्षित आहे.  महारेशीमचा फायदा शेतकºयांनी घ्यावा. मागील काही वर्षांत रेशीमकोषाचा दर कमी झालेला नाही. शिवाय राज्यातच कोष विक्रीची सोय केली.- अर्जुन गोरेउपसंचालक (रेशीम), नागपूर

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी