शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

धक्कादायक; तीन रुपयांचा कर घेऊन दिला घटस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 12:49 IST

अक्कलकोट तालुक्यातील सांगवी गावातील घटना; तिसºयांदा संसार मोडणाºया जात पंचायतीविरुद्ध शोषित महिलेने घेतली अखेर पोलिसांकडे धाव !

ठळक मुद्देमहाराष्ट्र गोसावी समाजाच्या प्रमुखांनी या घटस्फोटाला विरोध केला असतानादेखील सांगवी गावच्या जात पंचायतीने याची दखल घेतली नाही.जात पंचायतीच्या या अन्यायकारक निर्णयाविरोधात सुनीताने अक्कलकोट पोलीस ठाण्यात धाव घेतली; मात्र येथेही तिच्या पदरी निराशाच आली

सोलापूर : नवºयाशी घटस्फोट (सोडचिठ्ठी) करू नका असा टाहो फोडणाºया महिलेचे गाºहाणे न ऐकता गोसावी समाजाच्या जात पंचायतीने तिसºयांदा हाच प्रकार केला. यापूर्वीही जात पंचायतीने या शोषित महिलेला जबरदस्तीने दोनदा घटस्फोट देऊन अन्याय केला होता. अक्कलकोट तालुक्यातील सांगवी या गावातील ही घटना असून, या महिलेने आता पोलिसांकडे धाव घेतली आहे. 

सांगवी गावात गोसावी समाजाचे प्राबल्य आहे. जात पंचायतीने सुनीता (बदललेले नाव) हिला तिची मागणी नसताना यापूर्वीच दोनदा घटस्फोट क रुन दिला. काही काळानंतर गोसावी समाजातील एका तरुणासोबत तिचे प्रेम झाले. या प्रेमप्रकरणातून सुनीता हिने त्या तरुणाशी विवाह केला. हा विवाह जात पंचायतीने लावून दिला. या विवाहानंतर सुनीता हिला तीन महिन्याचे मुलदेखील आहे. असे असतानाही सुनीताच्या नवºयाने तिला घटस्फोट देण्यासाठी तगादा लावला; मात्र सुनीताने नकार दिल्यानंतर त्याने जात पंचायतीकडे धाव घेतली.

सुनीताला कल्पना न देता परस्पर जात पंचायतीने घटस्फोट झाल्याचा निर्णय दिला. सुनीताने याची विचारणा केल्यानंतर जात पंचायतीची प्रथा व परंपरा अनुसार आम्हाला अधिकार असल्याचे जात पंचायतीच्या प्रमुखाने सांगितले. घटस्फोट देऊ नका असे म्हणत जात पंचायतीसमोर सुनीताने वारंवार विनवण्या केल्या, पंचाचे पाय धरले, तरीदेखील जात पंचायतीने तिचे गाºहाणे न ऐकता तीन रुपयांचा कर घेऊन घटस्फोट झाल्याचे सांगितले.

महाराष्ट्र गोसावी समाजाच्या प्रमुखांनी या घटस्फोटाला विरोध केला असतानादेखील सांगवी गावच्या जात पंचायतीने याची दखल घेतली नाही. जात पंचायतीच्या या अन्यायकारक निर्णयाविरोधात सुनीताने अक्कलकोट पोलीस ठाण्यात धाव घेतली; मात्र येथेही तिच्या पदरी निराशाच आली. यापूर्वी दोन लग्न झाले असताना आता तिसरा नवरा कशाला हवा असे म्हणत पोलिसांनी सुनीताचे म्हणणे धुडकावून लावले. २६ जुलै ते २९ जुलै दरम्यान सलग पोलीस ठाण्याच्या चकरा मारुनही पोलिसांनी तू नवºयाला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप करत दम दिला असे सुनीताने सांगितले.

पोलीसही दखल घेत नसल्याचे पाहून सुनीताने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे कार्यालय गाठले. आपले गाºहाणे पोलीस अधीक्षकासमोर मांडले. पाटील यांनी जात पंचायतीतील पंचांवर कारवाई करण्याचे आदेश अक्कलकोट पोलिसांना दिले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेताना भटक्या व विमुक्त जाती संघाचे अध्यक्ष मच्ंिछद्र भोसले, सचिव अविनाश रेणके, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण जाधव, रिपब्लिकन पक्षाचे उत्तर सोलापूर युवक अध्यक्ष विशाल कांबळे हे उपस्थित होते. 

सांगवी गावात अशी अनेक उदाहरणे- अक्कलकोट तालुक्यातील सांगवी गावात असे अनेक प्रकार घडले आहेत. जात पंचायतीने एका मुलीचे दोनदा, तीनदा लग्न लावून दिले. तसेच घटस्फोटही घेऊन दिले आहेत. महाराष्ट्र गोसावी समाजाच्या अध्यक्षांनी सुनीताबाबत झालेला निर्णय चुकीचे असल्याचे सांगितल्यावरही त्यांचे म्हणणे जात पंचायतीने ऐकले नाही, असे सुनीताने दिलेल्या निवेदनात नमूद केले.

ज्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे, तो तरुण शिक्षित आहे. पोलीस भरतीसाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यास त्याच्या करिअरला अडचणी येऊ शकतात हे त्याच्या लक्षात आले आहे. पाच लाखांची मागणी करण्यात आली.  - आप्पा जाधव, पंच, गोसावी समाज.

गुन्हा दाखल करावा यासाठी शोषित महिला आमच्याकडे आली होती. तिच्याकडे लग्न झाल्याचा पुरावा नव्हता. तिला एक मूल असून त्याच्या जन्माचा दाखला महापालिकेतून आणून देण्यास आम्ही सांगितले. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार आम्ही गुन्हा दाखल करुन घेणार आहोत.- कल्लपा पुजारी, पोलीस निरीक्षक, अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे.

अन्यायकारक पद्धतीने निकाल देणाºया जात पंचायतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. जात पंचायतीने अशा पद्धतीने निकाल देऊन अनेक मुलींना संसारातून उठवले आहे. लग्न लावायला तसेच घटस्फोट देण्यासाठी ते पैसे घेतात.  - बाळकृष्ण जाधव, जिल्हाध्यक्ष, भटक्या व विमुक्त जाती संघ

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसPoliceपोलिसWomenमहिला