शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

धक्कादायक! अनुदान लाटण्यासाठी जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांचे 'अपहरण'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 19:51 IST

अचानक या शाळेची पटसंख्या कमी होऊन ७ ऑगस्ट रोजी शाळा शून्य पटसंख्येवर आली. विद्यार्थी गेले कुठे? याचा शोध घेण्यासाठी शिक्षक गावातही गेले. मात्र, सदर विद्यार्थी गावातच नव्हते.

नरेंद्र जावरे/चिखलदरा (अमरावती) : जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पळवून नेल्याने नाईलाजास्तव शाळेला कुलूप लावावे लागले. ही धक्कादायक घटना अतिदुर्गम भागातील नवलगाव जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत घडली. विद्यार्थी गेले कुठे याचा शोध घेतला असता, शहरी भागातील आश्रमशाळांनी अनुदान मिळविण्यासाठी हा संतापजनक प्रकार केल्याचे उघडकीस आले.

मेळघाटात काहीपण घडू शकते, अशी एक म्हण प्रचलित आहे. त्यामुळे येथे शाळा चोरीला गेल्याचे ऐकिवात होते. आता मात्र सुरू असलेली शाळाच विद्यार्थी पळवून बंद पाडण्याचा महाप्रताप उघडकीस आला आहे. चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या नवलगाव येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथापर्यंत शाळा आहे. दहा विद्यार्थी या शाळेत शिकत होते. दोन शिक्षक तेथे कार्यरत होते. परंतु, अचानक या शाळेची पटसंख्या कमी होऊन ७ ऑगस्ट रोजी शाळा शून्य पटसंख्येवर आली. विद्यार्थी गेले कुठे? याचा शोध घेण्यासाठी शिक्षक गावातही गेले. मात्र, सदर विद्यार्थी गावातच नव्हते. यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. त्यानंतर हा प्रकार पुढे आला. भातकुली, अमरावती येथील काही आश्रमशाळांच्या व्यवस्थापकांनी पालकांकडून लिहून घेतल्याचे सांगण्यात आले.

आरटीई कायद्याचा गैरवापर नवलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून राकेश बाबुलाल बेठेकर, अस्मिता बन्सीलाल सेलूकर, राजश्री रामदास धिकार, विकेश महादेव बेठेकर, ईश्वर राजू बेठेकर, साहित महादेव बेठेकर, सपना बाबनू बेठेकर, करीना सोनेकलाल बेठेकर, आकाश नंदराम बेठेकर आणि शोभाली दयाराम भुसूम अशी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. अमरावती व भातकुली येथील संस्थाचालकांनी शाळेतून कुठल्याच प्रकारचा शाळा सोडल्याचा दाखला टीसी न घेता तसेच घेऊन गेले. त्यामुळे विद्यार्थी कुठे गेले याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना शोधमोहीम राबवावी लागली. आरटीई कायद्यानुसार वयाचा दाखला असला तर (टीसी)ची गरज भासत नसल्याचा कायदा आहे. त्याचाच गैरफायदा खाजगी संस्थाचालक अनुदान लाटण्यासाठी घेत असल्याचे यावरून उघडकीस येत आहे.

पैशांचे आमिष देऊन पळवितात विद्यार्थीमेळघाटातील भोळाभाबड्या आदिवासींना शहरी भागातील आश्रमशाळांचे संस्थाचालक पैशांचे आमिष देऊन त्यांना पळवून नेत असल्याचा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. शासनाकडून मिळणारे अनुदान लाटण्यासाठी हा सर्व खटाटोप केला जात आहे. शासन निर्णयानुसार एका प्रकल्पातून ३० किलोमीटरपेक्षा अधिक दूर असलेल्या दुसऱ्या शाळेत विद्यार्थ्याला नेता येत नाही. तरीसुद्धा काही संस्थाचालक राजकीय अभयाने मेळघाटातील शाळांमधील विद्यार्थी पळविण्याचा घाट रचत आहेत. 

गतवर्षी बंद पडली बिच्छूखेड्याची शाळाचिखलदरा तालुक्यातील बिच्छूखेडा येथील जिल्हा परिषदेची शाळा विद्यार्थीच मिळत नसल्याने बंद करण्यात आली. 

नवलगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची टीसी नेतात. काही खासगी शाळांमधील संस्थाचालक आदिवासींच्या भोळेपणाचा फायदा घेतात. यासंदर्भात शिक्षणाधिकारी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेणार आहेत.- संदीप बोडखे, गटशिक्षणाधिकारी चिखलदरा

टॅग्स :MelghatमेळघाटRight To Educationशिक्षण हक्क कायदाState Governmentराज्य सरकारMaharashtraमहाराष्ट्रKidnappingअपहरण