शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

धक्कादायक! अनुदान लाटण्यासाठी जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांचे 'अपहरण'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 19:51 IST

अचानक या शाळेची पटसंख्या कमी होऊन ७ ऑगस्ट रोजी शाळा शून्य पटसंख्येवर आली. विद्यार्थी गेले कुठे? याचा शोध घेण्यासाठी शिक्षक गावातही गेले. मात्र, सदर विद्यार्थी गावातच नव्हते.

नरेंद्र जावरे/चिखलदरा (अमरावती) : जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पळवून नेल्याने नाईलाजास्तव शाळेला कुलूप लावावे लागले. ही धक्कादायक घटना अतिदुर्गम भागातील नवलगाव जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत घडली. विद्यार्थी गेले कुठे याचा शोध घेतला असता, शहरी भागातील आश्रमशाळांनी अनुदान मिळविण्यासाठी हा संतापजनक प्रकार केल्याचे उघडकीस आले.

मेळघाटात काहीपण घडू शकते, अशी एक म्हण प्रचलित आहे. त्यामुळे येथे शाळा चोरीला गेल्याचे ऐकिवात होते. आता मात्र सुरू असलेली शाळाच विद्यार्थी पळवून बंद पाडण्याचा महाप्रताप उघडकीस आला आहे. चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या नवलगाव येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथापर्यंत शाळा आहे. दहा विद्यार्थी या शाळेत शिकत होते. दोन शिक्षक तेथे कार्यरत होते. परंतु, अचानक या शाळेची पटसंख्या कमी होऊन ७ ऑगस्ट रोजी शाळा शून्य पटसंख्येवर आली. विद्यार्थी गेले कुठे? याचा शोध घेण्यासाठी शिक्षक गावातही गेले. मात्र, सदर विद्यार्थी गावातच नव्हते. यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. त्यानंतर हा प्रकार पुढे आला. भातकुली, अमरावती येथील काही आश्रमशाळांच्या व्यवस्थापकांनी पालकांकडून लिहून घेतल्याचे सांगण्यात आले.

आरटीई कायद्याचा गैरवापर नवलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून राकेश बाबुलाल बेठेकर, अस्मिता बन्सीलाल सेलूकर, राजश्री रामदास धिकार, विकेश महादेव बेठेकर, ईश्वर राजू बेठेकर, साहित महादेव बेठेकर, सपना बाबनू बेठेकर, करीना सोनेकलाल बेठेकर, आकाश नंदराम बेठेकर आणि शोभाली दयाराम भुसूम अशी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. अमरावती व भातकुली येथील संस्थाचालकांनी शाळेतून कुठल्याच प्रकारचा शाळा सोडल्याचा दाखला टीसी न घेता तसेच घेऊन गेले. त्यामुळे विद्यार्थी कुठे गेले याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना शोधमोहीम राबवावी लागली. आरटीई कायद्यानुसार वयाचा दाखला असला तर (टीसी)ची गरज भासत नसल्याचा कायदा आहे. त्याचाच गैरफायदा खाजगी संस्थाचालक अनुदान लाटण्यासाठी घेत असल्याचे यावरून उघडकीस येत आहे.

पैशांचे आमिष देऊन पळवितात विद्यार्थीमेळघाटातील भोळाभाबड्या आदिवासींना शहरी भागातील आश्रमशाळांचे संस्थाचालक पैशांचे आमिष देऊन त्यांना पळवून नेत असल्याचा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. शासनाकडून मिळणारे अनुदान लाटण्यासाठी हा सर्व खटाटोप केला जात आहे. शासन निर्णयानुसार एका प्रकल्पातून ३० किलोमीटरपेक्षा अधिक दूर असलेल्या दुसऱ्या शाळेत विद्यार्थ्याला नेता येत नाही. तरीसुद्धा काही संस्थाचालक राजकीय अभयाने मेळघाटातील शाळांमधील विद्यार्थी पळविण्याचा घाट रचत आहेत. 

गतवर्षी बंद पडली बिच्छूखेड्याची शाळाचिखलदरा तालुक्यातील बिच्छूखेडा येथील जिल्हा परिषदेची शाळा विद्यार्थीच मिळत नसल्याने बंद करण्यात आली. 

नवलगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची टीसी नेतात. काही खासगी शाळांमधील संस्थाचालक आदिवासींच्या भोळेपणाचा फायदा घेतात. यासंदर्भात शिक्षणाधिकारी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेणार आहेत.- संदीप बोडखे, गटशिक्षणाधिकारी चिखलदरा

टॅग्स :MelghatमेळघाटRight To Educationशिक्षण हक्क कायदाState Governmentराज्य सरकारMaharashtraमहाराष्ट्रKidnappingअपहरण