शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! मंत्रालयालाच होतोय दूषित पाण्याचा पुरवठा; 100 हून अधिक अधिकाऱ्यांना उलट्या, जुलाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 19:48 IST

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला.

मुंबई : राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातून हाकला जातो तिथेच पिण्याच्या दूषित पाण्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी रूग्णालयात दाखल झाल्याची घटना समोर आली आहे. मंत्रालयातील दूषित पाण्यामुळे जुलाब आणि वांतिचा त्रास झाल्याने अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी सकाळपासून दुपारी २ वाजेपर्यंत १०० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मंत्रालयातील शासकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले. तर, त्रास होत असल्यामुळे अनेकजण रजा घेऊन घरी गेले.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. यावर मंत्रालयातील दूषित पाण्यामुळे कर्मचाऱ्यांना झालेल्या त्रासाची बाब खरी असल्याची कबुली सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मंत्रालयात महापालिकेचा पाणी पुरवठा होतो. मंत्रलयातील पाण्याच्या टाक्या क्लोरीन टाकून नुकत्याच स्वच्छ केल्या आहेत. पाणी शुद्ध करण्यासाठीच्या प्युरिफायरचीही तपासणी आणि आवश्यक दुरूस्ती करण्यात आली होती. दूषित पाण्याच्या त्रास एकाच ठिकाणाहून होत असावा, अशी शक्यता आहे. याबाबत दोन दिवसात चौकशी करण्याचे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले.

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याला दुर्गंधी येत होती. त्याबाबतच्या तक्रारी होऊनही पाण्याच्या दर्जामध्ये फरक पडला नाही. मंत्रालयात हजारोंच्या संख्येने अधिकारी व कर्मचारी काम करतात. तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून वैयक्तिक व सार्वजनिक कामासाठी सर्वसामान्य जनता येत असते. तरीही पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणVidhan Bhavanविधान भवनVidhan Parishadविधान परिषद