शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सायरस मिस्त्री यांचा अपघात झालेल्या ठिकाणी धक्काशोषक यंत्रणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 07:43 IST

पुलाच्या कठड्याजवळ क्रॅश अटेन्युएटर

कासा : प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूला कारण ठरलेल्या सूर्य नदीवरील पुलाच्या कठड्याजवळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने धक्का शोषक यंत्रणा (क्रॅश अटेन्युएटर) कार्यान्वित केली आहे. 

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांची कार ४ सप्टेंबर २०२२ रोजी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर  डहाणू तालुक्यातील चारोटीजवळील सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला आदळली होती.  या अपघातात मिस्त्री आणि  जहागीर पंडोल यांचा मृत्यू झाला होता. 

वाहनाचा वेग मर्यादेपेक्षा अधिक असल्याने अपघात झाल्याचा दोषारोप ठेवून वाहन चालवणाऱ्या  महिला डॉ. अनाहिता पंडोल यांच्याविरुद्ध ५ नोव्हेंबरला कासा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. अपघातास कारणीभूत ठरलेल्या सूर्या नदी पुलाच्या कठड्याआधी धक्का शोषून घेणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. 

असे आहे उपकरणअपघात झाला त्या ठिकाणापासून ५० मीटर पुढे हे उपकरण लावले आहे. सायरस मिस्त्री यांच्या गाडीचा अपघात  सूर्या नदीच्या ज्या पुलाच्या कठड्यावर कार आदळून झाला, तेथे न लावता पुढे हे उपकरण लावले आहे. ज्या ठिकाणी उपकरण लावले आहे, त्या ठिकाणी वाहतूक विभागली जात असल्याचे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या उपकरणावर गाडी आढळल्यास गाडीचा वेग कमी होतो आणि अपघाताची तीव्रता कमी होते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.