शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सभापतीपदावर शिवसेनेचाही दावा

By admin | Updated: March 20, 2015 00:07 IST

विधान परिषदेच्या सभापतीपदावरून शिवाजीराव देशमुख यांना दूर करण्याकरिता झालेली भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस युती फोडण्याकरिता शिवसेनेने या निवडणुकीत उडी घेतली आहे.

मुंबई : विधान परिषदेच्या सभापतीपदावरून शिवाजीराव देशमुख यांना दूर करण्याकरिता झालेली भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस युती फोडण्याकरिता शिवसेनेने या निवडणुकीत उडी घेतली आहे. शिवसेनेने आपल्या सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे आणि शिवसेनेशी जवळीक असलेले अपक्ष सदस्य श्रीकांत देशपांडे यांचे अर्ज दाखल केले आहेत. भाजपाने आपल्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी मागणी शिवसेनेने केली असून, काँग्रेसचा पाठिंबा मिळविण्याकरिता अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवला आहे.सभापतीपदाकरिता शुक्रवारी निवडणूक होत असून, त्याकरिता अर्ज दाखल करण्याची गुरुवारी दुपारपर्यंत मुदत होती. या निवडणुकीकरिता काँग्रेसचे शरद रणपिसे, शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर आणि शिवसेनेशी जवळीक असलेले अपक्ष श्रीकांत देशपांडे यांनी अर्ज दाखल केले आहेत. रणपिसे व निंबाळकर यांनी प्रत्येकी दोन अर्ज भरले आहेत तर गोऱ्हे व देशपांडे यांनी प्रत्येकी एक अर्ज भरला आहे. विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांनी सांगितले की, शुक्रवारी प्रश्नोत्तराचा तास झाल्यावर सभापतीपदाची निवडणूक होईल. ज्या क्रमाने अर्ज दाखल केले गेले त्यानुसार अर्ज मताला टाकले जातील. त्यावर अनुकूल व प्रतिकूल मते देणाऱ्या सदस्यांना उभे राहावे लागेल. ज्या उमेदवाराला सभागृहात उपस्थित सदस्यांपैकी मतदान करणाऱ्या सदस्यांचे बहुमत प्राप्त होईल त्याला विजयी घोषित केले जाईल. त्यानंतर पुढील उमेदवारांचे अर्ज मताला टाकले जाणार नाहीत. त्यामुळे सर्वांत प्रथम रणपिसे यांचा, त्यानंतर गोऱ्हे, नंतर निंबाळकर व अखेरीस देशपांडे यांचे अर्ज मताला टाकले जातील. ज्या उमेदवाराला अर्ज मागे घ्यायचा असेल त्याला मतदानाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी सभागृहात उभे राहून अर्ज मागे घेण्याची अनुमती मागावी लागेल.भाजपाने एकतर स्वत: उमेदवार द्यावा किंवा जर द्यायचा नसेल तर शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी मागणी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. भाजपाने आपण या निवडणुकीत तटस्थ राहू, अशी भूमिका घेतली आहे. मात्र भाजपाने तटस्थ राहणे याचा अर्थ राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येण्याकरिता अप्रत्यक्ष मदत करणे हाच असल्याचे शिवसेनेने भाजपाला बजावले आहे. शिवसेनेचा ससेमिरा थोपवण्याकरिता भाजपाने शिवसेनेच्या उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा घेऊ नये, असा आग्रह धरला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे एका शिवसेना मंत्र्याने सांगितले.शिवसेना व काँग्रेस ऐनवेळी आपल्या नीलम गोऱ्हे व शरद रणपिसे यांचे अर्ज मागे घेऊन श्रीकांत देशपांडे यांचा अर्ज रिंगणात ठेवतील, अशी शक्यता आहे. देशपांडे यांना काँग्रेसच्या २१, शिवसेनेच्या ७, लोकभारतीचे १, पीपल्स रिपाइंचे १ आणि अपक्षांची ३ अशी ३३ मते मिळू शकतात. शिवसेनेच्या अपक्ष उमेदवाराला भाजपाच्या १२ सदस्यांनी पाठिंबा दिला तर देशपांडे यांना ४५ मते मिळतील. परंतु काँग्रेसने पाठिंबा दिल्यामुळे भाजपा तटस्थ राहिली तरी निंबाळकर यांना राष्ट्रवादीची २८, शेकापचे १ व अपक्ष ४ अशी ३३ मते मिळतील. त्यामुळे या निवडणुकीत भाजपा व त्यांच्याशी संबंधित ३ अपक्ष मतदान करणार की तटस्थ राहणार आणि काँग्रेस आपला उमेदवार मागे घेऊन अपक्ष देशपांडे यांना मते टाकणार का? यावर बरेच अवलंबून असेल. उपसभापती वसंत डावखरे यांच्यावर टाय झाल्याने आपले निर्णायक मत टाकण्याची वेळ येणार का? हेही औत्सुक्याचे आहे. ही निवडणूक सत्ताधारी व विरोधक यांचे संबंध बिघडवण्यास अथवा सुधारण्यास कारणीभूत ठरणार असल्याचे बोलले जाते. (विशेष प्रतिनिधी) विधान परिषदेत राष्ट्रवादीचे २८, काँग्रेसचे २१, भाजपाचे १२, शिवसेनेचे ७, लोकभारतीचा १, शेकापचा १, पीपल्स रिपाइंचा १ व अपक्ष ७ असे एकूण ७८ सदस्य आहेत. सभापतीपदावरून देशमुख यांना दूर करताना राष्ट्रवादी, भाजपा, शेकाप आणि ४ अपक्ष अशा ४५ सदस्यांनी पाठिंबा दिला होता. भाजपाने पुन्हा राष्ट्रवादीला साथ देऊन रामराजे निंबाळकर हे विनासायास सभापती होऊ नयेत याकरिता शिवसेनेने नीलम गोऱ्हे व श्रीकांत देशपांडे यांचे अर्ज दाखल केले.